शहरं
Join us  
Trending Stories
1
घोटाळ्यात उपघोटाळा; ९ हजारांवर सरकारी महिला कर्मचाऱ्यांनी घेतला ‘लाडकी बहीण’ योजनेचा लाभ
2
पहलगाम मास्टरमाइंडसह तिघांचा खात्मा; ‘ऑपरेशन महादेव’ने दहशतवाद्यांची कोंडी, ‘असा’ लागला छडा
3
दहशतवाद संपवण्यास कोणत्याही थराला जाऊ शकतो ‘नवा भारत’; संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा
4
“केंद्र सरकार कोणापुढे झुकले हे स्पष्ट झाले पाहिजे, पीओके परत कधी घेणार?”: गौरव गोगोई
5
नागपूरची १९ वर्षीय दिव्या देशमुख दिग्गज कोनेरू हम्पीला पराभूत करत झाली विश्वविजेती
6
दिल्लीत सांस्कृतिक भवन होणार; आराखडा सादर, डॉ. विजय दर्डा यांच्या प्रयत्नांना मोठे यश
7
निशिकांत दुबेंना जाब विचारणाऱ्यांचे राज ठाकरेंनी मानले आभार; काँग्रेस खासदारांचे केले कौतुक
8
५ वर्षांत २,०९४ विमाने बिघाडली, प्रवाशांना टेन्शन; १८३ तांत्रिक बिघाड, सरकार काय करतेय?
9
नाव ‘डॉग बाबू’, वडिलांचे नाव ‘कुत्ता बाबू’, आईचे नाव ‘कुतिया देवी’; बिहार प्रशासनाचे देशभर वाभाडे
10
संजय राऊत मानहानी प्रकरण: नितेश राणेंविरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द; कोर्टासमोर हजर होणार
11
नालेसफाईतील घोटाळेबाजांना १५ कोटींचा दंड; ‘लोकमत’च्या स्टिंग ऑपरेशननंतर कारवाईला आणखी वेग
12
काय गडबड आहे? विद्यार्थी जीवन का संपवत आहेत? न्यायालयाकडून प्रश्न; म्हटले, वेगाने तपास करा
13
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
14
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
15
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
16
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
17
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
18
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
19
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
20
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     

जेवनाळा येथील मालगुजारी तलावाचे रूप पालटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 27, 2020 05:01 IST

तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे .

ठळक मुद्देमातीचे ढिगारे झाले दूर : जलसाठ्यात वाढ, शेतीला व जनावरांसाठी पाण्याची व्यवस्था

लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : गाव तलाव अर्थात मामा तलाव शेतकरी व गावकऱ्यांना मोठे वरदान ठरलेले आहे. उन्हाळ्याच्या दिवसात या तलावातून कित्येक पशुपक्षी, जनावरे यांची तृष्णा शांत होत पर्यावरण समतोल राखण्यासाठी यांची मोठी मदत झालेली आहे.लाखनी तालुक्यातील पालांदूर जवळील जेवणाला येथील मामा तलाव विस्तीर्ण जागेत असून सूमारेअडीचशे ते तीनशे एकर खरीपात सिंचन होऊन शेतकऱ्यांना मदत होते. गावातील खाजगी विहिरीला सुद्धा या तलावातून पाझर माध्यमातून अप्रत्यक्षरीत्या मोठी मदत शक्य आहे.जून २०१८ ला जल शिवार योजनेतून खोली करण्याचे काम हाती घेतले गेले. यातून तलावाच्या तोंडावरच मातीचे ढिगारे टाकल्याने पाण्याचा प्रवाह बंद होण्याची पूर्ण शक्यता असल्याने ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी लघुपाटबंधारे विभाग यांच्याकडे पाण्याच्या प्रवाहात अडथळा निर्माण होत असल्याचे निवेदनातून कळविले होते. याची दखल घेत तोंडावर असलेले मातीचे ढिगारे सपाटीकरण करून तलावाचे तोो तोंड खुले करण्यात आल्याने पावसाळ्यात येणारे पाणी नक्कीच तलावात जाण्याचा मार्ग मोकळा झाल्याने आनंद व्यक्त होत आहे . जेवढा पाणी तलावात साचेल तेवढी मदत गरजूंना नक्कीच होईल. गाव तलाव गावच्या सौंदयार्चा व श्रीमंतीचा एक अंग असल्याने प्रत्येक गावकºयांनी मामा तलावाची काळजी घेणे नितांत गरजेचे आहे. गावचे सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे व ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांनी मामा तलावाचे अस्तित्व टिकविण्यासाठी वारंवार प्रयत्न करीत मामा तलावाला न्याय देण्याचा प्रयत्न केलेला आहे. मे हिट मध्ये सुद्धा आजही तलावात भरपूर पाणी असल्याने तलावाचे अस्तित्व महत्त्व आपोआपच समोर येते आहे.गाव तलावाच्या विकासासाठी शासनाच्या वतीने दरवर्षी विविध योजनांच्या माध्यमातून खोलीकरण, सौंदर्यीकरण करीत तलावाचे जलशाठ्यात प्रमाण वाढविण्याकरिता प्रयत्न करणे अत्यंत महत्त्वाचे आहे. दिवसेंदिवस पाणी टंचाई सदृश्य परिस्थिती वाढत असता त्याची निगा राखणे व देखभाल-दुरुस्ती वेळेत करणे अत्यावश्यक झाले आहे. पाणी हे जीवन असल्याने गावकऱ्यांनी मामा तलावांना गावाची संपत्ती समजत काळजी घेणे अगत्याचे आहे.जेवनाळा येथील मामा तलावाच्या पाळीवरील मातीचे ढिगारे दूर झाल्याने तलावात येणाºया पाण्याचा प्रवाह खुला होत तलावाची शान अबाधित राहायला मोठी मदत होईल. शासनासह प्रत्येक गावकºयांनी सुद्धा तलावाच्या अस्तित्वाची व नियोजनााची काळजी घेणे गरजेचे आहे. लघुपाटबंधारे विभाग यांनी दाखविलेल्या सहकार्याबद्दल आम्ही त्यांचे कौतुक करतो.-नितीन रणदिवे, सामाजिक कार्यकर्ता जेवनाळा

टॅग्स :WaterपाणीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प