शहरं
Join us  
Trending Stories
1
Vanraj Andekar: वनराज आंदेकर टोळीने रक्तरंजित बदला घेतला; नाना पेठेत गोळीबार, आयुष कोमकरचा खून
2
भारत माफी मागेल, चर्चेच्या टेबलवर वाटाघाटीला येईल; डोनाल्ड ट्रम्प यांचे सचिव बरळले, धमकीही दिली
3
तंबाखू, सिगारेट अन्..., आणखी महागणार; केवळ ४०% जीएसटीच नव्हे, अतिरिक्त टॅक्सही लागणार?
4
अभिनेते आशिष वारंग यांचे आकस्मिक निधन; मराठी, बॉलिवूड चित्रपट सृष्टीवर शोककळा
5
टियागो ७५००० रुपये, नेक्सॉन, हॅरिअर, सफारी खूपच स्वस्त झाली; टाटाने जीएसटी कपातीचे दर जाहीर केले
6
Bhagwant Mann: पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची प्रकृती बिघडली; हॉस्पिटलमध्ये भरती केले
7
"ब्राह्मण नफा कमावतायेत...!"; ट्रम्प यांच्या सल्लागाराच्या विधानावर भारताचा जोरदार पलटवार, दिलं असं उत्तर!
8
धक्कादायक! अफगाणिस्तानमधील भूकंपामध्ये महिलांना कोण वाचवत नाहीत, तालिबानच्या कायद्यांमुळे बचावकार्यात अडथळे
9
चीन की पाकिस्तान, भारतासाठी सर्वात मोठा धोका कोण? सीडीएस अनिल चौहान यांनी स्पष्ट सांगितले
10
यांचे काहीतरी वेगळेच...! Vivo, सॅमसंग नाही, पाकिस्तानात चालतो हा मोबाईल ब्रँड; ऐकलाही नसेल...
11
'आम्ही रशियाकडून तेल खरेदी करत राहू'; केंद्रीय अर्थमंत्र्याचे मोठे विधान
12
"माझा उद्देश हस्तक्षेप करण्याचा नव्हता, तर...", अजित पवारांनी सोडले मौन; IPS अंजली कृष्णा, व्हायरल व्हिडीओवर काय बोलले?
13
हुआवेचा आणखी एक ट्रिपल फोल्डेबल फोन लॉन्च; सॅमसंग, शाओमी, विवो, ओप्पोची उडाली झोप!
14
प्रसिद्ध फुटबॉलपटू नेमारही अज्ञात होता...! अनोळखी अब्जाधीश १० हजार कोटींची संपत्ती सोडून गेला
15
चांदीच चांदी...! वॅगनआरवर 84 हजार, नेक्सॉनवर 1.55 लाखांपर्यंत जीएसटी कमी होणार; अल्टो, 3XO किंमती पहाल तर...
16
जीएसटी कपातीमुळे सेकंड हँड कार डीलर्सची पळापळ; डिस्काऊंटवर डिस्काऊंट दिला तरी...
17
पीटर नवारोंच्या टीकेला भारताचे चोख प्रत्युत्तर; परराष्ट्र मंत्रालयाने सर्व दावे फेटाळले...
18
Maruti Victoris समोर टिकाव धरेल Grand Vitara? जाणून घ्या, फीचर्स अन् मायलेजच्या बाबतीत कोण सरस?
19
मधमाशांनी थांबवला खेळ! Live मॅचमध्ये फुटबॉलपटूंसह रेफ्री अन् कॅमरामॅनलाही करावी लागली कसरत (VIDEO)
20
चंद्र ग्रहण २०२५: ग्रहण काळात अन्न व साठवलेल्या पाण्यावर आठवणीने ठेवा तुळशीचे पान, कारण... 

Maharashtra Election 2019 ; पाच वर्षात दुप्पट विकास कामे केली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2019 06:00 IST

धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता नेली.

ठळक मुद्देदेवेंद्र फडणवीस । भंडारा येथे प्रचारसभेचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पाच वर्षात सगळ्या समस्या सुटल्या असा दावा आमचा नाही, मात्र काँग्रेस - राष्ट्रवादीने पंधरा वर्षात केले नाही ते आम्ही पाच वर्षात दुप्पट करून दाखविले. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी कायम उभे राहिले. महाराष्ट्राच्या आणि देशाच्या विकासासाठी महायुतीला साथ द्या, पुढच्या पाच वर्षात चेहरा-मोहरा बदलून दाखवू अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे दिली.भंडारा येथील दसरा मैदानावर शनिवारी आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी उर्जामंत्री तथा भाजपचे पूर्व विदर्भ प्रचार प्रमुख चंद्रशेखर बावनकुळे, खासदार सुनील मेंढे, म्हाडाचे सभापती तारीक कुरैशी, नगरपरिषद उपाध्यक्ष आशू गोंडाणे आदी उपस्थित होते.मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, काँग्रेस - राष्ट्रवादीने १५ वर्षात २० हजार कोटींची कर्जमाफी दिली. आमच्या सरकारने पाचच वर्षात ५० हजार कोटींची कर्जमाफी दिली. ५० लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळाला असून शेवटचा शेतकरी कर्जमुक्त होत नाही तोपर्यंत कर्जमाफी सुरुच राहील असे सांगितले.धानाला दरवर्षी बोनस देणारे युती सरकार असून यापुढेही धानाला योग्य बोनस दिला जाईल. भंडारा जिल्ह्यातील सिंचन प्रकल्प पूर्ण केले असून पुनर्वसनासाठी भरीव निधी दिला. गोसे प्रकल्पाच्या सिंचन क्षमतेत वाढ करण्यात आली. पाच वर्षात आठ हजार हेक्टरवरून ५८ हजार हेक्टरवर सिंचन क्षमता नेली. ती लवकरच एक लाख हेक्टर करणार असल्याचे सांगत मुख्यमंत्री म्हणाले, भंडारा शहराच्या पाणीपुरवठा योजनेसह विविध विकासकामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी दिला.प्रत्येकाला घर देण्याचे उद्दिष्ट असून २०२१ पर्यंत एकही व्यक्ती राज्यात बेघर राहणार नाही. प्रत्येक घरात वीज, पाणी, गॅस, शौचालय सुविधा दिल्या आणि यापुढे देण्यात येतील.शेतकºयांकडे जमीन होती, मात्र मालकी सरकारची होती. शेतकरी भोगवटदार क्रमांक दोन होते. आमच्या सरकारने कायदा करून भूमीधारी शेतकºयांना भूस्वामी केले. त्याचा फायदा शेकडो शेतकºयांना झाल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. बचतगटांच्या माध्यमातून ४० लाख कुटुंब जोडले आहेत. यापुढे बचत गटांसोबत एक लाख कुटुंब जोडले जातील. बचत गाटांच्या महिलांना एक लाखापर्यंत बिनव्याजी कर्ज देऊन महिलांना सक्षम करण्यात येणार आहे.भंडाराजिल्ह्यात मकरधोकडा येथे दीड हजार कोटी गुंतवणुकीचा इथेनॉल प्रकल्प उभारला जात आहे. या प्रकल्पामुळे शेतकºयांना तणसापासून पैसा मिळेल आणि दहा हजार तरुणांना रोजगार मिळेल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. भंडारा शहरासोबत जिल्ह्याचा चेहरामोहरा बदलून दाखवू. त्यासाठी तुमची साथ हवी आहे, असे मुख्यमंत्री फडणवीस म्हणले.माझ्यावर अन्याय झाला नाही - चंद्रशेखर बावनकुळेभाजपने माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला भरभरुन दिले. जिल्हापरिषद सदस्य, आमदार, मंत्री, पालकमंत्री पदे दिली. पूर्व विदर्भाच्या ३२ मतदार संघाच्या प्रचाराची मोठी जबाबदारी माझ्यावर सोपविली. माझ्यावर कोणताही अन्याय झाला नाही. केवळ अफवा पसरविल्या जातात. त्यावर विश्वास ठेवू नका असे आवाहन उर्जामंत्री चंद्रशेखर बावनुळे यांनी केले.

टॅग्स :bhandara-acभंडाराDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीस