शहरं
Join us  
Trending Stories
1
Sikandar Shaikh Arrested: महाराष्ट्र केसरी सिकंदर शेखला अटक, पंजाब पोलिसांची कारवाई; प्रकरण काय?
2
"मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देते"; रुपाली ठोंबरे पाटलांचा पोलीस ठाण्यात संताप, माधवी खंडाळकर प्रकरण तापलं
3
किंमती वाढल्या, भारतात सोने खरेदी वाढली की कमी झाली? अवाक् करणारी आकडेवारी
4
"सारखं फुकटात, सारखं फुकटात; सारखं माफ, कसं व्हायचं"; कर्जमाफीवरून अजित पवारांनी शेतकऱ्यांना सुनावलं
5
Babar Azam World Record: धावांसाठी संघर्ष करणाऱ्या बाबर आझमनं मोडला हिटमॅन रोहित शर्माचा विश्वविक्रम
6
वडिलांचे निधन, स्वतः आयसीयूत दाखल... तरीही स्वप्न केले पूर्ण ! राज्यसेवा परीक्षेत नागपूरची प्रगती अनुसूचित जातीतून आली राज्यात पहिली
7
"नाव लक्षात ठेवा!" नेहमी तिखट भाष्य करणाऱ्या इंग्लिश क्रिकेटरचं जेमी संदर्भातील 'ते' ट्विट व्हायरल
8
संजय राऊतांची प्रकृती बिघाड, २ महिने उपचार घेणार; PM नरेंद्र मोदींनी घेतली दखल, म्हणाले...
9
टोयोटा २०३० पर्यंत भारतात १५ नवीन वाहने आणणार, दोन नवीन SUV अन् एक पिकअप ट्रकचा समावेश
10
Smartphones: नवा फोन घेण्याचा विचार करताय? थांबा! बाजारात येतायेत एकापेक्षा एक भारी फोन
11
धक्कादायक! विद्यापीठात महिलेवर लैंगित अत्याचार; बंगळुरू विद्यापीठाच्या प्राध्यापकाला अटक
12
"काहीतरी गडबड आहे!" आरोपी रोहित आर्यवर कसा आला संशय?; प्रत्यक्षदर्शीने सांगितली रेस्क्यू कहाणी
13
मेट्रो ठेकेदार जे. कुमार इन्फ्राला ५ लाखाचा दंड; व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर एमएमआरडीएचा दणका
14
Dularchand Yadav: दुलारचंद यादव यांचा मृत्यू गोळी लागल्याने झाला नाही, डॉक्टरांचा मोठा खुलासा!
15
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
16
मोबाईलचे जीपीएस ठरू शकते तुमच्या डिजिटल अरेस्टचे कारण; आयआयटी दिल्लीत महत्त्वाचा रिसर्च
17
बॉर्डर पार करुन एकाचा भारतात प्रवेश करण्याचा प्रयत्न; BSF जवानांनी पाकिस्तानी नागरिकाला पकडले
18
ICC T20 Rankings : टीम इंडियाचं अव्वलस्थान धोक्यात! ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पराभवानंतर दुहेरी आव्हान
19
"मी त्याला काही वर्षांपूर्वीही भेटले होते...:, रोहित आर्याबद्दल रुचिता जाधवचा खुलासा, ९ मिनिटं...
20
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:53 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत.

ठळक मुद्देदुरुस्तीची गरज । मुख्य कालव्याची लांबी २६ किमी, तुमसर-मोहाडीकरिता वरदान

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत. मुख्य कालवा दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन शेती पिकांना मोठा धोका येथे निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या संयुक्त बावनथडी नदीवर बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाची उभारणी ४३ वर्षापुर्वी सुरु करण्यात आली होती. सध्या एकुण १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सदर प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष सन १९७५ मध्ये धरण बांधकामाचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या बावनथडी धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळेच तालुक्यातील नागरिकांची तृष्णा भागविणे सुरु आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता सदर प्रकल्प वरदान ठरला आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्यातील ७७ गावांना सिंचनाचा लाभ मिळत आहे.बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. धरण बांधकामादरम्यान मुख्य कालवा बांधकाम व त्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते. सदर कामांना सुमारे २० ते २२ वर्षांचा काळ लोटला. मुख्य कालव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय व धोक्याची शक्यता अधिक आहे. मुख्य कालव्यातुन लहान कालवे व वितरिकेद्वारे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सध्या प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.प्रकल्पाची देखभाल आवश्यकफुटलेल्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देऊन दुरुस्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही धरणाचे आयुष्य हे शंभर वर्षाचे असते. धरणात दरवर्षी गाळ साचते. त्यामुळे धरण हळूहळू भरते असे शास्त्रीय कारण असल्याची माहिती आहे. याधरणावर कोट्यवधींचा खर्च आतापर्यंत करण्यात आला..

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प