शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
आजचे राशीभविष्य, ३० एप्रिल २०२५: उत्पन्न वाढेल, इतर मार्गानी पण आर्थिक लाभ होतील
3
आरटीआय अर्ज अन् उत्तरेही वेबसाइटवरच; मुख्यमंत्र्यांच्या चिंतेनंतर माहिती आयुक्तांचे निर्देश
4
इलेक्ट्रिक वाहनांना मिळेल करात सूट आणि टोलमाफी; राज्य सरकारने जाहीर केले ईव्ही धोरण
5
लेकीच्या डोईवर अक्षता टाकून वधुपित्याने लग्न मांडवातच सोडले प्राण
6
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
7
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
8
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
9
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
10
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
11
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
12
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
13
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
14
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
15
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
16
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
17
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
18
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
19
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
20
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  

क्विंटलमागे ३०० रूपयांचा तोटा

By admin | Updated: October 14, 2015 00:42 IST

खरीप हंगामातील हलके धान निघाले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाने धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही.

आधारभूत धान खरेदी केंद्र सुरु करा : लोकप्रतिनिधींनी लक्ष देण्याची गरजतुमसर : खरीप हंगामातील हलके धान निघाले आहेत. मात्र अजूनपर्यंत शासनाने धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. त्यामुळे नाईलाजास्तव शेतकऱ्यांना आपले धान आधारभूत केंद्रावरील दर निश्चितीपेक्षा कमी दराने विक्रीला काढले. त्यामुळे शेतकऱ्यांना प्रती क्विंटल ३०० रुपये प्रमाणे आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.तालुक्यातल्या काही भागात कोरडाच दुष्काळ पडल्याने आधिच त्यांचे कंबरडे मोडले गेले आहेत तर तालुक्यातल्या बहुतांश भागात सिंचनाची सुविधा असल्यामुळे त्यांनी कशीबशी धानाची शेती लावली मात्र पाऊसाने त्यांनाही चांगलाच दगा दिल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाला. मात्र सुदैवाने शेतकऱ्यांना या खरीप हंगामात हलके स्वरुपाचे धानाचे उत्पन्न बऱ्यापैकी झाले. त्यामुळे शेतकऱ्यांने शेतातील हलके धान कटाई सुरु केली आहे. महाराष्ट्राच्या युती शासनाने धान आधारभूत केंद्रावर प्रती क्विंटल १४७० रुपये दर निश्चित केले व बोनस २५० रुपये जाहिर केला. परंतू शासनाने अद्यापही धान आधारभूत केंद्र सुरुच केले नाही. तर इकडे दिवाळी सारखा सण आवासुन उभा आहे. त्यामुळे शेतकरी हा पैसे उभारणीकरिता नाईलाजास्तव निघालेले हलके धान हा येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत आधारभुत किंमतीपेक्षा कवडीमोल भावात विक्री करताना दिसत आहे.कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ेय दलाल व व्यापाऱ्यामार्फत धान खरेदी केली जाते. शेतकऱ्यांची गरज ओळखून त्या शेतकऱ्यांकडून हजार रुपये ११०० रुपये तर कधी ९०० रुपये प्रति क्विंटल धान खरेदी केलया जात असून शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. हेच हलके धान जर आधारभूत केंद्रावर दिले असते तर शेतकऱ्याला प्रति क्विंटल ३०० ते ४०० रुपये मिळाले असते या उपर बोनस ही मिळाला असता तो वेगळा तुमसरातल्या बहुतांश आधारभूत केंद्राच्या एजेन्सी तसेच विविध कार्यकारी सोसायटी ह्या घोट्याळात अडकले आहेत. त्यामुळे तिथे आधारभुत केंद्र सुरु करणे शक्य नाही. पंरतु कृषी उत्पन्न बाजार समितीमध्येच जर धान आधारभूत केंद्र सुरु केल्यास शेतकरी आधारभूत केंद्रावर जमा करेल व शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीलाही सामोरे जावे लागणार नाही. करिता शासनाच्या लोकप्रतिनिधीने काळाची गरज ओळखून तत्काळ आधारभूत केंद्र सुरु करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे. (शहर प्रतिनिधी)