शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:19 IST

पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,.....

विशाल रणदिवे ।ऑनलाईन लोकमतअड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यात दिपसन गायकवाड यांच्या नेतृत्वात २० ग्रामस्थ सहभाग झाले असून ६० ते ७० वर्षे वयोगटातील वृध्द महिलांचाही यात समावेश आहे.केसलवाडा गटग्रामपंचायत मधील गौण खनिज उत्खनन परवाना देताना सरपंच जिजाबाई चंदनबावणे व सचिव आर.खंडाईत यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेऊन परवाना दिल्याचा आरोप सिध्द होऊनही संबंधिताविरूद्ध कुठलिही कारवाई झाली झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सात दिवसाचा अवधी दिला असून त्यात ते दोषी असल्याचेही म्हटले आहे. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात आला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रीया ग्रामस्थां समक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी दिली. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.गौण खनिज उत्खननाचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. हाच ठराव जिल्हा खनिकर्म कार्यालयात पाठविला जातो, असा नियम असताना सुध्दा हा ठराव घेण्यात आला. मासिक सभेत सादर केलेला हा ठराव व ग्रामसभेचा ठराव याची माहिती ज्यावेळी माहिती अधिकाराअंतर्गत ग्रामस्थांनी मागितली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभाग तथा अधिकाºयांना निवेदने दिले. परंतु याविषयी अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे ग्रास्थांनी ही भूमिका घेतल्याचे उपोषणकर्ता दिवसन गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एकीकडे गौण खनिज उत्खणन ठराव कोणत्या पध्दतीने होतात हेच अधिकारी सांगतात. त्यात ग्रामसभा नियमाचे उल्लंघन केले, असेही सांगतात. चौकशी अहवालातही सरपंच तथा ग्रामसेवक यांच्याविरूद्ध दोष सिध्द झाले असतानाही आजपावेतो कारवाई करण्यात आली नाही? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा दिला होता. त्यानंतर तीन महिने संबंधित विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांनी पायपीट केली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.