शहरं
Join us  
Trending Stories
1
“मी कधीच विरोधासाठी विरोध करणार नाही”; शक्तिपीठ महामार्गावरून शरद पवारांचे मोठे विधान
2
“राज्यात हिंदी सक्ती धोरण उद्धव ठाकरेंनी स्वीकारले, आदित्य ठाकरेंकडून पाठराखण”; कुणाचा दावा?
3
राज ठाकरेंच्या मोर्चात जाणार का? शरद पवारांचे सूचक विधान; म्हणाले, “दोन्ही ठाकरे बंधू...”
4
इंडियन एअर फोर्समध्ये अग्निवीर होण्याची सुवर्णसंधी...! 11 जुलैपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया; जाणून घ्या सविस्तर
5
भारताच्या 'ध्वनि'मुळे शत्रू हादरेल, पाकिस्तान अन् चीनमध्येही उडेल खळबळ! कसं आहे नवं क्षेपणास्त्र?
6
मनसेनं मोर्चाची तारीख बदलली, राज ठाकरेंनी जारी केलं निवेदन, काय म्हणाले? जाणून घ्या...
7
“दिल्लीतील आकाच्या इशाऱ्याने शक्तिपीठ महामार्गाचा घाट, हिंदी सक्तीला विरोधच”; काँग्रेस ठाम
8
आषाढ गुप्त नवरात्र प्रारंभ, वराही देवीची पूजा आणि लवकर विवाह ठरण्यासाठी उपयुक्त मंत्र
9
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
10
"एनआरसी सारखे षड्‍यंत्र..."; बिहारमधील मतदार यादीवरून ममता बॅनर्जी यांचा निवडणूक आयोगाला टोला
11
'अमेरिकेच्या थोबाडीत मारली...', युद्धविराम जाहीर केल्यानंतर खामेनी यांनी केला विजयाचा दावा
12
..त्यामुळे हिंदी सक्तीचे नकोच; राज्य शासनाने हट्ट सोडावा, शरद पवार यांचा सल्ला 
13
“जनतेच्या पैशातून शेतकरी योजना, नरेंद्र मोदी पैसे देतात हा भाजपाचा भ्रम”: हर्षवर्धन सपकाळ
14
इतिहास घडला! 'ड्रॅगन'मधून शुभांशु शुक्ला आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर पोहोचले, १४ दिवस करणार संशोधन
15
"हिंदी कुठल्याही भाषेची शत्रू नाही..."; भाषावादावर पुन्हा एकदा अमित शाह स्पष्ट बोलले
16
जगन्नाथ रथयात्रा 2025: लाखो भाविक अनुभवतात अद्भूत सोहळा; पाहा, प्रथा, परंपरा, महात्म्य अन् महत्त्व
17
२०३३ पर्यंत भारतात अजून काय-काय घडेल? जगन्नाथ पुरी मंदिराचे मोठे भाकित; पाहा, १० बडे संकेत
18
२८ जुलैपर्यंत मंगळ राहु-केतु अशुभ योग: ८ राशींना बंपर लाभ, बक्कळ पैसा; शुभ-कल्याणाचा काळ!
19
दोन दिग्गज एकत्र आले; अदानी-अंबानी यांच्यात मोठा करार, 'या' क्षेत्रात क्रांती घडणार...
20
"राज्यात मराठीच सक्तीची, पण..."; त्रिभाषा सूत्रावरून भाजपाने स्पष्ट केली भूमिका

ग्रामस्थांनी ठोकले केसलवाडा ग्रामपंचायतीला कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 23, 2018 00:19 IST

पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी,.....

विशाल रणदिवे ।ऑनलाईन लोकमतअड्याळ : पवनी तालुक्यातील केसलवाडा गटग्रामपंचायतने दिलेला गौण खनिज उत्खनन परवाना रद्द करण्यात यावा आणि सरपंच व सचिवाविरूद्ध कारवाई करण्यात यावी, या मागणीसाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत कार्यालयाला कुलूप ठोकून आमरण उपोषणाचा मार्ग अवलंबिला आहे. यात दिपसन गायकवाड यांच्या नेतृत्वात २० ग्रामस्थ सहभाग झाले असून ६० ते ७० वर्षे वयोगटातील वृध्द महिलांचाही यात समावेश आहे.केसलवाडा गटग्रामपंचायत मधील गौण खनिज उत्खनन परवाना देताना सरपंच जिजाबाई चंदनबावणे व सचिव आर.खंडाईत यांनी ग्रामस्थांना अंधारात ठेऊन परवाना दिल्याचा आरोप सिध्द होऊनही संबंधिताविरूद्ध कुठलिही कारवाई झाली झाली नाही. त्यामुळे ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले आहे.मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिलेल्या कारणे दाखवा नोटीसमध्ये सात दिवसाचा अवधी दिला असून त्यात ते दोषी असल्याचेही म्हटले आहे. हा विषय गंभीररित्या हाताळण्यात आला असता तर ही वेळ आली नसती, अशा प्रतिक्रीया ग्रामस्थां समक्ष जिल्हा परिषद सदस्य रेखा भुसारी यांनी दिली. याप्रकरणात गैरव्यवहार झाल्याची चर्चा आहे.गौण खनिज उत्खननाचा ठराव ग्रामसभेत घेतला जातो. हाच ठराव जिल्हा खनिकर्म कार्यालयात पाठविला जातो, असा नियम असताना सुध्दा हा ठराव घेण्यात आला. मासिक सभेत सादर केलेला हा ठराव व ग्रामसभेचा ठराव याची माहिती ज्यावेळी माहिती अधिकाराअंतर्गत ग्रामस्थांनी मागितली. त्यावेळी हा प्रकार उघडकीस आला. यासाठी ग्रामस्थांनी संबंधित विभाग तथा अधिकाºयांना निवेदने दिले. परंतु याविषयी अधिकारी अनभिज्ञ असल्यामुळे ग्रास्थांनी ही भूमिका घेतल्याचे उपोषणकर्ता दिवसन गायकवाड यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.एकीकडे गौण खनिज उत्खणन ठराव कोणत्या पध्दतीने होतात हेच अधिकारी सांगतात. त्यात ग्रामसभा नियमाचे उल्लंघन केले, असेही सांगतात. चौकशी अहवालातही सरपंच तथा ग्रामसेवक यांच्याविरूद्ध दोष सिध्द झाले असतानाही आजपावेतो कारवाई करण्यात आली नाही? असा प्रश्न करून ग्रामस्थांनी आमरण उपोषणाचा दिला होता. त्यानंतर तीन महिने संबंधित विभागाच्या कार्यालयात ग्रामस्थांनी पायपीट केली. परंतु न्याय मिळाला नाही. त्यामुळे न्याय मिळेपर्यंत हे उपोषण सुरूच राहणार असल्याचे उपोषणकर्त्यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.