शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जिल्ह्यात हलका धान मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.

ठळक मुद्देपरतीचा पाऊस : कडपा फेरण्याच्या कामात शेतकरी व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने हलक्या प्रतीच्या धान मातीमोल झाला असून शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खचलेला शेतकरी कडपा फेरण्याच्या कामात व्यस्त असून पीक विम्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करीत आहे. या अवकाळी संकटाने जिल्ह्यातील धान उत्पादकांचा संपुर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला असून वर्षभराची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.दररोज ढगाळ वातावरण राहत असल्याने पावसाच्या भीतीने शेतकऱ्यानी कापणीस वेग दिला आहे. मळणीच्या कामालाही गती आली आहे. परंतु परतीचा पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. बुधवारी दुपारी साकोली तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गत पंधरा दिवसात झालेल्या पावसात सर्वाधिक नुकसान हलक्या धानाचे झाले आहे. धान काळेकुट्ट झाले असून या धानाला बाजारात कवडीची किंमत मिळणार नाही.भारी प्रतीचे धान म्हणजे जास्त कालावधीचा धान सध्या निसवण्याच्या अवस्थेत आहे.परतीचा पाऊस परतण्याचे नाव घेईना!परतीचा पावसाने शेतकऱ्यांना रडवायचे ठरविलेले दिसते. तो परतीचे नाव घेत नाही. धानाचे प्रचंड नुकसान करणारा हा पाऊस प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असूनही माघारी जात नाही. शेतात सर्वत्र भिजलेले धानाचे कडपे दिसत आहे. दररोज आकाशात ढग पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. परतीचा पाऊस कधी परतणार असा सवाल शेतकरी करीत आहे.विमा दाव्यासाठी धावपळपरतीच्या पावसाने नुकसान झालेल्या धानाचा विमा मिळावा म्हणून शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे. विमा काढताना संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही आता दावा दाखल करण्यासाठी पुन्हा तीच कागदपत्रे कंपनीचे प्रतिनिधी मागतांना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाले असले तरी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात यायला तयार नाही. दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच अर्ज करुन विमा दावा सादर करण्याचे आवाहन करीत आहे.संपूर्ण कुटुंब राबते शेतातपावसामुळे ओला झालेला कळपा वाळविण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. मजूर मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळी शेतावर कडपा फेरण्याचे काम करताना दिसत आहे. लहान मुलांसह वयोवृध्दही या कामाला हातभार लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. पावसाने सर्वांनाच कामाला लावल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी