शहरं
Join us  
Trending Stories
1
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
2
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
3
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा
4
इन्स्टाग्राम डिलीट केलं, सोशल मीडियापासून स्वतःला ठेवलं दूर; UPSC मध्ये नेत्रदिपक कामगिरी
5
पहलगाम हल्ला: “मागच्याला गोळी घातली, मी कलमा वाचला अन् वाचलो”; प्रोफेसरांनी सांगितली आपबीती
6
“अशा भ्याड हल्ल्यांनी घाबरणार नाही, असे प्रत्युत्तर देऊ की...”; राजनाथ सिंह यांनी ठणकावले
7
पैसा ही पैसा होगा... सौरव गांगुलीला मिळणार तब्बल १२५ कोटी रूपये! महत्त्वाच्या करारावर झाली स्वाक्षरी
8
Swami Samartha: 'स्वामी' शब्दाचा 'हा' अर्थ जाणून घेतलात तर तारक मंत्राचा अर्थही नव्याने उलगडेल हे नक्की!
9
हॉस्पिटलमध्ये मनीषाला बळ मिळालं डॉक्टरांच्या कुटुंबातील सदस्याकडून; आत्महत्येच्या दिवशी डॉक्टरांचा चेहरा पडला होता
10
पहलगाम हल्ल्याचा हिशोब होणार! राजनाथ सिंह यांची दिल्लीत उच्चस्तरीय बैठक; तिन्ही दलांच्या प्रमुखांची उपस्थिती
11
Pahalgam Attack: दहशतवादी हल्ल्यानंतर शाहरुख हळहळला, भाईजान म्हणाला- "स्वर्गासारखं काश्मीर नरकात बदलत आहे..."
12
ट्रम्प टॅरिफची दहशत संपली? निफ्टी ४ महिन्यांच्या शिखरावर, आयटीमध्येही तेजी परतली
13
Pahalgam Terror Attack : हृदयद्रावक! साता जन्माची साथ ७ दिवसांत सुटली; रडली, शवपेटीला मिठी मारली, सॅल्यूट करुन म्हणाली...
14
दहशतवादी हल्ल्यानंतर भारताकडून कारवाईची भीती, पाकिस्तानचा शेअर बाजार आपटला
15
Marriage Ritual: लग्नांनंतर वर्षभर उलटे मंगळसूत्र घालण्यामागे काय आहे कारण? जाणून घ्या!
16
हे पहिल्यांदाच घडलं.. गौतम अदानींचा 'या' व्यवसायातून काढता पाय; सुनील मित्तल यांना विकण्याची तयारी
17
Post Office ची 'ही' स्कीम करणार तुमचे पैसे डबल, जाणून घ्या संपूर्ण डिटेल्स
18
महाराष्ट्र, गुजरात, कर्नाटक...पहलगाम हल्ल्यात कोणत्या राज्यातील किती पर्यटकांचा मृत्यू? पाहा यादी
19
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत मोठी कारवाई करणार; 'हे' 4 संकेत काय सांगतात..?
20
पहलगाम हल्ला: दहशतवाद्यांनी मुस्लीम तरुणाचीही केली हत्या; कुटुंबाचा टाहो, म्हणाले, 'आम्हाला न्याय हवा'

शिवभोजन थाळीसाठी भंडारात लाभार्थ्यांच्या रांगा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2020 06:00 IST

भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते.

ठळक मुद्देशहरात दोन ठिकाणी सुविधा : दहा रूपयात दोन पोळ्या, वरण आणि भाजी

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी शिवभोजन थाली योजनेला भंडारा शहरात लाभार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. दहा रूपयात मिळणाऱ्या थाळीच्या नोंदणीसाठी रांगा लागल्याचे शहरातील दोनही केंद्रावर दिसून येत आहे. याठिकाणी लाभार्थ्यांना दोन पोळ्या, वरण आणि भाजी दिली जाते. मात्र दोनही ठिकाणी प्रत्येकी १०० थाळीचीच व्यवस्था असल्याने अनेकांना या योजनेपासून वंचित रहावे लागत आहे.भंडारा शहरात महसूल विभाग आणि जिल्हा परिषदेच्या उपहारगृहात शिवभोजन थालीची व्यवस्था करण्यात आली आहे. त्रिमुर्ती चौक स्थित महसूल उपहारगृहाचे संचालक राहूल लिमजे म्हणाले, आम्हाला एका दिवसासाठी १०० थाळीचे लक्ष दिले आहे. परंतु आमच्याकडे त्यापेक्षा अधिक लाभार्थी येतात. दुपारी १२ ते २ या वेळात शिवभोजन थाली दिली जाते. मात्र त्यासाठी अ‍ॅपवर नोंदणी केली जाते. प्रथम येणाऱ्यास प्राधान्य दिले जाते. येथील भोजनाचा दर्जाही उत्कृष्ठ असल्याचे त्यांनी सांगितले. एक थाळी ५० रूपयात पडत असून यासाठी शासनाकडून ४० रूपये प्रती थाळी अनुदान मिळणार आहे. गोरगरीबांसाठी ही योजना असल्याचे त्यांनी सांगितले.जिल्हा परिषदेच्या उपहारगृहातही अशीच अवस्था आहे. येथेही दुपारी १२ वाजतापासून शिवभोजन थाळीचा लाभ घेण्यासाठी रांग दिसून येते. एका थाळीत ३० ग्रॅम वजनाच्या दोन पोळ्या, १५० ग्रॅम वरण आणि १५० ग्रॅम भाजी दिली जाते. सदर केंद्र नवप्रभा लोकसंचालित साधन केंद्राद्वारा संचालन केले जाते. या केंद्राच्या संचालिका रंजना खोब्रागडे म्हणाल्या, अतिशय स्वस्त दरात भोजन उपलब्ध होत असल्याने वेळेपुर्वीच अनेकजण येथे रांग लावून असतात.महसूल उपहारगृहात गत दोन दिवसांपासून भोजन करण्यासाठी येणाºया शहापूर येथील विजया अवाळ आणि लाखनीच्या पूनम येडेकर म्हणाल्या, येथे मिळणारे जेवण स्वादिष्ट असते. बाहेर मिळणाºया नास्त्याच्या किंमतीत येथे जेवण होते. तर आॅटो रिक्षा चालक सचिन बागडे म्हणाले, या योजनेने गोरगरीबांना वेळेवर दोन घास मिळतील.सध्या या योजनेंतर्गत प्रत्येकी १०० म्हणजे दिवसभरात २०० जणांना शिवथाळी दिली जाते. परंतु अनेकांच्या पदरी निराशा येते. त्यामुळे अतिरिक्त शिवभोजन थाळी उघडण्याची गरज आहे.अ‍ॅपच्या माध्यमातून पारदर्शकताशिवभोजन थाळी वितरणात पारदर्शकता राखली जाते. येथे येणाºया प्रत्येकाची नोंदणी अ‍ॅपच्या माध्यमातून घेतली जाते. एवढेच नाही तर अ‍ॅपवर लाभार्थ्याचा फोटोही अपलोड केला जातो. ज्या लाभार्थ्याचा फोटो अ‍ॅपमध्ये अपलोड होता त्यालाच थाळी दिली जाते. आणि केंद्र चालकांना अनुदान मिळते. गुगल मॅप लोकेशनद्वारेही यावर लक्ष ठेवले जात आहे.

टॅग्स :shiv bhojnalayaशिवभोजनालय