शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

बौद्ध विहार विकासाचे केंद्र बनावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2018 22:22 IST

बौद्ध विहार हे प्रार्थना केंद्र व पूजापाठ करण्यासाठी नव्हे तर, मानवाच्या विकासासाठी तयार करावे, त्याचा पूर्वीचा पायाच मानव विकासावर आधारित होता.

ठळक मुद्देअजाबराव शास्त्री : सिल्ली येथे मिनी दीक्षाभूमीचा चतुर्थ वर्धापन दिन

आॅनलाईन लोकमतभंडारा : बौद्ध विहार हे प्रार्थना केंद्र व पूजापाठ करण्यासाठी नव्हे तर, मानवाच्या विकासासाठी तयार करावे, त्याचा पूर्वीचा पायाच मानव विकासावर आधारित होता. त्यामुळे ५०० वर्षापूर्वी बौद्ध विहारात मूर्तीला महत्त्व न देता विचार मंथनासाठी व बौद्धधम्माच्या प्रचारासाठी देण्यात आला होता. म्हणून आजघडीला बौद्ध विहार हे मानव विकासाचे केंद्र बनावे, असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ता अजाबराव शास्त्री यांनी केले.बौद्ध विहार समितीच्या वतीने सोमवारला सिल्ली येथील मिनी दीक्षाभूमीच्या चतुर्थ वर्धापन दिनाच्या आयोजित कार्यक्रमाप्रसंगी उद्घाटक व प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून प्रा.जगजीवन कोटांगले, प्रा.शिलवंत मडामे, राष्ट्रवादीचे भंडारा जिल्हा सचिव मनिष वासनिक, सरपंच निर्भय क्षीरसागर, ज्येष्ठ नागरिक कार्तिक सूर्यवंशी, लोकशाहीर कार्तीक मेश्राम, मोनू गोस्वामी, भंते दिपज्योती, बुद्ध विहार समितीचे अध्यक्ष रविंद्र गजभिये, सुधाकर मेश्राम आदी मान्यवर विचारमंचावर उपस्थित होते.यावेळी सिल्ली येथील नवनिर्वाचित सरपंच निर्भय क्षीरसागर यांचा बौद्ध विहार समितीच्या वतीने अजाबराव शास्त्री यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शास्त्री म्हणाले, डॉ.बाबासाहेब आंबेडकर हे एकट्या दलित समाजाचे नसून ते संपूर्ण बहुजन समाजाचे पुढारी आहेत. बाबासाहेबांनी आपल्या जीवनकार्यात सर्वात जास्त काम बहुजन जातीसाठीच केले असून ते खºया अर्थाने बहुजनांचे पुढारी आहेत. त्यामुळे आतातरी बहुजनांनी जागृत होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यासारख्या महामानवाला स्वीकारण्याची खरी गरज आहे. ज्यांनी बाबासाहेबांना स्वीकारले नाही त्यांची अधोगती निश्चितच आहे. बहुजनांना धार्मिकतेत व अंधश्रद्धेत गोठवून ठेवण्याचे काम मनुस्मृतीवाद्यांनी केले आहे. याकरिता आता खºया अर्थाने बहुजन समाजाने जागृत होवून बाबासाहेबांना समजण्याची गरज आहे. आता सर्व जातीच्या बहुजनांनी एकजुटीने राहून मनुवाद्यांच्या मनसुब्याला पछाडणे गरजेचे आहे, तरच संविधानाला व लोकशाहीला खºया अर्थाने वाचविणे शक्य होईल. नाहीतर गुलामगिरीला सामोरे जाणे जवळच आहे. डॉ.बाबासाहेबांच्या वाटचालीत माता रमाईने दिलेला मोलाचा वाटा व केलेला त्याग अत्यंत महत्वाचा आहे. माई रमाई नसती तर कदाचित बाबासाहेब घडलेच नसते. म्हणून बहुजन समाजाला गुलामगिरीतून काढण्यात सिंहाचा वाटा हा माई रमाईचाही आहे. माई रमाईचा त्याग व समर्पण समाज बांधवांना नेहमीच लक्षात ठेवावा. आजच्या महिलांनी माई रमाईचा आदर्श सदैव तेवत ठेवणे गरजेचे आहे, असे मार्गदर्शन शास्त्री यांनी केले.यावेळी विचारमंचावर उपस्थित प्रमुख पाहुणे प्रा.जगजीवन कोटांगले व प्रा.शिलवंत मडामे यांनी मार्गदर्शन केले. याप्रसंगी परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक बुद्ध विहार समितीचे सचिव विवेक गजभिये यांनी केले. संचालन व आभार प्रदर्शन विलास खोब्रागडे यांनी केले.