शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार विधानसभा निवडणुकीचा फैसला; ५ कोटी मतांच्या मोजणीकडे देशाचे लक्ष! मतमोजणीची वेळ काय?
2
वाचवा, वाचवा..! ट्रक क्लिनरची मदतीसाठी याचना, कार पूर्णपणे जळून खाक
3
नवले पूल पुन्हा 'डेथ स्पॉट'; कंटेनर अपघातातील ९ मृतांमध्ये एका कुटुंबाचा समावेश
4
गोळ्या झाडून व्यावसायिकाचा खून करणाऱ्या संशयितांच्या शोधात पाच पथके रवाना
5
नवले पुलावर मृत्यूचा तांडव..! कंटेनर ट्रॅव्हलवर पलटी, कार पेटली, आठ जणांचे बळी
6
दिल्ली कार बॉम्बस्फोटानंतर अल-फलाह विद्यापीठावर कारवाई, सदस्यत्व रद्द
7
इराणच्या जनतेत पसरलीये संतापाची लाट! खामेनींकडे फिरवली पाठ; नेमकं कारण काय?
8
लाल किल्ला ब्लास्ट : एक-दोन नव्हे, तब्बल 32 कारचा होणार होता वापर; दहशतवाद्यांनी आखला होता 'बाबरीचा' बदला घेण्याचा भयंकर कट
9
कारमधील सीएनजीचा स्फोट...? दोन कंटेनरमध्ये कार सापडून लागली आग 
10
अजून किती निष्पाप लोकांचे बळी घेणार? प्रशासन ठोस उपाययोजना कधी करणार? स्थानिकांचा सवाल
11
'माझ्या मृत्युला आईच जबाबदार, तिला कडक शिक्षा करा', सोलापुरात वकील तरुणाने बेडरुममध्येच संपवले आयुष्य
12
भाजपाला वनमंत्री गणेश नाईकांच्या जनता दरबाराचे बळ;  शिंदेसेनेच्या मंत्री सरनाईकना रोखण्यासाठी नाईक मैदानात 
13
दिल्लीनंतर आता मुंबईच्या आकाशावर जीपीएस स्पूफिंगचे सावट; सिग्नलमध्ये बिघाडबाबत एएआयने दिला इशारा
14
बिहारमध्ये NDA कडून मुख्यमंत्रीपदाची शपथ कोण घेणार? मतमोजणीपूर्वीच चिराग पासवान यांच्या पक्षाचा मोठा दावा!
15
'इलेक्ट्रिक व्हेईकल्सना प्रोत्साहन देण्यासाठी पेट्रोल-डिझेलवरील लग्झरी वाहनांवर...', सर्वोच्च न्यायालयाचा केंद्राला सल्ला
16
Pune Accident : नवले पुलावर भीषण अपघात; अनेक वाहनं पेटली..! बचावकार्य सुरू
17
Travel : भरपूर फिरा, फोटो काढा अन् धमाल करा! 'या' देशात जाताच १० हजार भारतीय रुपये होतात ३० लाख!
18
'आम्ही अशी शिक्षा देणार की जग बघत बसेल’; दिल्ली स्फोटांवर अमित शहांचा गंभीर इशारा
19
पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाईंडची पत्नी डॉक्टर शाहीनच्या संपर्कात; जैशच्या 'महिला ब्रिगेड' मोठं कनेक्शन उघड!
20
5 लाख सॅलरी अन्...! हनिमूनला जाण्याच्या तयारीत बसलेली डॉक्टर रुकैया कोण? दहशतवादी आदिलच्या लग्नात सहभागी झालेले सगळेच रडारवर
Daily Top 2Weekly Top 5

जलवाहिनी लिकेजमुळे हजारो लीटर पाण्याची नासाडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2017 23:07 IST

खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली.

ठळक मुद्देवरठी येथील प्रकार : १५ दिवसांपासून पाणीपुरवठा प्रभावित, दूषित पाण्याचीही समस्या

लोकमत न्यूज नेटवर्कवरठी : खासगी कंपनीमार्फत सुरू असलेल्या भूमिगतपणे केबल घालण्याच्या कामामुळे गावातील नळाची जलवाहिनी फुटली. यामुळे वरठी येथील अनेक भागात ऐन पावसाळ्यात दुष्काळ सदृष्य स्थिती निर्माण झाली आहे. पंधरा दिवसापासून वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी नाही.जलवाहिनी फुटूनही ग्रामपंचायत मार्फत दुरुस्ती न झाल्यामुळे अनेक भागात दररोज शेकडो लिटर पिण्याचे पाणी वाया जात आहे. तर दुरुस्ती करीत खोदून ठेवलेल्या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे अपघाताला आमंत्रण देणारे ठरत आहे.१५ दिवसांपूर्वी वरठी येथील मुख्य मागार्ला लागून एका खासगी कंपनीने भूमिगतपणे केबल घालण्याचे काम केले. याबाबद मात्र ग्रामपंचायत स्तरावर परवानगी घेण्यात आली नसल्याची प्राथमिक माहिती आहे. कामादरम्यान रस्त्याच्या बाजूने टाकण्यात आलेली नळाची जलवाहिनी फुटली. जगनाडे चौक ते एस टी बस स्थानक पर्यंत च्या विविध भागांतील नळाची पाईप लाईन दरम्यान फुटली.यामुळे वरठी येथील अनेक भागात नळाला पाणी येत नाही. एस टी स्टँड परिसरात १५ दिवसापासून नळाला पाणी येत नसल्याचे तक्रार येथील राहिवस्यानी केली आहे. याबाबद अनेकदा ग्राम पंचायत ला कळवण्यात आले पण अजूनही फुटलेल्या पाईप लाईनची दुरुस्ती करण्यात आली नसल्याची माहिती येथील नागरिकांनी दिली.पाणी रस्त्यावरफुटलेल्या जलवाहिनीमुळे शेकडो लीटर पिण्याचे पाणी वाया जात असून त्या पाईप द्वारे अशुद्ध पाणी लोकांना मिळत आहे. फुटलेल्या जलवाहिनीमधून मोठ्या प्रमाणात पाणी बाहेर जात आहे. एस टी स्थानक च्या मागच्या भागत असलेल्या जलवाहिनीमधून दररोज शेकडो लिटर पाणी रस्त्यावर वाहून जात आहे. नळाचे पाणी सुरू असताना जलद प्रवाहाने पाणी जमिनीच्या बाहेर पडते. नळ बंद झाल्यावर जमिनीचे संपूर्ण माती त्या पाईप लाईन द्वारे नळाला येते. परिणामी अनेक भागात दूषित पाणीपुरवठा होत आहे.दुरुस्तीचे काम लवकर होणारफुटलेल्या जलवाहिनीचा शोध सुरू आहे. खासगी कंपनी मार्फत कोणतीही पूर्व सूचना किंवा परवानगी न घेता केबालिंग केल्यामुळे जलवाहिनी फुटली असल्याचे माहिती प्राप्त झाली आहे. लिकेज भूमिगत असल्यामुळे शोधण्यात वेळ जात आहे. त्यामुळे कसरत होत आहे. गावकर्यांनी यानंतर त्यांच्या भागात अशी काम सुरू असल्यास मज्जाव करण्याचे आवाहन सरपंच संजय मिरासे यांनी केले आहे. लिकेज दुरूस्तीचे काम पूर्ण करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.ते खड्डे धोकादायकफुटलेल्या जलवाहिनी दुरुस्ती करीता ग्राम पंचायतीच्या मागच्या भागात रस्त्यावर दोन तीन ठिकाणी मोठे खड्डे खोदण्यात आले आहेत. १५ दिवसापासून खोदलेल्या या खड्ड्यात पावसाचे पाणी साचल्यामुळे ते खड्डे धोकादायक ठरत आहेत. विशेष म्हणजे या भागात सुप्रसिद्ध दुर्गा व हनुमान मंदिर आणि शाळा महाविद्यालय आहेत. दररोज शेकडो विद्यार्थी आणि गावातील भाविक यांच्यासाठी एकमेव रास्ता आहे. रस्त्याच्या मधोमध आणि मंदिराच्या समोरासमोर खड्डे खोदल्यामुळे रहदारीचा प्रश्न उपस्थित झाला आहे. या भागात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आणि नवप्रभात महाविद्यालय आहे. हे खड्डे धोकादायक ठरत आहेत.