शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपा पदाधिकाऱ्याची पत्नीसह ३ ठिकाणी मतदारयादीत नावे, एका दुकानावर २५ नावे- काँग्रेसचा आरोप
2
भरधाव ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार पती-पत्नी जागीच ठार; कोहमारा-वडसा मार्गावरील घटना
3
'या' दिवसापर्यंत गपचूप ट्रॉफी भारताला द्या नाहीतर...; BCCIचे मोहसीन नक्वी यांना 'अल्टीमेटम'
4
दहिसर टोलनाका वाहतूककोंडी दूर करण्यासाठी मंत्री प्रताप सरनाईक यांनी सुचवल्या उपाययोजना
5
१०० वर्षांनी हंस महालक्ष्मी योग: ८ राशींचे कल्याण, कल्पनेपलीकडे लाभ; अपार यश, भरघोस भरभराट!
6
“शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान, भरीव मदत सरकार देईल, उद्या मंत्रिमंडळ बैठकीत...”: संजय शिरसाट
7
"दुसऱ्याच महिन्यात रंगेहाथ पकडलं...!" धनश्री वर्माचा खळबळजनक खुलासा, युजवेंद्र चहलनं लग्नाच्या पहिल्याच वर्षात दिला होता धोका?
8
अंधेरी क्रीडा संकुल महापालिकेने स्वतः उभारावे; गोपाळ शेट्टी यांची पालिका आयुक्तांकडे मागणी
9
"ही सगळी नाटकं, पाकिस्तानसोबत खेळायलाच नको होतं"; भारत-पाक सामन्यावरुन आदित्य ठाकरेंनी सुनावलं
10
भाजप कार्यालय आमच्यासाठी इमारत नाही, मंदिर आहे; पंतप्रधान मोदींनी व्यक्त केल्या भावना...
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय! आता 'या' उद्योगावर लादला १००% कर; भारताला सर्वाधिक फटका...
12
“दसरा मेळाव्याबाबत सदसद्विवेकबुद्धीला स्मरून निर्णय घ्यावा”; अजित पवारांचा रोख कुणाकडे?
13
१० वर्षांपासून सत्ता असलेल्या राज्यात भाजपाला जबर धक्का, निवडणुकीत मिळाल्या ४० पैकी केवळ ५ जागा   
14
कुठलाही क्रिकेट सामना हे सत्य बदलू शकत नाही; PM मोदींच्या ट्विटवर मोहसीन नक्वींची दर्पोक्ती
15
विघ्नहर्ता बाप्पा संकटात धावला! श्री सिद्धीविनायक मंदिर अतिवृष्टीबाधितांसाठी १० कोटी देणार
16
IND vs PAK Final : "ते स्वतः स्ट्राइकवर येऊन..." PM मोदींसंदर्भात नेमकं काय म्हणाला सूर्यकुमार यादव?
17
ठाकरे बंधू अधिकृतपणे एकत्र येण्याआधीच ठाकरे गट-मनसेत महापौर पदावरून रस्सीखेच? नेत्यांचे दावे
18
“देवाभाऊ जाहिरातींचा खर्च पूरग्रस्तांना द्यायला हवा होता”; ठाकरे गटाचा भाजपावर पलटवार
19
मॅगी बनवण्यापेक्षाही लागणार कमी वेळ; चीनच्या सर्वात उंच पुलामुळे २ तासांचा प्रवास काही मिनिटांत
20
Video - गरबा खेळताना हार्टअटॅक! नवऱ्यासोबत नाचताना पडली अन्...; ४ महिन्यांपूर्वी झालेलं लग्न

जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करा

By admin | Updated: November 7, 2015 00:33 IST

निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी होरपळला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे.

भंडारा : निसर्गाच्या वक्रदृष्टीने यावर्षी शेतकरी होरपळला आहे. आता उच्च प्रतीच्या धानाचे पिक लोंबीत असतानाच शेतशिवारातील बांध्यातील धान गोलाकार अवस्थेत तयार झाले आहे. उभे धानपीक रोगराईमुळे जळल्यागत झाले आहे. उच्च प्रतीच्या धानाचे पिक यावर्षी शेतकऱ्यांच्या हातात येणार की नाही? अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. भंडारा जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी भंडारा जिल्हा काँग्रेसचे महासचिव प्रेमसागर गणविर यांनी मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या निवेदनातून केली आहे. जिल्ह्यात सर्वाधिक धानाचे पीक घेतल्या जाते. त्यामुळे हलक्या व उच्चप्रतीच्या धानाचे पिक शेतकरी घेत असतात. परंतु या दोन्ही धानाच्या पिकावर विविध प्रकारच्या रोगराईचे सावट निर्माण झाले आहे. आता उभे धानातील शेतपीक तुडतुडा, सावदेवी, गाद, गादमाशी व विविध रोगांनी घेरल्यामुळे धानाच्या बांध्यातील शेतात गोलाकार होवून बुंध्यापासून शेंड्यापर्यंत धानाचे तणिस होताना दिसायला लागली आहे. शेतकऱ्यांनी धानाची रोवणी केल्यापासून आतापर्यंत तीन ते चार वेळा कीटकनाशकांची फवारणी केली आहे. एका एकरसाठी एकवेळ औषधी फवारणी करण्याचा खर्च चार ते पाच हजार रुपयाचा येत असतो. जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करावी, अशी मागणी गणविर यांनी केली आहे.