शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local Train: कुर्ला स्थानकात तांत्रिक बिघाड; मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत, गाड्या १० ते १५ मिनिटे उशिराने
2
'ऑपरेशन सिंधू'ला गती, इराणमधून २९० भारतीयांना परत आणले; यादीत श्रीलंकेच्या महिलेचाही समावेश
3
इस्राइल-इराणमधील संघर्ष शिगेला, अमेरिकेच्या तळांवरही हल्ले, मग अचानक युद्धविराम कसा झाला? पडद्यामागे काय घडलं, अशी आहे Inside Story
4
Iran Israel ceasefire: इराण-इस्रायलमधील १२ दिवसांचे युद्ध संपले; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा, काय म्हणाले?
5
इराणने रशियाकडे मागितली मदत; परराष्ट्र मंत्री अराघची यांनी मॉस्कोमध्ये पुतिन यांची घेतली भेट
6
Rashi Bhavishya: स्त्रीमुळे अडचणीत याल, अपघाताचीही शक्यता; आज 'या' राशीच्या लोकांनी काळजी घेणं आवश्यक
7
Election 2025: प्रभाग रचनेचा प्रस्ताव देणार आता निवडणूक आयोगाला, सरकारचा सुधारित आदेश
8
खोटे जात प्रमाणपत्र ही घटनात्मक फसवणूक, सरपंचाला हायकोर्टाने ठोठावला ५ लाखांचा दंड
9
भारताला तेलाची नाही चिंता; मित्र येतो कामी! इराणकडून आयात शून्य, पण...
10
पहिलीपासून तिसरी भाषा हिंदीचा निर्णय रद्द करा; मराठी भाषक अभ्यासकांनी मुख्यमंत्र्यांना पाठवले पत्र
11
MSRTC: एसटी गेली 'खड्ड्यात'; ३७ वर्षे तोट्याचा प्रवास, एसटी महामंडळाची श्वेतपत्रिका जाहीर
12
रतन टाटा यांचे उरलेले शेअर्स 'त्या' दोन संस्थांनाच; मुंबई उच्च न्यायालयाने दिला महत्त्वाचा निकाल
13
अग्रलेख: युद्ध थांबेल की अधिक पेटेल? परिणाम लवकरच जाणवू शकतात 
14
इराणचा पलटवार...! कतारमधील अमेरिकेच्या सर्वात मोठ्या एअरबेसवर डागली 6 क्षेपणास्त्रे
15
विशेष लेख: शेतकऱ्याला AI चार जास्तीचे पैसे मिळवून देईल?
16
स्पर्धा परीक्षेप्रमाणे सरळसेवा भरती परीक्षेसाठीही 'पर्सेटाइल' पद्धत; 'क' गट नोकर भरतीसाठी एमपीएससीचा निर्णय
17
IND vs ENG मालिके दरम्यान दु:खद बातमी! भारताच्या दिग्गज फिरकीपटूचं निधन; लंडनमध्ये घेतला अखेरचा श्वास
18
लेख: गोव्यात चालणाऱ्या पार्ट्यांची 'धुंदी' वाढतेच आहे, कारण...
19
आखाती देशांत तणाव वाढण्याची चिन्हे, अनेक ठिकाणी एअरस्पेस बंद; एअर इंडिया, इंडिगोकडून सूचना जारी
20
इराण हल्ल्याचा तीव्र शब्दांत निषेध; कतारने क्षेपणास्त्रे हवेतच रोखली, जीवितहानी झाली नसल्याचा दावा

गरिबांना घरासाठी जागा उपलब्ध करून देणार

By admin | Updated: May 19, 2016 00:25 IST

जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे,...

नाना पटोले यांचे प्रतिपादन : जिल्हा दक्षता व संनियंत्रण समितीचा निर्णयभंडारा : जिल्ह्यातील ज्या गरीब कुटुंबाजवळ घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नाही, अशा सर्व कुटुंबांचे सर्वेक्षण करावे, पंडित दीनदयाल उपाध्याय घरकूल योजनेमधून या सर्वांना जमीन उपलब्ध करून देण्याचा निर्णय खासदार नाना पटोले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या जिल्हास्तरीय दक्षता व सनियंत्रण समितीच्या बैठकीत बुधवारी घेण्यात आला.जिल्हा परिषद सभागृहामध्ये झालेल्या या बैठकीत जिल्हा परिषद अध्यक्ष भाग्यश्री गिलोरकर, आमदार चरण वाघमारे, राजेश काशिवार, जिल्हाधिकारी धीरजकुमार, जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू, उपवनसंरक्षक एन.आर. प्रवीण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जगन्नाथ भोर आदी उपस्थित होते.जिल्ह्याच्या विकासासाठी सर्व अधिकाऱ्यांनी एक परिवार आहे असे समजून चांगले काम करावे, लोकांच्या फायद्याचा विचार करून नवीन संकल्पना राबवाव्यात, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी यावेळी केले. या बैठकीत तुमसर तालुक्यातील साखळी गावातील ३५ आदिवासींना इंदिरा आवास योजनेमध्ये १९८४ साली घरे बांधून दिले होते त्यातील काही लाभार्थ्यांची जागा ही खासगी व्यक्तीची असल्याचे निदर्शनास आले. सध्या ३५ पैकी चार लाभार्थ्यांना पुन्हा घरकुल योजनेंतर्गत घर मंजूर झालेले आहेत. त्या लाभार्थींच्या घराचे बांधकाम थांबविण्यात आल् याचा प्रश्न कलाम शेख यांनी उपस्थित केला. याबाबत जिल्हाधिकारी यांनी सदर खासगी जागा मालकाला संबंधित जागेचा मोबदला देवून जमीन संपादित करण्यात येईल. त्याबरोबर घरकुलाचे बांधकाम पुन्हा सुरु करण्यासंबंधात सदर व्यक्तीशी चर्चा करावी, असे निर्देश उपविभागीय अधिकारी तुमसर यांना दिले. २०१४-१५ मध्ये सानगडी आणि महालगाव येथील मनरेगाचे काम करणाऱ्या २४५ मजुरांना मजुरी मिळाली नसल्याचा मुद्दा आमदार वाघमारे यांनी उपस्थित केला. सदर प्रकरणासंदर्भात जिल्हाधिकारी यांनी मनरेगा आयुक्तांकडे मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात येईल. जर त्यांच्या अधिकारात हा विषय बसत नसल्यास शासनस्तरावरून मंजुरी घेण्यात येईल असे सांगितले. त्याचबरोबर मनरेगाच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा राज्यात प्रथम क्रमांकावर असल्याची माहिती दिली. टेमनी गावातील मजुरांची मजुरी तात्काळ त्यांच्या खात्यात जमा करण्यात यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी यांनी दिले. रमाई, शबरी, इंदिरा आवास अशा सर्व योजनेत घर बांधलेल्या लाभार्थ्यांना शौचालय बांधण्याची रक्कम यावर्षी देण्यात यावी, असेही जिल्हाधिकारी यांनी सांगितले. वैनगंगा नदीचे पाणी दूषित झाल्याचा अहवाल निरीकडून प्राप्त झाला आहे. यामध्ये मॅग्नेशियमचे प्रमाण वाढले आहे. अशी माहिती जिल्हाधिकारी यांनी दिली. यासाठी नाग नदीवर राबविण्यात येणारा प्रकल्प डिसेंबर २०१७ मध्ये पूर्ण होणार आहे. (नगर प्रतिनिधी)