शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानकडून युद्धविरामाचं घोर उल्लंघन, भारताची संतप्त प्रतिक्रिया, दिला सक्त इशारा
2
Pakistan Ceasefire Violations : पाकिस्तानकडून जम्मूमध्ये गोळीबार, BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद, सात जण जखमी
3
"पाकिस्तानी लोक 'ऑफिशियल भिकमंगे'..."; असदुद्दीन ओवेसींनी पाकड्यांची पार लक्तरं काढली!
4
Pakistan Violates Ceasefire: पाकिस्तानचं शेपूट वाकडंच!! चार तासांतच शस्त्रसंधीचे उल्लंघन; जम्मूमध्ये पुन्हा ड्रोन हल्ले, गोळीबार
5
"युद्धविरामाचं झालं काय? श्रीनगरमध्ये अनेक स्फोट’’, पाकिस्तानच्या आगळीकीनंतर ओमर अब्दुल्ला संतप्त 
6
India Pakistan Ceasefire: पाकिस्तानकडून ३.३५ वाजता फोन आला, अन्...; परराष्ट्र सचिवांनी सांगितलं नेमकं काय ठरलं! १२ तारीख महत्त्वाची
7
पाकिस्तानशी 'युद्धविराम' करण्याच्या निर्णयानंतर शरद पवार यांचे ट्विट, म्हणाले- "भारताने कधीच..."
8
सकाळपर्यंत डागली जात होती क्षेपणास्त्रे आणि ड्रोन, अचानक संध्याकाळी युद्धविराम कसा झाला? मागच्या ४८ तासांत काय घडलं
9
पाकिस्तानसोबतच्या युद्धविरामावर असदुद्दीन ओवेसींनी उपस्थित केलं प्रश्नचिन्ह, सरकारला विचारले चार सवाल  
10
India Pakistan Ceasefire: युद्धविराम! देशासाठी सर्वात मोठी बातमी; भारत-पाकिस्तान संघर्षात सहमतीने तोडगा; दोन्हीकडून हल्ले बंद
11
"काँग्रेस पक्षाचा आणि देशाचा डीएनए एकच, काँग्रेस कधीही न संपणारा पक्ष’’, हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केला विश्वास   
12
पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांचा खरंच तुरुंगात मृत्यू झाला? जाणून घ्या काय आहे सत्य
13
पुढे धोका आहे! रात्री मोबाईलचा जास्त वापर करणं 'डेंजर'; शरीरातील 'हा' हार्मोन होतो कमी अन्...
14
India Pakistan Ceasefire: भारत-पाकिस्तान संघर्षात अखेर 'युद्धविराम', हल्ले पूर्ण थांबणार! सिंधू पाणी वाटप करारचं काय?
15
Operation Sindoor Live Updates: नागरोटा येथे लष्कराच्या तळावर गोळीबार, १ जवान जखमी
16
Vyomika Singh : कडक सॅल्यूट! "डॅडी, मम्मीला सांगू नका, ती मला जाऊ देणार नाही"; व्योमिका सिंह यांची संघर्षकथा
17
हृदयस्पर्शी! "पप्पा..."; ड्युटीवर जाणाऱ्या जवानाला लेकीने मारली मिठी, डोळे पाणावणारा Video
18
Act of War: 'यापुढे कुठलाही दहशतवादी हल्ला हा देशाविरोधातील युद्ध मानलं जाणार’, केंद्र सरकारचा मोठा निर्णय
19
लष्कराच्या हालचालीचे सोशल मीडियावर पोस्ट केले व्हिडीओ, पोलिसांनी तरुणाला केली अटक
20
फारच वाईट! 'ऑपरेशन सिंदूर' व्यापार चिन्ह मिळवण्यासाठी ११ जणांची धडपड; प्रकरण पोहोचलं सुप्रीम कोर्टात

मुख्य बसस्थानक खड्ड्यांच्या विळख्यात

By admin | Updated: April 20, 2015 00:45 IST

प्रवासी हेच आमचे दैवत असे घोषवाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय केली जात आहे.

इंद्रपाल कटकवार भंडाराप्रवासी हेच आमचे दैवत असे घोषवाक्य असणाऱ्या एस.टी. महामंडळाकडूनच प्रवाशांची गैरसोय केली जात आहे. जिल्ह्याच्या मुख्यालयात असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्ड्यांची भरमार आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यावर बस खड्यातून जात असल्याने प्रवाशांना त्याचा फटका बसतो. बसस्थानक परिसराच्या सभोवताल दुर्गंधीही पसरली असल्याने या समस्येपासून मुक्त करण्याचे आवाहन आगार व्यवस्थापनासमोर आहे. शहरातील बसस्थानकावर २४ तास प्रवाशांची वर्दळ असते. जिल्ह्याचे ठिकाण असलेल्या भंडारा बसस्थानकात खड्डे आणि दुर्गंधीमुळे प्रवाशी व एस.टी. कामगारांना नाहक त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानक परिसरात सर्वत्र खड्डेच खड्डे असल्याने त्याचा फटका सर्वांनाच बसतो. बसस्थानकाच्या इन आणि आऊट प्रवेशद्वारावरील मार्गावरील डांबर उखडलेले असल्याने गिट्टी सर्वत्र पसरली आहे. बसस्थानकात प्रवेश करताच मोठा खड्डा प्रवाशांचे स्वागत करतो. सहा महिन्यापूर्वी बसस्थानकातील खड्यांची डागडुजी करण्यात आली होती. मात्र पळसाला पाने तीनच या म्हणीप्रमाणे स्थिती पूर्ववत झाली. पुन्हा मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने डागडुजीच्या निर्माण कार्य व गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. कोट्यवधींचे महसूल देणाऱ्या भंडारा आगाराच्या या मुख्य बसस्थानकातील समस्या मोठी आहे. सध्या उन्हाळ्याच्या सुटीला प्रारंभ झाला असल्याने प्रवाशांची मोठी वर्दळ आहे. बसस्थानकात पिण्याचे पाणी व विजेची समस्या नाही. परंतु स्वच्छतेबाबत उदासिनता दिसून येते. फलाट व प्रवाशी बसत असलेल्या ठिकाणी स्वच्छता दिसून येते. परंतु बसस्थानकाच्या सभोवताल स्वच्छतेच्या मोहीमेला हरताळ फासलेला दिसतो. जुन्या बसस्थानक परिसरात दुर्गंधीयुक्त वातावरण आहे. येथे मोठ्या प्रमाणात अस्वच्छता दिसून येते. बसस्थानकात पुरुष व महिला प्रसाधन गृह असले तरी पुरुष मंडळी जुन्या बसस्थानक परिसरात मुतारीसाठी जातात. त्यामुळे दुर्गंधीयुक्त वातावरण पसरलेले आहे. यासाठी सर्वस्वी आगार प्रशासन जबाबदार नसले तरी तेवढीच जबाबदारी नागरिकांचीही आहे. नागरिकांनाच मुख्य बसस्थानक स्वच्छ ठेवायचे असेल त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. एस.टी. महामंडळालाही नागरिकांचे तद्वतच प्रवाशांचेही सहकार्य अपेक्षित आहे. बसस्थानकात प्रवेश केल्यानंतर चुकून पाय खड्यात पडला तर दवाखान्याचे दर्शन महामंडळाच्या कृपेने घ्यावे लागले तर यात नवल नको. वयोवृद्ध नागरिक, महिला, लहान मुले, शालेय विद्यार्थी अशा हजारो नागरिकांची बसस्थानकावर रोजची ये जा असते. मागील एक महिन्यापासून अधूनमधून अवकाळी पावसानेही हजेरी लावली आहे. बसस्थानकात खड्डे पडल्याने त्यात पाणी साचत असते. पाणी साचल्यावर हे खड्डे किती खोल आहेत याचा अंदाज पादचारी प्रवाशांना तसेच बसचालकांना येत नाही. यामुळे खड्डयात पडणे किंवा बस अचानक खड्यातून गेल्याने बसचेही नुकसान होते. प्रवाशांच्या अंगावर घाण पाणी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. याशिवाय घाणीमुळे दुर्गंधीचीही समस्या आहे. बसस्थानक व छत्रपती शिवाजी संकुल यामध्ये मोठा नाला आहे. या नाल्याचीही साफसफाई कित्येक महिन्यांपासून झालेली नाही. त्यामुळे बसस्थानकाच्या प्रवेशद्वारावर दुर्गंधीचा विळखा कायम आहे. बसस्थानकाच्या दुरवस्थेबाबत स्थानिक आगारव्यवस्थापनाने विभागीय नियंत्रकांना कळविले आहे. बसस्थानकात असलेल्या खड्यांची दुरुस्तीबाबतही वरिष्ठांना कळविण्यात आले आहे. वेळोवेळी थातूरमातूर डागडुजी करून वेळ काढली जाते. मात्र त्यावर कायमस्वरुपी तोडगा काढला जात नाही. डागडुजी करण्यात मलीदा लाटण्याचा प्रकार तर होत नसावा अशी शंकाही वारंवार व्यक्त करण्यात येते. बसस्थानकातील खड्डे हे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे. महामंडळाच्या प्रशासनाने वेळीच लक्ष देऊन खड्डे दुरुस्त करावे तसेच स्वच्छता मोहीम राबविणे आवश्यक आहे. अपंग, महिला, लहान मुले, युवती असे अनेक जण बसचा प्रवास करण्यासाठी बसस्थानकात येतात. त्यांना येथे असुविधांचा सामना करावा लागतो. राज्य परिवहन महामंडळाने याची दखल घेऊन त्या उपलब्ध करून द्याव्यात अशी जनसामान्यांसह प्रवाशांची मागणी आहे.