शहरं
Join us  
Trending Stories
1
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
2
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
3
रशियाची सर्वात शक्तिशाली युद्धनौका S-400 बटालियनसह समुद्रात दाखल, पुतिन काय करतायत..?
4
Video: कुत्रा येणाऱ्या-जाणाऱ्यांवर सतत भुंकायचा; टोळक्याने मालकालाच लाठ्या-काठ्यांनी बेदम चोपले...
5
नशीब असावं तर असं! पावसापासून वाचण्यासाठी दुकानात शिरली, काही वेळाने करोडपती बनून बाहेर आली
6
जिम सोडा अन् ब्रॉन्को टेस्टवर फोकस करा! टीम इंडियातील खेळाडूंना जपावा लागणार फिटनेसचा नवा 'मंत्र'
7
आरोग्य विमा आणि गंभीर आजार विम्यात काय आहे फरक? अनेकजण इन्शुरन्स घेताना करतात चूक!
8
रोज मृत्यूची भीती, तरीही खचली नाही सौंदर्यवती! कोण आहे Nadeen Ayoub? तिच्या नावाची चर्चा का?
9
श्वेताची विवाहित प्रियकरानेच केली हत्या; फिरायला घेऊन गेला आणि कार घातली तलावात, दोघांमध्ये काय बिनसलं होतं?
10
आर्यन खानच्या 'बॅड्स ऑफ बॉलिवूड'मधून प्रसिद्ध खलनायकाचं कमबॅक, लूक पाहून खूश झाले चाहते
11
BEST Election Results 2025: उद्धवसेना-मनसे युतीचा २१-० ने पराभव; राज ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया आली
12
जीएसटी कपातीनंतरही कारवर जादा कर लागू शकतो...; सीएने केले विश्लेषण...
13
१० हजार रुपयांत भारतीय जपानमध्ये काय काय करू शकतात? रुपयाची जपानी किंमत किती?
14
दोन वर्षाच्या मुलीसह अख्ख कुटुंब मृतावस्थेत आढळल्याने खळबळ; ५ जणांसोबत नेमकं काय घडलं? 
15
अभिनेत्रीला अश्लील मेसेज करणारा तो युवा नेता कोण? समोर आली धक्कादायक माहिती, राष्ट्रीय पक्षाशी संबंध 
16
4 वर्षांत तीन वेळा प्रेग्नंट, तुरुंगवासाची शिक्षा टाळण्यासाठी महिलेने भलताच मार्ग अवलंबला...! जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
17
Mumbai Crime: 'तुझ्या अंगात भूत आहे', पुजेला बोलावलं आणि ३२ वर्षीय महिलेवर मांत्रिकाने केला बलात्कार
18
श्रावण अमावस्येला पिठोरी अमावस्या का म्हणतात? त्याच दिवशी असतो पोळा आणि मातृदिन
19
राज ठाकरे शिवतीर्थावर परतताच CM देवेंद्र फडणवीसांनी केला उद्धव ठाकरेंना फोन; नेमके कारण काय?
20
रामललांच्या भक्तांना दिवाळीपूर्वीच मिळणार खास गिफ्ट! राम मंदिर ट्रस्ट देणार विशेष भेट, जाणून घ्या सविस्तर

सुरक्षा ठेवच्या नावाखाली ग्राहकांची लूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 15, 2019 22:59 IST

आधीच भारनियमन व वाढीव वीज देयकामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यावर महावितरणने सुरक्षा ठेवच्या नावाखाली पुन्हा ग्राहकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही अक्षरक्ष: ग्राहकांची लुटच आहे, असे बोलून ग्राहक संताप व्यक्त करीत आहे.

ठळक मुद्देकारभार महावितरणचा : ग्राहकांमध्ये व्यक्त होतोय संताप

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : आधीच भारनियमन व वाढीव वीज देयकामुळे जनसामान्यांचे बजेट कोलमडले आहे. त्यावर महावितरणने सुरक्षा ठेवच्या नावाखाली पुन्हा ग्राहकांची गळचेपी करण्याचा प्रयत्न केला आहे. ही अक्षरक्ष: ग्राहकांची लुटच आहे, असे बोलून ग्राहक संताप व्यक्त करीत आहे.राज्यभरात महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीतर्फे विद्युत पुरवठा केला जात असला तरी सर्वाधिक वीज निर्मिती ही विदर्भात होते. तरीही पूर्व विदर्भात सर्वाधिक भारनियमन केले जाते.लोकसभा निवडणुकीच्या काळात आठ तास विद्युत पुरवठा खंडित व्हायचा. त्यात वाढ करून आता तर ग्रामीण क्षेत्रात दहा - दहा तास विद्युत पुरवठा खंडीत होत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. परिणामी उन्हाळी धान घेणाऱ्या शेतकऱ्यांसमोर सिंचनाचा प्रश्न उभा ठाकला आहे.दुसरीकडे सुरक्षा ठेव जमा करण्याच्या नावावर महावितरणने नवीन फतवाच काढला आहे. विद्युत देयकासोबत सुरक्षा ठेव भरण्यासंदर्भातले देयकही ग्राहकांना एप्रिल महिन्याच्या बिलासोबत देण्यात आले आहे. काही तालुक्यात काही महिन्यांपुर्वी सुरक्षा ठेवचे देयक देण्यात आले होते.वीज खंडित होणे नित्याचीच बाबउन्हाळा सुरू होताच भारनियमनाचे चटकेही बसायला सुरूवात होते. भंडारा शहरात भारनियमनाचा प्रभाव तेवढा जाणवत नसला तरी ग्रामीण क्षेत्रात शेतीसाठी भारनियमनाचा बडगा उगारला जात आहे. वीज खंडीत होण्याचे प्रमाण वाढले आहे. तर दुसरीकडे शहर भागातही विजेचा लंपडाव सुरूच असतो. वीज गळतीचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात सुरूच आहे. या दरम्यान वाढीव सुरक्षा ठेवच्या बिलामुळे ग्राहकांचे टेंशन मात्र हमखास बळावले आहे.सुरक्षा ठेव कशासाठी?सुरक्षा ठेव (सिक्युरिटी डिपॉझिट) आवश्यक असल्याचे सांगून नवीन कनेक्शन देताना महावितरण सदर रक्कम घेत असते. बहुतांश ग्राहक जुनेच असल्याने त्यांनी त्याचवेळी सुरक्षा ठेव भरलेली आहे. दरम्यान ग्राहक वीज वापरल्यानंतर त्याचे बिल देतात. ते मागील महिन्यात त्यांच्या वापरासाठी बिल प्राप्त केल्यानंतरच देयक देतात. बिल देण्यास दहा ते पंधरा दिवसांचा कालावधी दिला जातो. कोणताही ग्राहक बिलाचा भरणा करीत नसल्यास वीज पुरवठा नोटीस दिल्यानंतर आणि काही कालावधी झाल्यावर कमी केला जाऊ शकतो. परंतु अशा प्रकरणांमध्ये झालेल्या नुुकसानीला टाळण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या बिलांच्या घरगुती ग्राहकाकडून एक महिन्याचे सरासरी विजेचे समतुल्य बिल सुरक्षा ठेव म्हणून जमा केले जाते. त्यात हा कालावधीही महावितरण बदलू शकते.