शहरं
Join us  
Trending Stories
1
लिंगायत समाजाला हिंदू धर्माचा भाग मानू नका, कर्नाटकात जात सर्वेक्षणापूर्वी मोठी मागणी
2
उपराष्ट्रपतिपदावर कोण बसणार? एनडीए खासदारांनी घेतले प्रशिक्षण, तर इंडिया आघाडीचे आज मॉक पोल
3
Ganesh Visarjan 2025: राज्यात गणेश विसर्जनावेळी ९ जणांचा बुडून मृत्यू; १२ जण बेपत्ता
4
Maratha Reservation: दसरा मेळाव्यात सरकारविरोधात...; हैदराबाद गॅझेटवरून जरांगेंचा सरकारला इशारा
5
GST Updates: रोजच्या वापराच्या वस्तू होणार स्वस्त; कर कपातीचा लाभ थेट ग्राहकांना मिळणार
6
Donald Trump: "हा शेवटचा इशारा, नाही तर...", डोनाल्ड ट्रम्प यांनी आता कुणाला दिली धमकी?
7
"मी 'सिंगल मदर' नाही...", एक्स पतीच्या आयुष्यात नव्या प्रेमाची एन्ट्री; ईशा देओलची पहिली प्रतिक्रिया
8
दहशतवादी कट प्रकरणात मोठी कारवाई, जम्मू-काश्मीरसह ५ राज्यांमध्ये एनआयएची धाड
9
Bank of Baroda मध्ये जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹२३,५०८ चं फिक्स व्याज, गॅरेंटीसह मिळेल रक्कम
10
W W W ... पाकिस्तानच्या मोहम्मद नवाजची हॅटट्रिक, Asia Cupआधी उडवली फलंदाजांची झोप
11
Post Office च्या 'या' स्कीममध्ये वर्षाला ₹५०,००० जमा करा; मॅच्युरिटीवर मिळतील १३ लाख, व्हाल मालामाल
12
ट्रम्प यांच्या टॅरिफ'वर तोडगा काढण्यासाठी भारत अन् युरोपियन युनियन एकत्र! 'एफटीए'सह अनेक मुद्द्यांवर विशेष प्लान बनवला
13
US Open 2025: अल्काराझचं राज्य! हार्ड कोर्टवर सिनरला मात देत अमेरिकन ओपन जेतेपदासह नंबर वनवर कब्जा
14
"गुजरातवरुन आणलेला महागडा तराफा राजाला आवडला नसेल...", 'लालबागचा राजा' विसर्जनावरुन मराठी अभिनेत्रीची खोचक पोस्ट
15
भरती-ओहोटीत रेंगाळला लालबागचा राजा, ३६ तासांनी विसर्जन; राजाला निरोप देण्यासाठी भाविकांचे प्राण कंठाशी
16
Crime: कचऱ्याच्या ढिगाऱ्यात आढळला अज्ञात महिलेचा अर्धवट जळालेला मृतदेह, परिसरात खळबळ!
17
जेद्दाह किनाऱ्याजवळ केबल तुटली, इंटरनेटचा स्पीड झाला कमी
18
जीएसटी कपातीने २ लाख कोटींचा सरकारला तोटा? श्रीमंत-गरीब दरी वाढल्याचा फटका बसणार
19
अग्रलेख: माफियांपुढे ‘दादा’गिरी शरण, योग्य तो बोध घ्यावा
20
दिवाळीत मध्य रेल्वेच्या ९४४ एक्स्प्रेस गाड्या धावणार; प्रवाशांच्या सुविधांसाठी अनारक्षित व्यवस्था

जिल्ह्यात हलका धान मातीमोल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 1, 2019 06:00 IST

गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.

ठळक मुद्देपरतीचा पाऊस : कडपा फेरण्याच्या कामात शेतकरी व्यस्त

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : परतीच्या पावसाने हलक्या प्रतीच्या धान मातीमोल झाला असून शेतकऱ्यांचे अक्षरश: कंबरडे मोडले आहे. खचलेला शेतकरी कडपा फेरण्याच्या कामात व्यस्त असून पीक विम्यासाठी कागदपत्राची जुळवाजुळव करीत आहे. या अवकाळी संकटाने जिल्ह्यातील धान उत्पादकांचा संपुर्ण हंगाम उद्ध्वस्त झाला असून वर्षभराची चिंता शेतकऱ्यांना लागली आहे.गत पंधरा दिवसांपासून जिल्ह्यात परतीच्या पावसाने धुमाकूळ घातला आहे. साकोली, तुमसर, लाखांदूर, लाखनी, पवनी, भंडारा, मोहाडी या तालुक्यात परतीच्या पावसाने कहर केला आहे. हातातोंडाशी आलेला धान पावसात उद्ध्वस्त झाला. दिवाळीच्या आधीपासून कोसळत असलेल्या या पावसाने जिल्ह्यातील शेकडो हेक्टरवरील धान ओला झाला. कापलेला धानाचा कळपा पावसात भिजून त्याला आता अंकर फुटले आहे.दररोज ढगाळ वातावरण राहत असल्याने पावसाच्या भीतीने शेतकऱ्यानी कापणीस वेग दिला आहे. मळणीच्या कामालाही गती आली आहे. परंतु परतीचा पाऊस शेतकऱ्यांचा पिच्छा सोडायला तयार नाही. बुधवारी दुपारी साकोली तालुक्यात पावसाने जोरदार हजेरी लावली. गत पंधरा दिवसात झालेल्या पावसात सर्वाधिक नुकसान हलक्या धानाचे झाले आहे. धान काळेकुट्ट झाले असून या धानाला बाजारात कवडीची किंमत मिळणार नाही.भारी प्रतीचे धान म्हणजे जास्त कालावधीचा धान सध्या निसवण्याच्या अवस्थेत आहे.परतीचा पाऊस परतण्याचे नाव घेईना!परतीचा पावसाने शेतकऱ्यांना रडवायचे ठरविलेले दिसते. तो परतीचे नाव घेत नाही. धानाचे प्रचंड नुकसान करणारा हा पाऊस प्रत्येक शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी असूनही माघारी जात नाही. शेतात सर्वत्र भिजलेले धानाचे कडपे दिसत आहे. दररोज आकाशात ढग पाहून शेतकऱ्यांचा जीव कासावीस होत आहे. परतीचा पाऊस कधी परतणार असा सवाल शेतकरी करीत आहे.विमा दाव्यासाठी धावपळपरतीच्या पावसाने नुकसान झालेल्या धानाचा विमा मिळावा म्हणून शेतकरी धावपळ करतांना दिसत आहे. विमा काढताना संपूर्ण कागदपत्रांची पुर्तता केल्यानंतरही आता दावा दाखल करण्यासाठी पुन्हा तीच कागदपत्रे कंपनीचे प्रतिनिधी मागतांना दिसत आहे. अनेक शेतकऱ्यांच्या शेतात प्रचंड नुकसान झाले असले तरी विमा कंपनीचे प्रतिनिधी शेतात यायला तयार नाही. दुसरीकडे कृषी विभाग शेतकऱ्यांनाच अर्ज करुन विमा दावा सादर करण्याचे आवाहन करीत आहे.संपूर्ण कुटुंब राबते शेतातपावसामुळे ओला झालेला कळपा वाळविण्यासाठी शेतकºयांना मोठी कसरत करावी लागत आहे. मजूर मिळत नसल्याने घरातील सर्व मंडळी शेतावर कडपा फेरण्याचे काम करताना दिसत आहे. लहान मुलांसह वयोवृध्दही या कामाला हातभार लावत असल्याचे चित्र जिल्ह्यात सर्वत्र दिसत आहे. पावसाने सर्वांनाच कामाला लावल्याचे दिसत आहे.

टॅग्स :agricultureशेतीFarmerशेतकरी