शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
3
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
4
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
5
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
6
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
7
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
8
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
9
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
10
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
11
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
12
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
13
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
14
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
15
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
16
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
17
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
18
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
19
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
20
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. ...

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा : साकोली येथे नाना पटोलेंच्या प्रचारार्थ सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. विकासाच्या नावावर देशात सर्वत्र अनागोंदी सुरु असून विद्यमान सरकार नावापुरतेच उरले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी येथे केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ गुरुवारी साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी सभापती पद्माकर गहाणे, सभापती रेखा वासनिक, माजी सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सदस्य छाया पटले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, विद्यमान सरकारपुढे कोणतीही समस्या सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून केवळ ३७० कलम हटविल्याचे सांगतात आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात. केंद्र सरकार शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. देशात ७० टक्के लोक शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु त्याविषयी उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. शेतकरी शेतमजुरांच्या समस्यांवर काहीच बोलत नाही. प्रत्येक प्रश्नाला सर्जीकल स्ट्राईक, बाला कोट, ३७० कलम हेच उत्तर देतात, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.काँग्रेसने देशाला विचार दिला. विकासाची दिशा दाखविली. देशाची प्रगती करायची असल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मात्र आता देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. सरकारविरूद्ध कुणी बोलले की त्याचा आवाज दाबण्यासाठी विविध चौकशांच्या ससेमिरा लावला जातो, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँगे्रसला लोकांचे जीवनमान सुधारावयाचे आहे. त्यासाठी नवनवीन कारखाने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. हे सर्व काँग्रेसच करू शकते, असे ते म्हणाले.यावेळी आनंद नंदागवळी, ओम गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य हेमराज कापगते, बाळू बावनकुळे, अंगराज समरीत, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, अशोक कापगते आदी उपस्थित होते. संचालन अश्विन नशिने यांनी तर आभार संदीप बावनकुळे यांनी मानले.

टॅग्स :sakoli-acसाकोलीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा