शहरं
Join us  
Trending Stories
1
युपीतील निवडणुकीत भाजपा ५ व्या क्रमांकावर, अपक्षांनाही जास्त मते; सपाचा दणदणीत विजय
2
“सरन्यायाधीश भूषण गवई यांना हात जोडून विनंती आहे की...”; उद्धव ठाकरेंचे साकडे, प्रकरण काय?
3
ICICI बँकेचा यु-टर्न; अकाऊंटमध्ये ५० हजार रुपये नाही तर 'इतकी' रक्कम ठेवावी लागणार
4
७९ वर्षांत असे दोन पंतप्रधान होऊन गेले, ज्यांच्या भाग्यात लाल किल्ल्यावरील स्वातंत्र्य दिन आलाच नाही...
5
नवाब मलिकांवर मोठी जबाबदारी; मुंबई महापालिका निवडणुकीबाबत अजित पवारांचा महत्त्वाचा निर्णय
6
Viral Video : काय म्हणावं यांना! लाबुबू डॉलची पूजा करू लागली महिला, म्हणाली "ही बाहुली नाही, तर..."
7
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Nifty २४,६०० च्या वर, IT-फार्मा शेअर्समध्ये मोठी खरेदी
8
राष्ट्रवादीमध्ये नव्या 'दादां'चा उदय! रोहित पवार अजितदादांची पोकळी भरून काढत आहेत का?
9
'फुले' सिनेमाच्या अपयशावर प्रतीक गांधीने पहिल्यांदाच दिली प्रतिक्रिया; म्हणाला, "जितकी अपेक्षा..."
10
पाकिस्तानचं स्वातंत्र्यदिनी हे कसलं सेलिब्रेशन... हवेत गोळीबार, तिघांचा मृत्यू, ६० जखमी
11
मतदार यादी कायमसाठी एकसारखीच राहू शकत नाही, पुनरीक्षण आवश्यक; सर्वोच्च न्यायालयाचे निरीक्षण
12
शिल्पा शिरोडकरच्या कारला बसची धडक, अभिनेत्रीने केली तक्रार; तर बस मालकांनी केली अरेरावी
13
आजचे राशीभविष्य : गुरुवार १४ ऑगस्ट २०२५; या ४ राशीच्या लोकांना अचानक धनलाभ संभवतो, काहींना मित्रांकडूनही लाभ होतील
14
लंडनच्या भूमीत १८ ऑगस्टला होणार ऐतिहासिक 'लोकमत ग्लोबल इकॉनॉमिक कन्व्हेन्शन'
15
मंत्रालयामधील मोकळ्या जागेवर मंत्र्यांचेच अतिक्रमण; सामान्यांना बसण्यासाठीच्या जागा व्यापल्या
16
फडणवीस, शिंदे, ठाकरे आज एका व्यासपीठावर..?; बीडीडीवासीयांचे पाऊल आज नव्या घरात
17
वसई-विरारचे माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांना अटक; ४१ अवैध इमारती भोवल्या, ईडीची कारवाई
18
मुनीर यांचा बाष्कळ थयथयाट, भारताविषयी वक्तव्ये करण्याआधी 'आका'ची परवानगी घेतली का?
19
कबुतरांना खाद्यबंदी कायम; 'तुम्ही एकांगी निर्णय घेऊ शकत नाही', हायकोर्टाने मुंबई महापालिकेला फटकारले
20
महाभियोग टाळण्यास राजीनामा हा एकच पर्याय; अन्यथा न्या. वर्मांचे पेन्शन, इतर लाभही जाणार

धान पिकाला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2018 22:09 IST

हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.

ठळक मुद्देहवामानाचा अंदाज तंतोतंत खरा : तीन आठवड्यानंतर पाऊस बरसला

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : हवामान खात्याने वर्तविलेला अंदाज तंतोतंत खरा ठरत शुक्रवारी सकाळपासून जिल्ह्यात पावसाने दमदार हजेरी लावली. नऊ तासात २४.७७ मी.मी. पाऊस कोसळल्याने धान पिकाला जीवदान मिळाले. गत तीन आठवड्यापासून पावसाने दडी मारल्याने शेतकऱ्यांचा जीव टांगणीला लागला होता. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले.जिल्ह्यात गत २६ आॅगस्टनंतर पावसाने दडी मारली होती. त्यामुळे धान पीक धोक्यात आले होते. तापमानातही प्रचंड वाढ झाली होती. पावसासाठी शेतकºयांचे डोळे आकाशाकडे लागले होते. अशातच दोन दिवसापुर्वी हवामान खात्याने भंडारासह विदर्भात २१ सप्टेंबरपासून पाऊस कोसळेल, असा अंदाज वर्तविला.नेहमी अंदाज चुकणाºया हवामान खात्याचा अंदाज मात्र यावेळेस तंतोतंत खरा ठरला आणि गुरूवारी रात्रीपासूनच आकाशात ढग जमू लागले. रात्री ९ वाजताच्या सुमारास हलक्या पावसाच्या सरी कोसळल्या. शुक्रवारी सकाळी ९ वाजतापासून जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला. सुरूवातीला रिमझिम असलेला पाऊस दुपारी १२ नंतर जोरदार बरसायला लागला.पाण्यासाठी आसुसलेला धान या पावसाने ओलाचिंब झाला. माना टाकनारे पीक तरारून आले. शेतकºयांच्या चेहºयावरही समाधान फुलले. जिल्ह्यात एक लाख ७४ हजार हेक्टरवरील धान पीक पावसाअभावी धोक्यात आले होते. दोन पाण्याने धान हातचा जाण्याची भिती निर्माण झाली होती. मात्र शुक्रवारी झालेल्या पावसाने धान पीकाला जीवदान मिळाले.जिल्ह्यातील सातही तालुक्यात पावसाने हजेरी लावली. सर्वाधिक पाऊस भंडारा तालुक्यातील शहापूर मंडळात ५५ मी.मी. कोसळला तर तुमसर तालुक्याच्या गर्रा येथे ५० मी.मी. पावसाची नोंद झाली. सर्वात कमी पाऊस लाखांदूर तालुक्याच्या सानगडी सर्कलमध्ये ६ मी.मी. झाला. शुक्रवारी सकाळी ८ वाजतापासून सायंकाळपर्यंत जिल्ह्यात २४.८२ मी.मी. पावसाची नोंद झाल्याची माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी दिली.भंडारा शहरात दुपारी १२ वाजताच्या सुमारास एक तास धुवाधार पाऊस कोसळला. शहराच्या गांधी चौक, खात रोड, खांबतलाव, बसस्थानक परिसरात पावसाचे पाणी जमा झाले होते.पावसाने लोंबी भरण्यास मदतपवनी : सध्या हलक्या प्रतीचे भात पीक लोंबीवर आले आहे. लोंबी भरण्यासाठी पावसाची नितांत गरज होती. योग्यवेळी पवनी तालुक्यात पाऊस बरसल्याने आता हलक्या प्रतीचे भात पीक चांगले होईल, असे शेतकºयांना वाटत आहे.साकोलीत दमदार हजेरीसाकोली : दीर्घ प्रतिक्षेनंतर पावसाचे आमगण झाल्याने साकोली तालुक्यातील शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसून आले. शुक्रवारी सकाळी ११ वाजता पावसाला सुरूवात झाली. हलक्या आणि उच्च प्रतिच्या धानासाठी पाऊस अत्यंत आवश्यक होता. शुक्रवारी बरसलेल्या पावसाने शेतकºयांनी निश्वास सोडला.लाखनीत जनजीवन प्रभावितलाखनी : लाखनी शहरासह तालुक्यात गुरूवारच्या रात्री पावसाची सर कोसळली. शुक्रवारी सकाळी जोरदार पाऊस झाल्याने जनजीवन प्रभावित झाले. परंतु शेतकºयांच्या चेहºयावर समाधान दिसत होते.नऊ तासात २४.७७ मिमी पाऊसजिल्ह्यात शुक्रवारी सकाळी ८ वाजेपासून सायंकाळपर्यंत २४.७७ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. त्यात सर्वाधिक पाऊस लाखनी तालुक्यात ४५.५८ मिमी झाला. त्याखालोखाल पवनी ३०.४ मिमी, तुमसर २९ मिमी, भंडारा २७ मिमी, मोहाडी १६ मिमी, लाखांदूर १५ मिमी आणि साकोली १०.२ मिमी पावसाची नोंद झाली. या पावसाने कुठेही नुकसान झाल्याची माहिती नाही.तापमानात १० अंशाने घटगुरूवारी रात्रीपासून ढगाळ वातावरण आणि वेगाने वारा वाहायला लागल्याने तापमानात मोठी घट दिसून आली. गुरूवारी दिवसभºयाचे तापमान ३६ अंश सेल्सिअस नोंदविण्यात आले होते. शुक्रवारी झालेल्या पावसाने १० अंश खाली येवून तापमान २६ अंशावर आले. यामुळे प्रचंड उकाड्यातून नागरिकांची सुटका झाली.