शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
‘उद्धवसेनेसाठी मुंबई सोन्याची अंडी देणारी कोंबडी’,एकनाथ शिंदे यांची टीका  
3
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
4
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
5
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
6
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
7
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
8
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
9
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
10
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
11
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
12
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
13
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
14
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
15
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
16
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
17
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
18
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
19
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
20
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

ऐतिहासिक राष्ट्रीय शाळा जळीतप्रकरणी उच्चस्तरीय चौकशी करा

By admin | Updated: April 30, 2016 00:37 IST

शाळा जळीतकांडप्रकरणी स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी माझ्यावर तथ्यहीन, खोटे व बिनबुडाचे आरोप केल्याचे सांगत ...

विरोधकांचे आरोप बिनबुडाचे : मोरेश्वर निखाडे यांचे प्रतिपादन, पत्रपरिषदेत दिली माहितीतुमसर : शाळा जळीतकांडप्रकरणी स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी माझ्यावर तथ्यहीन, खोटे व बिनबुडाचे आरोप केल्याचे सांगत या प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करून दोषीवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी संस्था अध्यक्ष मोरेश्वर निखाडे यांनी पत्रपरिषदेत केली. त्यामुळे प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे.कुबेरनगरीचा ऐतिहासिक वारसा समजल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय विद्यालय, तुमसर येथे ७ एप्रिल रोजी दुपारी १२ वाजता दरम्यान अचानकच आग लागली होती. त्या आगीचा व संस्थेत असलेल्या वादांचा दुरवर कुठेही संबंध येत नसताना देखील स्वत:ला संस्थेचे पदाधिकारी म्हणविऱ्यांनी मात्र ती आग संस्था अध्यक्षानेच लावल्याचा कांगावा केला. लोकांना भ्रमीत केले. मात्र त्या दिवशी संस्था अध्यक्ष निखाडे हे व्यक्तीगत न्यायालयीन कामाकरिता शाळेचे शिपाई मनोहर देशमुख व राकेश कामथे यांच्यासोबत सकाळी ११.३० वाजता दरम्यान शाळेला आग लागल्याची व नगरपरिषदेचे अग्निशमन दल नादुरूस्त असल्याचे दुरध्वनी द्वारे सांगण्यात आले. त्यामुळे वाटेत येत असलेल्या सनफ्लॅग कारखान्यात जावून अग्निशमन मिळण्याकरिता प्रयत्न केले. मात्र तिथेही अग्निशमन वाहन उपलब्ध नसल्याने उलट पावली भंडारा नगरपरिषदेमध्ये जावून तिथला अग्निशमन पाठविला. आगीला आटोक्यात आणण्याचे कार्य स्वत: निखाडे यांनी केले. निखाडे म्हणाले, जिल्हा सत्र न्ययालयात असिस्टंट चॅरिटी कमिशन भंडारा येथे ५० अ अंतर्गत प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. विरोधक रामु ढोके, माणिक भुरे, ललीत थानथराटे, मधुकर सांबारे, अमरबहादुर सिंग या विरोधात निखाडे यांना स्थगनादेश मिळाल्याने ते चिडून आहेत. त्यामुळे ते आगीत तेल ओतून लोकांना भ्रमित करित सुटले आहेत. शाळेला लागलेल्या आगीत मुख्याध्यापक खोली, लिपीक खोली, शिक्षक खोली व वर्ग ५ ची खोली जळाली. त्यामध्ये केवळ शाळेचेच दस्तावेज होते. संस्थेचे नाही. त्यामुळे संस्थेत सुरू असलेल्या वादामुळे संस्था अध्यक्षांनी आग लावल्याचे केलेले आरोप बालीशपणाचे आहे. संस्थेचे ेदस्ताऐवज संस्थेत सुरक्षित असल्याचेही त्यांनी सांगितले.स्वातंत्र्याच्या लढाईत युवकांचा सहभाग असावा, याकरिता राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या आदेशान्वये शाळेची स्थापना करण्यात आली. याचे महत्व लक्षात घेवूनच शाळा प्रगतीपथावर नेण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न विरोधकांना खपत नाही. त्यामुळे खोटे आरोप करीत आहेत. शाळेला लागलेल्या आगीची तात्काळ उच्चस्तरीय चौकशी दोषीवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. अन्यथा संस्थेचे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी, विद्यार्थी तसेच गणमान्य नागरिकांमार्फत जन आंदोलन पुकारण्यात येणार असल्याचा इशारा यावेळी दिला. यावेळी पत्रपरिषदेत राष्ट्रीय शाळेचे मुख्याध्यापक व कर्मचारी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)