शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

तुमसरातील मुख्य रस्ता जीवघेणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2018 22:49 IST

कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे.

ठळक मुद्देदुर्लक्ष : बांधकाम विभागाच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह

मोयन भोयर।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. पावसामुळे खड्यात पाणी भरल्यानंतर खड्डा दिसेनासा होतो. यावेळी अपघाताची शक्यता अधिक आहे. मुख्य रस्त्याची अक्षरक्ष: येथे चाळण झाली आहे. प्रत्येक लोकप्रतिनिधी सदर रस्त्यावरुन मार्गक्रमण करतो हे विशेष.तुमसर शहरातील नविन बसस्थानकापासून तर जुन्या बसस्थानकापर्यंत सुमारे एक ते सव्वा किमी चा रस्ता पूर्णत: खड्डेमय झाला आहे. एक ते दीड फुटांचे खड्डे रस्त्यावर पडले आहेत.हा रस्ता आंतरराज्यीय असून मध्यप्रदेशाकडे जाणारा एकमेव रस्ता आहे. जड वाहनांची वाहतूक याच रस्त्याने सुरु आहे. रेतीचे ट्रक येथूनच जातात. शहरात हाच रस्त्याने प्रवेश केला जातो. शहराचा हा प्रमुख प्रवेश मार्ग आहे. रस्त्यावर दूभाजक आहे. सुरक्षेचा दृष्टीने दूभाजक नक्की तयार केला आहे; परंतु रस्त्यावर खड्डे पडल्याने वाहन खड्डे वाचवितांनी दूभाजक येथे अडसर ठरत आहे. रस्त्याच्या मधोमध महाकाय खड्डयांनी रस्ता व्यापल्याने वाहने कुठून न्यायची असा प्रश्न वाहनधारकांना येथे पडला आहे.शहराची अर्धी लोकसंख्या श्रीरामनगर विनोबा भावे नगर, इंदिरा नगरात राहते, बसस्थानक बँंका, रुग्णालये याच मार्गावर असल्याने अतिशय वर्दळ या रस्त्यावर असते. मोहाडी सार्वजनिक बांधकाम खात्याच्या नियंत्रणात हा रस्ता आहे. शहर तुमसर असून मोहाडीच्या नियंत्रणात सदर रस्ता असल्याने सुमारे १५ कि.मी. अंतरावरुन अधिकाऱ्यांना दृष्टी टाकावी लागते. मागील ५० वर्षापासून रस्त्याची मालकी अजूनपर्यंत बदलली नाही.येथे तांत्रिक अडचण पुढे केली जात आहे. चार दिवसापूर्वी जुन्या बसस्थानक परिसरातील मोठ्याा खड्डयात मुरुम घालण्यात आले. त्या मुरुमाचा पूर्णत: चेंदामेंदा झाला. काही वर्षापूर्वीच सदर रस्ता तयार करण्यात आला होता. रस्त्याची गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह आहे की क्षमतेपेक्षा जड वाहतूकीमुळे रस्ता खड्डेमय बनला हा मुख्य प्रश्न उपस्थित होत आहे.उन्हाळा गेला, पुढे पावसाळा आहे हे माहित असतांना, सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्यावरचे खड्डे बुजविले नाही. शासनाने मजूरी दिली नाही काय? की वेळेपूर्वीच रस्त्यावर खड्डयांची मालीका सुरु झाली हे प्रश्न अनुत्तरीत आहेत. जीव धोक्यात घालून मुकाट्याने प्रवास करणे येथे मात्र सुरु आहे. विविध राजकीय पक्षांचे ढिगभर पदाधिकारी शहरात वास्तव्याला आहेत, पंरतु कुणीच शब्द काढायला तयार नाही. धृतराष्ट्राची भूमिका वठविण्यात धन्यता मानीत आहेत.एखाद्या अपघातानंतर येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला प्रतिक्षा तर नाही ना असा प्रश्न येथे उपस्थीत होत आहे.