शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:19 IST

पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,.....

विशाल रणदिवे ।ऑनलाईन लोकमतअड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यात दिपसन गायकवाड यांच्या नेतृत्वात २० ग्रामस्थ सहभाग झाले असून ६० ते ७० वर्षे वयोगटातील वृध्द महिलांचाही यात समावेश आहे.केसलवाडा गटग्रामपंचायत मधील गौण खनिज उत्खनन परवाना देताना सरपंच जिजाबाई चंदनबावणे व सचिव आर.खंडाईत यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेऊन परवाना दिल्याचा आरोप सिध्द होऊनही संबंधिताविरूद्ध कुठलिही कारवाई झाली झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सात दिवसाचा अवधी दिला असून त्यात ते दोषी असल्याचेही म्हटले आहे. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात आला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रीया ग्रामस्थां समक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी दिली. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.गौण खनिज उत्खननाचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. हाच ठराव जिल्हा खनिकर्म कार्यालयात पाठविला जातो, असा नियम असताना सुध्दा हा ठराव घेण्यात आला. मासिक सभेत सादर केलेला हा ठराव व ग्रामसभेचा ठराव याची माहिती ज्यावेळी माहिती अधिकाराअंतर्गत ग्रामस्थांनी मागितली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभाग तथा अधिकाºयांना निवेदने दिले. परंतु याविषयी अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे ग्रास्थांनी ही भूमिका घेतल्याचे उपोषणकर्ता दिवसन गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एकीकडे गौण खनिज उत्खणन ठराव कोणत्या पध्दतीने होतात हेच अधिकारी सांगतात. त्यात ग्रामसभा नियमाचे उल्लंघन केले, असेही सांगतात. चौकशी अहवालातही सरपंच तथा ग्रामसेवक यांच्याविरूद्ध दोष सिध्द झाले असतानाही आजपावेतो कारवाई करण्यात आली नाही? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा दिला होता. त्यानंतर तीन महिने संबंधित विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांनी पायपीट केली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.