शहरं
Join us  
Trending Stories
1
फिलीपीन्समध्ये भयानक भूकंप: ६.९ तीव्रतेचा धक्का, ६० जणांचा मृत्यू, इमारती कोसळल्या
2
फेरारी नाही, फेरारी कंपनीच्या मालकीवरून आई-मुलगा पुन्हा आमनेसामने; आजोबांचे नवे मृत्यूपत्र समोर आले अन्...
3
आम्हाला अजूनही अटकेच्या आदेशाची प्रत मिळाली नाही; सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा दावा
4
कोण आहेत आशीष पांडे आणि कल्याण कुमार? मोदी सरकारनं 'या' पदावर केली नियुक्ती
5
RBI MPC Policy Live: दिवाळीत कर्ज महागच! EMI कमी होण्याची वाट पाहणाऱ्यांचा भ्रमनिरास; रेपो दर 'जैसे थे'
6
मूर्ती लहान पण कीर्ती महान! पुन्हा एकदा वैभव सूर्यवंशीची बॅट तळपली; ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी शतक
7
Zubeen Garg : "७ दिवसांत बाहेर येईल मृत्यूमागचं सत्य"; सिंगर झुबीन गर्गच्या पत्नीच्या संशयावरुन मॅनेजरला अटक
8
Asia Cup 2025: ' ट्रॉफी पाहिजे तर...',  बैठकीतील राड्यानंतर एसीसी अध्यक्ष नक्वी तयार, पण आता ठेवली नवीनच अट...
9
७५ वर्षाचा नवरदेव अन् ३५ वर्षाची नवरी; लग्नाच्या रात्रीच वृद्ध पतीचा मृत्यू, घातपाताचा संशय
10
AUS W vs NZ W, ICC Women’s World Cup 2025, Live Streaming : न्यूझीलंडसमोर ऑस्ट्रेलियाचे तगडे आव्हान, कारण...
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी शेतकऱ्यांकडूनची वसूली, ऊसासाठी प्रतिटन १५ रुपये कपात; राजू शेट्टींचा हल्लाबोल
12
"माझ्या वडिलांचं एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर...", 'बिग बॉस'च्या घरात अभिनेत्रीचा मोठा खुलासा, म्हणाली- "मी त्यांना..."
13
बनावट नोटाचा 'बाजार'; कोणत्या राज्यात सर्वाधिक छपाई, महाराष्ट्र कोणत्या गुन्ह्यांमध्ये पहिला?
14
आजपासून UPI पेमेंटचं महत्त्वाचं फीचर बंद; आता थेट पैसे मागता येणार नाहीत!
15
Sonam Kapoor Pregnant: दुसऱ्यांदा आई होणार सोनम कपूर? 'वायू'च्या जन्मानंतर कुटुंबात पुन्हा चिमुकल्या पाहुण्याची चाहुल
16
अनिल देशमुखांवर झालेला 'तो' हल्ला बनावट; पोलिसांच्या बी समरी रिपोर्टमधून धक्कादायक दावा
17
काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे रुग्णालयात दाखल, प्रकृती बिघडली
18
1 October 2025 Rules Change: रेल्वे तिकीट बुकिंगपासून ते UPI पेमेंट पर्यंत, आजपासून झाले 'हे' महत्त्वाचे ८ बदल
19
प्रियकराने सोनमला संपविले अन् अजगर असलेल्या विहिरीत फेकले; दोन वर्षांनी पोलिस शोधायला गेले...
20
६३ कोटींचा दसरा मेळावा, भाजपाचा गंभीर दावा; उद्धव ठाकरेंवर जहरी टीका, ९ आकड्याचं गणित सांगितलं

Maharashtra Election 2019 ; विकासाच्या नावावर सर्वत्र अनागोंदी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 06:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क साकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. ...

ठळक मुद्देशत्रुघ्न सिन्हा : साकोली येथे नाना पटोलेंच्या प्रचारार्थ सभा

लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : राज्यातील शेती अर्थव्यवस्था उध्वस्त झाली आहे. उद्योग बंद पडत आहे. बेरोजगारांच्या हातांना काम नाही. विकासाच्या नावावर देशात सर्वत्र अनागोंदी सुरु असून विद्यमान सरकार नावापुरतेच उरले आहे, असे प्रतिपादन माजी केंद्रीय मंत्री तथा ज्येष्ठ अभिनेते शत्रूघ्न सिन्हा यांनी येथे केले.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे साकोली मतदारसंघाचे उमेदवार नाना पटोले यांच्या प्रचारार्थ गुरुवारी साकोली येथील होमगार्ड परेड ग्राऊंडवर आयोजित सभेत ते बोलत होते. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष सुनील फुंडे, माजी सभापती पद्माकर गहाणे, सभापती रेखा वासनिक, माजी सभापती मदन रामटेके, पंचायत समिती सदस्य छाया पटले आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना शत्रूघ्न सिन्हा म्हणाले, विद्यमान सरकारपुढे कोणतीही समस्या सांगा, पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या भाषणातून केवळ ३७० कलम हटविल्याचे सांगतात आणि समस्यांकडे दुर्लक्ष करतात. केंद्र सरकार शेतकरी व कामगारविरोधी असून उद्योगपतींचे कोट्यवधी रुपयांचे कर्ज माफ करून शेतकऱ्यांना देशोधडीला लावत आहेत. देशात ७० टक्के लोक शेती करतात. त्यांचा विचार न करता केवळ मुठभर उद्योगपतींच्या भल्यासाठी हे सरकार काम करीत आहे. महाराष्ट्रात शेतकरी कर्जबाजारीपणामुळे आत्महत्या करीत आहे. परंतु त्याविषयी उपाययोजना करायला सरकारला वेळ नाही. शेतकरी शेतमजुरांच्या समस्यांवर काहीच बोलत नाही. प्रत्येक प्रश्नाला सर्जीकल स्ट्राईक, बाला कोट, ३७० कलम हेच उत्तर देतात, असे शत्रूघ्न सिन्हा म्हणाले.काँग्रेसने देशाला विचार दिला. विकासाची दिशा दाखविली. देशाची प्रगती करायची असल्यास काँग्रेसशिवाय पर्याय नाही. मात्र आता देशात लोकशाहीच्या नावाखाली हुकूमशाही सुरू आहे. सरकारविरूद्ध कुणी बोलले की त्याचा आवाज दाबण्यासाठी विविध चौकशांच्या ससेमिरा लावला जातो, असेही त्यांनी सांगितले.महाराष्ट्रातील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय आहे. काँगे्रसला लोकांचे जीवनमान सुधारावयाचे आहे. त्यासाठी नवनवीन कारखाने सुरू करून शेतीला पुनर्जीवित करण्याची गरज आहे. हे सर्व काँग्रेसच करू शकते, असे ते म्हणाले.यावेळी आनंद नंदागवळी, ओम गायकवाड, जिल्हा परिषद सदस्य हेमराज कापगते, बाळू बावनकुळे, अंगराज समरीत, जिल्हा परिषद सदस्य मंदा गणवीर, अशोक कापगते आदी उपस्थित होते. संचालन अश्विन नशिने यांनी तर आभार संदीप बावनकुळे यांनी मानले.

टॅग्स :sakoli-acसाकोलीShatrughan Sinhaशत्रुघ्न सिन्हा