शहरं
Join us  
Trending Stories
1
"इंग्रजीचा पुरस्कार अन् भारतीय भाषांचा तिरस्कार हे योग्य नाही, आपली भाषा..."; CM फडणवीसांचे राज यांना उत्तर
2
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
3
'मम्मीने दरवाजा उघडला, काशी काका आता आले अन्...'; 9 वर्षाच्या मुलाने सांगितले कशी झाली बापाची हत्या?
4
हिंदी सक्तीवरून राज ठाकरेंचं महाराष्ट्रातील शाळांच्या मुख्याध्यापकांना खुलं पत्र, वाचा जसच्या तसं...
5
Israel Iran War : 'मोसाद'ची नवीन खेळी!, इराण अलर्टवर, नागरिकांना मोबाईलमधून WhatsApp डिलिट करण्याचे आदेश
6
नाशिकचे बडगुजर अखेर भाजपमध्ये; बावनकुळे यांनी केले स्वागत!
7
दूधवाल्याची चूक अन् छत्रपती संभाजीनगरजवळ कारसह दोन बस एकमेकांवर धडकल्या
8
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
9
कुंडलीत ‘या’ स्थानी राहु-केतु आहेत? अपार धनलाभ, भरघोस भरभराट; कुणी काही वाकडे करू शकणार नाही!
10
AI Farming: शेतकऱ्यांच्या मदतीला एआय गडी; नुकसान टाळेल, नफाही वाढवेल!
11
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
12
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
13
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
14
पती, सासरच्या लोकांवर निराधार लैंगिक आरोप करणे हे मानसिक क्रौर्य: उच्च न्यायालय
15
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
16
आर्थिक कारणांमुळे 'वेलकम टू द जंगल' सिनेमाचं शूट रखडलं? समोर आलं खरं कारण
17
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
18
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
19
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज

आणेवारी पद्धतीत तत्काळ बदल करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:20 IST

इंग्रज काळापासून सुरु असलेल्या आणेवारी पध्दतीत तत्काळ बदल करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.

ठळक मुद्देनिवेदन : अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती

आॅनलाईन लोकमतभंडारा : इंग्रज काळापासून सुरु असलेल्या आणेवारी पध्दतीत तत्काळ बदल करण्यात यावे, यासह अन्य मागण्यांचे निवेदन अन्यायग्रस्त शेतकरी संघर्ष समिती जिल्हा शाखेच्या पदाधिकाऱ्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे.महाराष्ट्र राज्यात इंग्रज काळापासून शेतमालाची आणेवारी पद्धती सुरु आहे. शेतकºयांचा उत्पन्न वाढला त्याबरोबर खर्च दुपटीने वाढलेला आहे. शेतकऱ्यांना आजच्या परिस्थितीनुसार नुकसानच होत आहे. नैसर्गिक आपत्तीच्या वेळी शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत असून आजही शासन इंग्रज काळापासून सुरु असलेल्या पद्धतीचा वापर करून अहवाल तयार केला जातो. शेतकऱ्यांना त्यांच्या हक्कापासून वंचित ठेवण्यात येते. शेतकऱ्यांकडून सक्तीने पीक विमा कपात केला जातो. मात्र शेतातील उभ्या पिकावर किडींचा प्रादूर्भाव आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होते. त्यावेळी शेतकऱ्यांना विमा कंपनीकडून नुकसान भरपाई दिली जात नाही. अनेक प्रकारचे निकष सांगून विमा कंपनी पळवाटा काढीत असते. त्यामुळे शेतकरी मानसिक तणावात येऊन आत्महत्या करतो. ही आत्महत्या थांबविण्यात यावी व शेतकऱ्यांना कर्ज देताना सक्तीने पिकविमा कपात केला जातो. ही सक्ती शासनाने बंद करावी, अशी मागणी निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळात समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर भिवगडे, कार्याध्यक्ष विष्णूदास लोणारे, सचिव पुरुषोत्तम गायधने, रानबा केसलकर, लिलाधर बन्सोड, कन्हैया नागपुरे आदींचा समावेश होता.