शहरं
Join us  
Trending Stories
1
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
2
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
3
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
4
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
5
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
6
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
7
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
8
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
9
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
10
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
11
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
12
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
13
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
14
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
15
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
16
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
17
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
18
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
19
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
20
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:07 IST

खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली.

ठळक मुद्देवरठी येथील प्रकार : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित, दूषित पाण्याचीही समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली. यामुळे वरठी येथील अनेक भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसापासून वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी नाही.जलवाहिनी फुटूनही ग्रामपंचायत मार्फत दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक भागात दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. तर दुरुस्ती करीत खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.१५ दिवसांपूर्वी वरठी येथील मुख्य मागार्ला लागून एका खासगी कंपनीने भूमिगतपणे केबल घालण्याचे काम केले. याबाबद मात्र ग्रामपंचायत स्तरावर परवानगी घेण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. कामादरम्यान रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेली नळाची जलवाहिनी फुटली. जगनाडे चौक ते एस टी बस स्थानक पर्यंत च्या विविध भागांतील नळाची पाईप लाईन दरम्यान फुटली.यामुळे वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी येत नाही. एस टी स्टँड परिसरात १५ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याचे तक्रार येथील राहिवस्यानी केली आहे. याबाबद अनेकदा ग्राम पंचायत ला कळवण्यात आले पण अजूनही फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.पाणी रस्त्यावरफुटलेल्या जलवाहिनीमुळे शेकडो लीटर पिण्याचे पाणी वाया जात असून त्या पाईप द्वारे अशुद्ध पाणी लोकांना मिळत आहे. फुटलेल्या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जात आहे. एस टी स्थानक च्या मागच्या भागत असलेल्या जलवाहिनीमधून दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. नळाचे पाणी सुरू असताना जलद प्रवाहाने पाणी जमिनीच्या बाहेर पडते. नळ बंद झाल्यावर जमिनीचे संपूर्ण माती त्या पाईप लाईन द्वारे नळाला येते. परिणामी अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.दुरुस्तीचे काम लवकर होणारफुटलेल्या जलवाहिनीचा शोध सुरू आहे. खासगी कंपनी मार्फत कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी न घेता केबालिंग केल्यामुळे जलवाहिनी फुटली असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. लिकेज भूमिगत असल्यामुळे शोधण्यात वेळ जात आहे. त्यामुळे कसरत होत आहे. गावकर्यांनी यानंतर त्यांच्या भागात अशी काम सुरू असल्यास मज्जाव करण्याचे आवाहन सरपंच संजय मिरासे यांनी केले आहे. लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.ते खड्डे धोकादायकफुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती करीता ग्राम पंचायतीच्या मागच्या भागात रस्त्यावर दोन तीन ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. १५ दिवसापासून खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे ते खड्डे धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे या भागात सुप्रसिद्ध दुर्गा व हनुमान मंदिर आणि शाळा महाविद्यालय आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी आणि गावातील भाविक यांच्यासाठी एकमेव रास्ता आहे. रस्त्याच्या मधोमध आणि मंदिराच्या समोरासमोर खड्डे खोदल्यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि नवप्रभात महाविद्यालय आहे. हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.