शहरं
Join us  
Trending Stories
1
संन्यस्त खड्ग नाटकावरुन पुण्यात वंचितच्या कार्यकर्त्यांचा राडा; यशवंत नाट्यगृहात घोषणाबाजी, पोलिसांचा फौजफाटा तैनात
2
अखेर ज्वालामुखी फुटलाच...! सत्य ठरली नव्या बाबा वेंगाची भविष्यवाणी! जपानमध्येही इतर भयावह भाकितं ठरतायत खरी!
3
IND vs ENG : इंग्लंडच्या सलामीवीरांची 'नौटंकी'! टीम इंडियाचा 'सेनापती' गिलनं असा काढला राग (VIDEO)
4
'फ्यूल कंट्रोल स्विच'संदर्भात ही एक गोष्ट ऐकली असती तर अहमदाबाद विमान अपघात टळला असता? FAA नं 2018 मध्येच दिला होता इशारा
5
इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी सम्राज्ञी! तिनं अमांडा अनिसिमोव्हाला रडवलं! १९८८ नंतर पहिल्यांदाच असं घडलं
6
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
7
मायक्रोसॉफ्टने AI वापरून वाचवले ४,२०० कोटी; पण १५,००० कर्मचाऱ्यांना नोकरीवरुन काढलं
8
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
9
४०० प्लस धावांसह इंग्लंडच्या मैदानात रिषभ पंतचा 'भीम पराक्रम'! MS धोनीलाही जमलं नाही ते करून दाखवलं
10
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
11
मुलगी म्हणतेय, 'माझ्यावर हॉस्टेलमध्ये अत्याचार झाला'; वडील म्हणाले, 'ती कारमधून पडली'
12
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
13
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
14
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
15
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
16
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
17
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
18
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
19
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
20
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं

Lok Sabha Election 2019; असा आहे ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटचा इतिहास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2019 11:56 IST

ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते.

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ईव्हीएम अर्थात ईलेक्ट्रॉनिक वोटींग मशिनविषयी मतदार नेहमी चर्चा करतात. या यंत्राविषयी खास आकर्षणही असते. निवडणुकीत पारदर्शकतेसाठी या यंत्राची भूमीका महत्वाची आहे. लोकसभा निवडणूक २०१९ पासून सर्व मतदारसंघात ईव्हीएमसोबत व्हीव्हीपॅट यंत्रदेखील उपयोगात आणण्यात येणार आहे. ईव्हीएम ते व्हीव्हीपॅट या प्रवासाचा घेतलेला हा थोडक्यात इतिहास.पूर्वी मतपत्रिकेच्या सहाय्याने मतदान होत असे. मतमोजणीसाठी लागणारा वेळ आणि पारदर्शकतेचे प्रश्न यामुळे बऱ्याचदा अडचणीची परिस्थिती निर्माण होत असे. या प्रक्रीयेत सुलभता आणि पारदर्शकता आणण्याच्या दृष्टीने सर्वप्रथम १९७७ मध्ये मुख्य निवडणूक आयुक्त एस.एल.शेकदार यांनी ईलेक्ट्रॉनिक यंत्राची कल्पना मांडली. १९७९ मध्ये सर्वप्रथम प्रोटो-टाईम ईव्हीएम तयार करण्यात आले. १९८०-८१ मध्ये ईलेक्ट्रॉनिक कॉपोर्रेशन आॅफ इंडिया आणि भारत ईलेक्टॉनिक्स लिमिटेड या संस्थांनी हे यंत्र तयार करून त्याचे सादरीकरण केले. भारत निवडणूक आयोगाने ६ आॅगस्ट १९८० मध्ये राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींसमोर या यंत्राचे सादरीकरण केले.जानेवारी १९८१ मध्ये बेलने निवडणूक आयोगासमोर ही यंत्रे बनविण्याचा प्रस्ताव ठेवला. २९ जुलै १९८१ मध्ये निवडणूक आयोगाने बेल, ईसीआयएल, विधी व न्याय मंत्रालय आणि काही राज्याच्या निवडणूक अधिकाऱ्यांची बैठक घेऊन ईव्हीएमच्या वापराबाबत चर्चा केली. त्यानंतर प्रायोगिक तत्वावरही यंत्रे वापरण्याचा निर्णय आयोगाने घेतला. १९ मे १९८२ मध्ये केरळ राज्यातील परुर विधानसभा क्षेत्रात ५० मतदान केंद्रावर ईव्हीएमचा प्रथम वापर करण्यात आला. १९८२-८३ मध्ये ८ राज्य आणि एक केंद्रशासीत प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघात ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. १९८४ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने लोकप्रतिनिधीत्व कायद्यात सुधारणा करेपर्यंत ईव्हीएम वापरण्यास मनाई करण्याचा निर्णय दिल्याने या यंत्राचा वापर स्थगित करण्यात आला. १९८८ मध्ये कायद्यात दुरुस्ती झाल्यानंतर १५ मार्च १९८९ पासून ईव्हीएमचा वापर सुरू करण्यात आला. जानवोरी १९९९ मध्ये नेमलेल्या तज्ज्ञांच्या समितीने एप्रिल महिन्यात सादर केलेल्या अहवालात एकमताने ईव्हीएम वापरण्याची शिफारस केली. सन २००० नंतर झालेल्या तीन लोकसभा आणि ११८ विधानसभा निवडणूकीत ईव्हीएमद्वारे मतदान घेण्यात आले. आतापर्यंत २५० कोटी मतदारांनी समाधानकारकरित्या ईव्हीएमद्वारे मतदान केले आहे. २०१८ मध्ये सर्वोच्च न्यायालयाने मतपत्रिकेच्या आधारे मतदान घेण्याबाबतची याचिका खारीज केल्याने यावर्षीच्या लोकसभा निवडणुकामधील मतदानदेखील ईव्हीएमद्वारे होत आहेत. दरम्यान १४ आॅगस्ट २०१३ रोजी ‘द कन्डक्ट आॅफ रुल’ १९६१ मध्ये सुधारणा करून व्हीव्हीपॅट यंत्र वापरण्याचा निर्णय घेण्यात आला. ४ सप्टेंबर २०१३ रोजी नागालँडमधील ५१ -नोकसेन विधानसभा मतदारसंघात सर्वप्रथम व्हीव्हीपॅट यंत्राचा उपयोग करण्यात आला. सर्वोच्च न्यायालयाने ८ आॅक्टोबर २०१३ ला दिलेल्या निर्णयानुसार टप्प्याटप्प्याने व्हीव्हीपॅटचा वापर वाढविण्यात आला. मे २०१७ पासून सर्व निवडणुकांमध्ये आणि लोकसभा निवडणूक २०१९ मध्ये देशात सर्वत्र व्हीव्हीपॅटचा वापर होत आहे. व्हीव्हीपॅट स्लिपवर मत दिलेल्या उमेदवाराचा अनुक्रमांक, नाव आणि चिन्ह प्रदर्शित होते. ही स्लिप पाच वर्षापर्यंत सुस्थितीत राहू शकते. आतापर्यंत १८ कोटी मतदारांनी व्हीव्हीपॅटच्या आधारे मतदान केले आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक