शहरं
Join us  
Trending Stories
1
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
2
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
3
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
4
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
5
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
6
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
7
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
8
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
9
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
10
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
11
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
12
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 
13
Navi Mumbai Rains Video: नशीब बलवत्तर! एक व्यक्ती पायऱ्या उतरत होता, तितक्यात मागून नाल्याची भिंत खचली; ९ दुचाकी, टेम्पोचे नुकसान
14
'फॅण्ड्री' फेम शालूला मराठी इंडस्ट्रीतल्या ग्रुपिझमचा बसला मोठा फटका, हातातून निसटल्या मराठी मालिका
15
Shardul Thakur wife: शार्दुल ठाकूरची पत्नी मिताली आहे यशस्वी उद्योजिका; हा आहे तिचा मुख्य व्यवसाय, जाणून घ्या
16
३ बायका ४ मुलं! संजय कपूर यांच्या १०,००० कोटींचा वारसदार कोण? करिश्माच्या मुलांना काय मिळणार?
17
"सकाळी उठल्यावर मी आधी.."; प्राजक्ता माळीने सांगितलं फिटनेस आणि सौंदर्याचं खास रहस्य
18
"प्रेम करतोस तर जीव देऊन दाखव"; गर्लफ्रेंडची मागणी बॉयफ्रेंडनं पूर्ण केली! तरुणाचा दुर्दैवी अंत
19
कुलदीप यादवने अचानक साखरपुड्याचे फोटो डिलीट केले; उलट-सुलट चर्चांना उधाण...

Lok Sabha Election 2019; किती गावे आदर्श केली? हे भाजप सरकारने सांगावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 4, 2019 22:23 IST

मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.

ठळक मुद्देतिरोडा तालुक्यात वर्षा पटेल यांची प्रचार सभा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : मोदी सरकारने सत्तेवर आल्यानंतर देशात सासंद आदर्श ग्राम योजना सुरू केली. या माध्यमातून गावाचा सर्वांगीण विकास करण्यात येणार होता. मात्र मागील पाच वर्षांत मोदी सरकारने किती गावे आदर्श केली हे सांगावे असा सवाल वर्षा पटेल यांनी केला.काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या निवडणूक प्रचारार्थ गुरूवारी तिरोडा तालुक्यातील सेजगाव, इंदोरा बु. करटी, मुंडीकोटा, केसलवाडा येथे आयोजित जाहीर सभेला संबोधित करताना त्या बोलत होत्या.या वेळी प्रामुख्याने माजी आ.दिलीप बन्सोड, पंचम बिसेन, राजलक्ष्मी तुरकर, कैलाश पटले, निता रहांगडाले, योगेंद्र भगत, राधेलाल पटले उपस्थित होते. वर्षा पटेल म्हणाल्या, खा.प्रफुल्ल पटेल यांनी गोरेगाव तालुक्यातील पाथरी हे गाव दत्तक घेवून या गावाचा सर्वांगिन विकास केला.येथील लोकांना दिलेले आश्वासन पूर्ण केले. त्यामुळे भाजप नेत्यांनी या गावात जावून आदर्श गाव कसे असते हे पाहण्याचा सल्ला दिला. मोदी सरकारला केवळ खोटी आणि मोठी आश्वासनेच देता येते, प्रत्यक्षात मागील पाच वर्षांत दिलेल्या एकाही आश्वासनाची पुर्तता केली नसल्याचे सांगितले.केवळ पोस्टरबाजी करुन महिलांचा सन्मान केल्याचे मोदी सरकार सांगत आहे. मात्र प्रत्यक्षात याविरुद्ध चित्र आहे.अशा जुमलेबाज सरकारला धडा शिकविण्याचे आवाहन केले. तसेच येत्या ११ एप्रिलला सजग राहून मतदान करण्याचे व महाआघाडीचे उमेदवार नाना पंचबुध्दे यांच्या पाठीशी उभे राहण्यास सांगितले.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकNCPराष्ट्रवादी काँग्रेस