शहरं
Join us  
Trending Stories
1
Labour law: वेळेत पगार, ओव्हरटाइमसाठी दुप्पट पैसे, महिलांना समान वेतन; नवे कामगार कायदे लागू!
2
India- Israel: भारत-इस्रायल मैत्री गतिमान होणार, पंतप्रधान नेतान्याहू भारतात येणार!
3
आजचे राशीभविष्य- २२ नोव्हेंबर २०२५, अचानक धनलाभ संभवतो, नोकरीतील वातावरण अनुकूल राहील
4
Aaditya Thackeray: ‘इलेक्शन’ कशाला ‘सिलेक्शन’ करा!' मतदारयादीतील गोंधळावरून आदित्य ठाकरेंचा आयोगावर आरोप
5
Air Pollution: राजधानी दिल्ली ठरले जगातील सर्वात प्रदूषित शहर, शाळा-महाविद्यालयांतील क्रीडा उपक्रम बंद ठेवण्याचे आदेश
6
Malegaon: 'नराधमाला फाशी द्या !" मालेगाव अत्याचार प्रकरणाचे तीव्र पडसाद, संतप्त जमावाने न्यायालयाचे प्रवेशद्वार तोडले
7
Mumbai: मंगलप्रभात लोढा यांना जीवे मारण्याची धमकी, काँग्रेसच्या अस्लम शेख यांच्याविरोधात तक्रार
8
Thane: श्रेयवादाची लढाई ठाण्यात हातघाईवर, भाजप नेत्याकडून शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मारहाण!
9
पंतच्या नेतृत्त्वात भारताची मालिका बचाव मोहीम! IND vs SA 2nd Test मॅच Live Streaming बद्दल सविस्तर
10
Ambernath Accident: अंबरनाथमध्ये निवडणुकीच्या प्रचारादरम्यान शिंदेसेनेच्या उमेदवाराच्या कारला अपघात, ४ ठार!
11
पत्नीही हवाई दलात पायलट, दुबई एअर शोमधील तेजसच्या शहीद पायलटचे लग्नही दुबईलाच झालेले...
12
IT कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा! आता दर महिन्याच्या ७ तारखेपर्यंत पगार करावाच लागणार; नव्या कायद्यात काय काय...
13
नवा कामगार कायदा...! आता १ वर्षानंतर मिळणार ग्रॅच्युइटी; ५ वर्षांची अट बदलली...
14
पायलट 'निगेटिव्ह-जी ॲक्रोबॅटिक' युद्धाभ्यास करायला गेला अन्...; दुबई एअर शोमध्ये 'तेजस' विमान अपघाताचे कारण समोर आले...
15
भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाच्या प्रशिक्षकावर लैंगिक छळाचा आरोप; क्रीडा मंत्रालयाने चौकशीचे दिले आदेश
16
“भाजपाच्या रविंद्र चव्हाणांमुळे इथे युती तुटली, कोणता राग आहे माहिती नाही”: निलेश राणे
17
हिडमाचा खात्मा बनावट चकमकीत ? माओवाद्यांचा पत्रकातून गंभीर आरोप
18
वर्षाच्या अखेरीस आणखी एक महामारी येणार! नॉस्ट्राडेमसचे भाकित काय? जाणून घ्या
19
Video: अंबरनाथच्या उड्डाण पुलावर भीषण अपघात; कारने बाईकस्वार तिघांना उडवले, चौघांचा मृत्यू
20
ऐतिहासिक निर्णय! देशात चार नवे कामगार कायदे तात्काळ लागू; २९ जुने कायदे रद्द, श्रम धोरणाला आधुनिक स्वरूप
Daily Top 2Weekly Top 5

बेरोजगारी दूर करण्यासाठी नोकरी हक्क कायदा करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 10, 2019 01:01 IST

देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.

ठळक मुद्देजिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने : मागणी दिनानिमित्त एकवटले बेरोजगार

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : देशात बेरोजगारीची फार मोठी समस्या आहे. ती दूर करण्यासाठी नोकरी मागण्याचा कायदेशीर हक्क नाही. म्हणून केंद्र सरकारने ‘भगतसिंग राष्ट्रीय रोजगार हमी कायदा’ या नावाने कायदा करावे, अशी मागणी युवक - विद्यार्थी मेळाव्यात भाकपचे जिल्हा सचिव व माजी नगर सेवक हिवराज उके यांनी केली.९ आॅगस्टला दुपारी १२ वाजता राणा भवन भंडारा येथे क्रांतीदिनाच्या पर्वावर आॅल इंडिया स्टूडंट्स फेडरेशन एआयएसएफ व आॅल इंडिया युथ फेडरेशनच्या वतीने बनेगा नावाचा कायदा करा व इतर रोजगार आणि शैक्षणिक समस्यांच्या समाधानासाठी ‘मागणी दिन’ पाळण्यात आला.मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे होते. प्रमुख मार्गदर्शक म्हणून हिवराज उके, पंकज गजभिये, क्रांती उके व भाऊराव गिºहेपुंजे यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी क्रांती उके यांनी युवक गीत सादर केला. मेळाव्यात युवक- विद्यार्थ्यांच्या मागण्यां विषयी बोलत असतांना क्रांतीदिनासंबंधीचा इतिहास, जागतिक आदिवासी गौरव दिनानिमित्त क्रांतीवीर बिरसा मुंडांच्या उलगुलानची माहिती तसेच हिरोसीमा नागासाकीवर अमेरिकन साम्राज्यवाद्यानी केलेला बॉम्ब हल्ला आदीदी विषयीची माहिती हिवराज उके यांनी दिली.त्यानंतर दुपारी २.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मागणी दिनानिमित्त निदर्शने आंदोलन करण्यात आले. तसेच १३ मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत पंतप्रधान, राज्यपाल व मुख्यमंत्र्यांच्या नावे देण्यात आले. त्यात सुशिक्षीत बेरोजगार युवक युवतींना ३६५ दिवसाच्या रोजगाराची हमी देणारा भगतसिंग नॅशनल एम्प्लायमेंट गॅरंटी अ‍ॅक्ट या नावाने कायदा करुन सरकारने त्याची काटेकोर अमंलबजावणी करावी. शिवाय रोजगार (नोकरी) मिळेपर्यंत वर्क वेटिंग अलाऊंसच्या रुपात सातव्या वेतन आयोगाच्या किमान समान वेतन इतकी आर्थिक मदत बेरोजगारास मिळावी अशा १३ मागण्यांचा समावेश आहे.मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे यांना देण्यात आले. केंद्र सरकार तसेच राज्य शासनाला पाठपुरावा करण्याचे सांगितले. शिष्टमंडळात हिवराज उके, एआयएसएफचे अध्यक्ष प्रितेश धारगावे, सचिव भाऊराव गिऱ्हेपुंजे, रवि तिघरे, पंकज गजभिये, उपाध्यक्ष क्रांती उके, गंगाधर फाये, शाहिल मेश्राम, नेहा तिजारे, प्रेरणा गजभिये, अभिलासा मेश्राम, चेतना उके, मिताराम उके, गौतम भोयर आदीचा समावेश होता. कार्यक्रमाचे संचालन भाऊराव गिऱ्हेपुंजे यांनी, तर आभार नेहा तिजारे यांनी मानले.

टॅग्स :Studentविद्यार्थी