शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

बावनथडी प्रकल्पाच्या मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 26, 2019 00:53 IST

आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत.

ठळक मुद्देदुरुस्तीची गरज । मुख्य कालव्याची लांबी २६ किमी, तुमसर-मोहाडीकरिता वरदान

मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : आंतरराज्यीय बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाचा मुख्य कालवा ठिकठिकाणी फुटला आहे. पाणी विसर्गदरम्यान धोक्याची अधिक शक्यता आहे. महाराष्ट्रातील एकुण मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. मोठे भगदाड येथे पडले आहेत. सदर कालवा बांधकामाला सुमारे २० ते २२ वर्षे झाली आहेत. मुख्य कालवा दुरुस्तीअभावी पाण्याची नासाडी होऊन शेती पिकांना मोठा धोका येथे निर्माण होण्याची अधिक शक्यता आहे.तुमसर तालुक्यातील सितेकसा येथे बावनथडी नदीवर महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या संयुक्त बावनथडी नदीवर बावनथडी (राजीव सागर) प्रकल्पाची उभारणी ४३ वर्षापुर्वी सुरु करण्यात आली होती. सध्या एकुण १५ हजार ३०० हेक्टर शेतजमिनीला सिंचनाचा लाभ होत आहे. केंद्र शासनाच्या योजनेत महाराष्ट्रातील २६ प्रकल्पात सदर प्रकल्पाचा समावेश आहे. विशेष सन १९७५ मध्ये धरण बांधकामाचा निर्णय घेण्यात आला होता. सध्या बावनथडी धरणातून पाणी विसर्ग केल्यामुळेच तालुक्यातील नागरिकांची तृष्णा भागविणे सुरु आहे. तुमसर व मोहाडी तालुक्याकरिता सदर प्रकल्प वरदान ठरला आहे. तुमसर तालुका व मोहाडी तालुक्यातील ७७ गावांना सिंचनाचा लाभ मिळत आहे.बावनथडी प्रकल्पाचा मुख्य कालव्याची लांबी २६.२ किमी इतकी आहे. धरण बांधकामादरम्यान मुख्य कालवा बांधकाम व त्याचे अस्तरीकरण करण्यात आले होते. सदर कामांना सुमारे २० ते २२ वर्षांचा काळ लोटला. मुख्य कालव्यातून प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. मुख्य कालव्याला ठिकठिकाणी भगदाड पडले आहे. त्यामुळे पाण्याचा अपव्यय व धोक्याची शक्यता अधिक आहे. मुख्य कालव्यातुन लहान कालवे व वितरिकेद्वारे पाणी सिंचनाकरिता देण्यात येते. सध्या प्रकल्पाची किंमत ८६७.२० कोटी एवढी झाली आहे.प्रकल्पाची देखभाल आवश्यकफुटलेल्या मुख्य कालव्याची दुरुस्ती करणे अत्यंत गरजेचे आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांनी येथे लक्ष देऊन दुरुस्तीचे नियोजन करणे आवश्यक आहे. कोणत्याही धरणाचे आयुष्य हे शंभर वर्षाचे असते. धरणात दरवर्षी गाळ साचते. त्यामुळे धरण हळूहळू भरते असे शास्त्रीय कारण असल्याची माहिती आहे. याधरणावर कोट्यवधींचा खर्च आतापर्यंत करण्यात आला..

टॅग्स :Bavanthadi Projectबावनथडी प्रकल्प