शहरं
Join us  
Trending Stories
1
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
2
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
3
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प
4
आयपीएलचं सुधारित वेळापत्रक आलं; कधी, कुठं रंगणार उर्वरीत सामने? A टू Z माहिती
5
Operation Sindoor: 'पाकिस्तानला जर जगायचं असेल, तर...'; PM मोदींनी दिला स्पष्ट मेसेज, जगालाही ठणकावले
6
दहशतवाद्यांचा 'आका' पाकिस्तानला भारताची 'लास्ट वॉर्निंग! वाचा PM मोदींच्या भाषणातील १० मोठे मुद्दे
7
"ऑपरेशन सिंदूर केवळ 'स्थगित' केलंय, संपलेलं नाही"; PM मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
8
Nagpur: धक्कादायक! नागपुरात पाण्याने भरलेल्या खड्ड्यात बुडून पाच जणांचा मृत्यू
9
'माता-भगिनींचं कुंकू पुसण्याचा परिणाम आता दहशतवाद्यांना कळलाय', PM मोदींचा पुन्हा इशारा
10
Operation Sindoor Live Updates: इंडिगो कंपनीकडून जम्मू, अमृतसर, चंडीगड, लेह, श्रीनगर आणि राजकोटला जाणारी विमाने रद्द
11
Narendra Modi : "भारत दहशतवादी हल्ल्यांना चोख प्रत्युत्तर देईल, न्यूक्लियर ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही"
12
Pakistan Nuclear facilities: भारताने पाकिस्तानच्या अण्वस्त्र ठिकाणावर हल्ला केलाय का? एअर मार्शल भारती म्हणाले...
13
'सिंदूर' केवळ नाव नाही, ती एक भावना...; 'या' जिल्ह्यात आतापर्यंत १७ मुलांची नावे ठेवली 'सिंदूर'
14
'ऑपरेशन सिंदूर'मध्ये अदानी समूहाच्या ड्रोन्सचाही वापर, काय आहे स्काय स्ट्रायकर कामीकेज? 
15
"मला माझ्या वडिलांचा अभिमान, देशासाठी बलिदान देणाऱ्या..."; शहीद वडिलांना लेकाचा सलाम
16
Nalasopara: कपडे वाळवण्यासाठी गेला अन्...; नालासोपाऱ्यात बाल्कनीतून पडून तरुणाचा मृत्यू
17
"तुझ्यामुळे विराट कोहलीला रिटायर व्हावं लागलं", ट्रोलर्सच्या निशाण्यावर आली अवनीत कौर
18
पाकिस्तानच्या हल्ल्याने कुटुंब उद्ध्वस्त; १२ वर्षांच्या जुळ्या मुलांचा मृत्यू, वडील ICU मध्ये दाखल
19
Pune: भररस्त्यात १८ वर्षीय तरुणीची हत्या, शेजारीच निघाला आरोपी; तपासातून समोर आलं हत्येचं कारण
20
Operation Sindoor BJP: भाजप देशभर काढणार तिरंगा यात्रा; 'ऑपरेशन सिंदूर'चे यश देशवासीयांना सांगणार

जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:07 IST

खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली.

ठळक मुद्देवरठी येथील प्रकार : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित, दूषित पाण्याचीही समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली. यामुळे वरठी येथील अनेक भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसापासून वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी नाही.जलवाहिनी फुटूनही ग्रामपंचायत मार्फत दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक भागात दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. तर दुरुस्ती करीत खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.१५ दिवसांपूर्वी वरठी येथील मुख्य मागार्ला लागून एका खासगी कंपनीने भूमिगतपणे केबल घालण्याचे काम केले. याबाबद मात्र ग्रामपंचायत स्तरावर परवानगी घेण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. कामादरम्यान रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेली नळाची जलवाहिनी फुटली. जगनाडे चौक ते एस टी बस स्थानक पर्यंत च्या विविध भागांतील नळाची पाईप लाईन दरम्यान फुटली.यामुळे वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी येत नाही. एस टी स्टँड परिसरात १५ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याचे तक्रार येथील राहिवस्यानी केली आहे. याबाबद अनेकदा ग्राम पंचायत ला कळवण्यात आले पण अजूनही फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.पाणी रस्त्यावरफुटलेल्या जलवाहिनीमुळे शेकडो लीटर पिण्याचे पाणी वाया जात असून त्या पाईप द्वारे अशुद्ध पाणी लोकांना मिळत आहे. फुटलेल्या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जात आहे. एस टी स्थानक च्या मागच्या भागत असलेल्या जलवाहिनीमधून दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. नळाचे पाणी सुरू असताना जलद प्रवाहाने पाणी जमिनीच्या बाहेर पडते. नळ बंद झाल्यावर जमिनीचे संपूर्ण माती त्या पाईप लाईन द्वारे नळाला येते. परिणामी अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.दुरुस्तीचे काम लवकर होणारफुटलेल्या जलवाहिनीचा शोध सुरू आहे. खासगी कंपनी मार्फत कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी न घेता केबालिंग केल्यामुळे जलवाहिनी फुटली असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. लिकेज भूमिगत असल्यामुळे शोधण्यात वेळ जात आहे. त्यामुळे कसरत होत आहे. गावकर्यांनी यानंतर त्यांच्या भागात अशी काम सुरू असल्यास मज्जाव करण्याचे आवाहन सरपंच संजय मिरासे यांनी केले आहे. लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.ते खड्डे धोकादायकफुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती करीता ग्राम पंचायतीच्या मागच्या भागात रस्त्यावर दोन तीन ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. १५ दिवसापासून खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे ते खड्डे धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे या भागात सुप्रसिद्ध दुर्गा व हनुमान मंदिर आणि शाळा महाविद्यालय आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी आणि गावातील भाविक यांच्यासाठी एकमेव रास्ता आहे. रस्त्याच्या मधोमध आणि मंदिराच्या समोरासमोर खड्डे खोदल्यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि नवप्रभात महाविद्यालय आहे. हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.