शहरं
Join us  
Trending Stories
1
‘दोन शून्यां’ची बेरीज केली, त्यावर कितीही शून्य जोडले तरी…; भाजपाचा ठाकरे बंधूंना खोचक टोला
2
CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या व्यक्तीचा फोटो आला समोर, आरोपी गुजरातचा रहिवासी
3
India China Talks: व्यापारापासून ते थेट उड्डाणांपर्यंत; भारत-चीन यांच्यातील चर्चेत अनेक समस्यांवर निघाला तोडगा
4
BMC: पावसाळ्यात कुठे अडकलात तर काय कराल? मुंबई महानगरपालिकेची महत्त्वाची पोस्ट!
5
'हिला भुतांनी पछाडलेले आहे'; तांत्रिक गरम सळीने चटके देत राहिला, वेदनेने मुलीचा मृत्यू झाला
6
खळबळजनक! बीडमधील कोर्टात सरकारी वकिलाने स्वतःला संपवलं; कारण काय?
7
"चहलने तो टीशर्ट स्टंट खरंच केला? माझा विश्वासच बसत नव्हता..", धनश्री वर्माने व्यक्त केल्या भावना
8
पंतप्रधान अन् मुख्यमंत्र्यांनाही पदावरुन हटवण्याची तरतूद; केंद्र सरकारच्या नवीन विधेयकात नेमकं काय?
9
BEST Election Results: ना ठाकरे बंधू, ना भाजपा; शशांक राव यांच्या पॅनलला १४ जागा, आकडेवारी पाहाच
10
आधी बोलत होता, अचानक हात खेचला, धक्का दिला; रेखा गुप्ता यांच्यावर कसा हल्ला झाला? प्रत्यक्षदर्शी म्हणाले...
11
Toll: खराब रस्त्यांवर टोल नाही; सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय!
12
दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्यावर हल्ला; जनसुनावणीदरम्यान कागद हातात दिला, केस ओढले अन्....
13
रात्रीच्या वेळी शेतामध्ये प्रियकरासोबत आक्षेपार्ह अवस्थेत होती मुलगी; मागून गेलेल्या वडिलांनी बघितलं, उचललं टोकाचं पाऊल अन्...
14
फक्त ३ वर्षात पैसे दुप्पट! FD पेक्षाही जास्त परतावा देणारे टॉप ५ म्युच्युअल फंड, १० वर्षांत कोट्यधीश
15
व्हाट्सॲप युजर्ससाठी महत्त्वाची बातमी: 'Meta AI' मुळे ग्रुप चॅट्सची प्रायव्हसी धोक्यात? पेटीएम संस्थापकांचा दावा
16
बेस्ट निवडणूक २०२५: शशांक राव-महायुती पॅनलची बाजी, ठाकरे बंधू चितपट; विजयी उमेदवारांची यादी
17
HDFC बँकेच्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी! २२-२३ ऑगस्टला 'या' ऑनलाईन सेवा राहणार बंद
18
BEST Election Results: 'ब्रँडचे बॉस एकही जागा जिंकले नाहीत'; बेस्ट निवडणुकीतील पराभवावरुन ठाकरे बंधूंना भाजपचा टोला
19
India-China Trade: भारत की चीन.. या मैत्रीचा सर्वाधिक फायदा कोणाला होणार? काय सांगते आकडेवारी
20
महाराष्ट्र जलमय... पिके खरडली, घरे बुडाली; मराठवाड्यात ११ जीव गेले, ४९८ जनावरे दगावली

साकोली उपविभागातील भारनियमन बंद

By admin | Updated: March 24, 2016 01:14 IST

अचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला. आ.बाळा काशीवार यांनी

संजय साठवणे ल्ल भंडाराअचानक सुरु झालेल्या भारनियमनामुळे धास्तावलेल्या शेतकऱ्यांना अखेर आज दिलासा मिळाला. आ.बाळा काशीवार यांनी यासंदर्भात उर्जामंत्री बावनकुळे यांच्याशी चर्चा करून साकोली लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यातील भारनियमन पूर्णत: बंद करून शेतकऱ्यांना दिलासा दिला. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे. साकोली विधानसभा क्षेत्रांतर्गत येणाऱ्या साकोली, लाखनी व लाखांदूर या तिन्ही तालुक्यात दि. २० मार्चपासून अचानक कृषीपंपासाठी वीज वितरण कंपनीने १६ तासांचे भारनियमन सुरु केले होते. त्यामुळे फक्त ८ तासांमध्ये शेतीला पंपाचे पाणी होणे अशक्य होते. कारण आता धानपिकाला पाण्याची अत्यंत गरज असताना भारनियमनाचा फटका नक्कीच धानपिकाला बसण्याची शक्यता नाकारता येत नव्हती. सदर भारनियमन तात्काळ बंद करण्यात यावे यासाठी आ.काशीवार हे दि. २१ मार्च ला मुंबई येथे रवाना झाले. भारनियमनाच्या मुद्यावर त्यांनी ऊर्जामंत्री बावनकुळे यांची भेट घेऊन शेतकऱ्यांच्या समस्या मांडल्या. साकोली उपविभागासह अन्य भागातील भारनियमन बंद झाले नाही तर धानपिक पूर्णत: करपल्याशिवाय राहणार नाही. भंडारा जिल्हा भाताचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असून शेतकऱ्यांना पर्यायी रोजगाराची सोय नसल्याने त्याच्यासमोर मोठी आर्थिक टंचाई निर्माण होईल. यावर उर्जामंत्र्यांनीही तात्काळ निर्णय घेतला व आ.काशीवार यांची मागणी पूर्ण करीत साकोली विधानसभा क्षेत्रातील भारनियमन पूर्णत: बंद करण्याचे आदेश वीज वितरण कंपनीला दिले.शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी४भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी असून शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ मार्गी लावू. मात्र काही राजकीय मंडळी शेतकऱ्यांना सरकारच्या विरोधात दिशाभूल करण्याचा प्रयत्न करीत आहेत. शेतकऱ्यांनी अशा भूलथापांना बळी न पडता खंबीरपणे राहावे. भाजप सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, अशी प्रतिक्रीया आमदार काशीवार यांनी लोकमतशी बोलताना दिली.आंदोलनाला यश४भारनियमन बंद करण्यात यावे यासाठी काल सेंदूरवाफा लवारी, उमरी, परसोडी या गावातील शेतकऱ्यांनी वीज वितरण कंपनीवर मोर्चा आणला होता. या मोर्चाचे रुपांतर धरणे आंदोलनात झाले होते. मात्र शेवटी कार्यकारी अभियंता धनविजय यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून १६ तासांचे भारनियमन ८ तासांवर आणले होते.