शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Rain Alert: मुंबईत रेड अलर्ट; तीन ते चार तासात 'अतिमुसळधार' कोसळणार, शाळांना सुट्टी जाहीर
2
मुंबईत शाळांना सुट्टी जाहीर, पाणी साचल्याने अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प; ४८ तासांसाठी रेड अलर्ट जारी
3
आभाळ फाटले! मुखेड तालुक्यातील सहा गावांत पाणी शिरले; बेपत्ता १२ जणांचा शोध सुरु
4
‘मत चोरी’चा वाद वाढला, विरोधक मुख्य निवडणूक आयुक्तांविरोधात महाभियोग प्रस्ताव आणण्याच्या तयारीत 
5
२ लाख रुपयांवर मिळेल ३०,९०८ रुपये निश्चित व्याज! सरकारी बँक 'या' ग्राहकांना देतेय सर्वाधिक परतावा
6
श्रावणातला शेवटचा आठवडा; 'या' दिशेला लावा बेलाचे झाड, घरात धन, समृद्धी, पैसा येईल अपार
7
"सिनेमाच्या नावाखाली अभिनेते मजा..." कमी वयाच्या अभिनेत्रींसोबत काम करण्यावर आर माधवनचं भाष्य
8
सतर्क राहा: कोकण, पश्चिम महाराष्ट्रात १८-१९ ऑगस्टला मुसळधार पाऊस; कुठे-कुठे 'रेड अलर्ट'?
9
अहिल्यानगरमध्ये फर्निचरच्या दुकानात अग्नितांडव; अख्खं कुटुंब संपलं, दोन चिमुकल्यांसह पाच जणांचा मृत्यू
10
भाडे देऊन लाखोंचे नुकसान की EMI देऊन घर खरेदी करावे? ५० लाखांच्या घराचं आर्थिक गणित समजून घ्या
11
फ्लॉप शोचा सिलसिला संपेना! अन् म्हणे; सलमानचा पाक संघ आशिया कपमध्ये टीम इंडियासमोर हिट ठरेल
12
Apple नं ट्रम्प आणि चीनला दाखवला ठेंगा; भारतात आणखी एका प्रकल्पातून सुरू केलं iPhone चं उत्पादन
13
Home Remedy: महागडी हेअर ट्रीटमेंट सोडा, ५० रुपयांत लांबसडक, घनदाट, काळेभोर केस मिळवा 
14
जन्माष्टमीच्या मिरवणुकीतील रथ विजेच्या तारांना चिकटला, शॉक लागून ५ जणांचा मृत्यू, केंद्रीय मंत्र्यांचा सुरक्षा रक्षकही जखमी 
15
'सिटी ऑफ ड्रीम्स'नंतर प्रिया बापटचा पुन्हा 'तो' सीन, अभिनेत्री सुरवीन चावलासोबत लिपलॉक
16
दरमहा १२,५०० रुपये गुंतवा आणि ४० लाख रुपये मिळवा! पोस्ट ऑफिसची ही योजना देते करमुक्त परतावा
17
शेतकऱ्यांवर चिनी संकट! महत्त्वाच्या खनिजांवरील निर्यात कमी, रोखला खतांचाही पुरवठा
18
Stock Market Today: शेअर बाजारात तुफान तेजी, ७१८ अंकांच्या तेजीसह बाजार उघडला; Midcap आणि बँकिंग शेअर्समध्ये खरेदी
19
'महाभारत'ची कुंती 'बिग बॉस'मध्ये येणार! 'हत्यारे की बहन' म्हणून बोलवायचे लोक, कोण आहे ती?
20
दुचाकीला धडक देऊन ट्रक ड्रायव्हर पळाला, पण AIने केली कमाल, पोलिसांनी ३६ तासांत पकडला

गरिबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणार

By admin | Updated: May 19, 2016 00:25 IST

जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे,...

नाना पटोले यांचे प्रतिपादन : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा निर्णयभंडारा : जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल योजनेमधून या सर्वांना जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.जिल्हा परिषद सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एक परिवार आहे असे समजून चांगले काम करावे, लोकांच्या फायद्याचा विचार करून नवीन संकल्पना राबवाव्यात, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी यावेळी केले. या बैठकीत तुमसर तालुक्यातील साखळी गावातील ३५ आदिवासींना इंदिरा आवास योजनेमध्ये १९८४ साली घरे बांधून दिले होते त्यातील काही लाभार्थ्यांची जागा ही खासगी व्यक्तीची असल्याचे निदर्शनास आले. सध्या ३५ पैकी चार लाभार्थ्यांना पुन्हा घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झालेले आहेत. त्या लाभार्थींच्या घराचे बांधकाम थांबविण्यात आल् याचा प्रश्न कलाम शेख यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर खासगी जागा मालकाला संबंधित जागेचा मोबदला देवून जमीन संपादित करण्यात येईल. त्याबरोबर घरकुलाचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यासंबंधात सदर व्यक्तीशी चर्चा करावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तुमसर यांना दिले. २०१४-१५ मध्ये सानगडी आणि महालगाव येथील मनरेगाचे काम करणाऱ्या २४५ मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचा मुद्दा आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी मनरेगा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. जर त्यांच्या अधिकारात हा विषय बसत नसल्यास शासनस्तरावरून मंजुरी घेण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती दिली. टेमनी गावातील मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. रमाई, शबरी, इंदिरा आवास अशा सर्व योजनेत घर बांधलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याची रक्कम यावर्षी देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वैनगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याचा अहवाल निरीकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण वाढले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यासाठी नाग नदीवर राबविण्यात येणारा प्रकल्प डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार आहे. (नगर प्रतिनिधी)