शहरं
Join us  
Trending Stories
1
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
2
पतीने 'ती' गोष्ट लपवली; पत्नीला कळताच सरळ पोलीस स्टेशनला गेली! तक्रार करत म्हणाली... 
3
६००० कर्मचाऱ्यांना काढूनही 'या' कंपनीचं मन भरलं नाही, आता पुन्हा एकदा कपातीची टांगती तलवार
4
"राज-उद्धव ठाकरे बंधूंनी कितीही कार्यक्रम घ्या, मुंबईचा महापौर उत्तर भारतीयच होणार"
5
"मला विश्वास बसत नाहीये...", शेफाली जरीवालाच्या निधनाने श्रेयस तळपदेला बसला मोठा धक्का
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
"त्यावेळी आम्ही मनात आणलं असतं तर..."; महापौरपदाबाबत देवेंद्र फडणवीसांचा पहिल्यांदाच खुलासा
8
Ashadhi Ekadashi 2025: तुकाराम महाराजांना बाप्पाच्या मूर्तीत दिसले पांडुरंगाचे रूप; तेव्हा...
9
ओमानचा ऐतिहासिक निर्णय; ७ लाख भारतीयांवर थेट परिणाम होणार!
10
रिक्षाचालकाने शेअर केला असा व्हिडीओ, थेट अमेरिकेतून भारतात पोलिसांकडे आली तक्रार, त्यानंतर...  
11
ENG W vs IND W : स्मृती मानधना सगळ्यात भारी! जाणून घ्या भारत-इंग्लंड यांच्यातील खास रेकॉर्ड
12
कोल्हापुरी चप्पलेतून कर्रकर्र आवाज का येतो, तुम्हाला माहितेय का? ९९ टक्के लोक फेल!
13
९४ वर्षीय अब्जाधीश वॉरेन बफेंचा मोठा निर्णय, दान केले ६ बिलियन डॉलर्सचे शेअर्स
14
"हे मराठीचं प्रेम नाही, तर महापालिका निवडणुका..."; देवेंद्र फडणवीसांचा उद्धव ठाकरेंवर निशाणा
15
शेतीच्या वादातून रक्तरंजित संघर्ष, पुतण्यानं माय-लेकाची केली हत्या; आरोपीनेही आयुष्य संपवलं
16
"ठेच लागल्यावर 'आई गं' म्हणायचं की 'ओ मेरी माँ'...", पहिलीपासून हिंदी भाषा सक्तीला केदार शिंदेंचा तीव्र विरोध
17
डोनाल्ड ट्रम्प यांना नोबेल मिळेल का, काय वाटतं? यापूर्वी कोणत्या राष्ट्राध्यक्षांना मिळाले नोबेल?
18
मुंबई: मृत मुलाच्या वीर्यासाठी आईची धडपड, सेंटरने वीर्य देण्यास नकार दिल्यानंतर न्यायालयात धाव
19
SL vs BAN : मॅचसह मालिका गमावली अन् लगेच कॅप्टन्सी सोडली! पहिल्या टेस्टमध्ये बेस्ट खेळीसह रचला होता इतिहास
20
भांडूपमधील जादूटोणा प्रकरण: अटकेनंतर पोलीस ठाण्यातच दाम्पत्याकडून मंत्रोच्चार, वैभव आणि हर्षदाला पोलिसांनी घडवली अद्दल

जीवघेणी बेशिस्त

By admin | Updated: February 3, 2015 22:50 IST

झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही,

भंडारा : झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही, त्यामुळेच लाखमोलाची माणसे रस्त्यांवर किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडली जात आहेत. मागील आठवड्यात बेला येथे एक विद्यार्थिनी असेच चिरडले गेले अन पुन्हा एकदा अपघाताचा भयावह विषय चर्चा आणि चिंता वाढवणारा ठरला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली अन् दुर्दैवाने अपघातही वाढले. मागील वर्षभरात ४४१ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये १४८ जणांचे बळी गेले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींची संख्या बघता शहरातील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे. अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत त्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे या शहरात आता मुख्य चौकांमध्ये वाहतूक सिग्नलची आवश्यकता बळावली आहे. (लोकमत चमू) असून नसल्यासारखेभंडारा शहरात लहान मोठे १५ ते २० चौक आहेत. यापैकी मुख्य मार्गांना जोडणारे सहा चौक आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत असावी आणि वाहनचालकांनी शिस्तीत वाहने चालवावी, यासाठी चौकाचौकात सिग्नल लावण्याची गरज आहे. परंतु एकाही चौकात सिग्नल नाहीत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती असते. मात्र, हे सारेच असून नसल्यासारखे आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चौकात उभे राहण्यासाठी लोखंडी चौकी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद चौक, जिल्हाधिकारी चौक आणि आणखी एखाद दुसऱ्या चौकातला अपवाद वगळता कोणत्याही सिग्नलवर पोलीस उभे दिसत नाहीत. ते उभे असतात सिग्नलपासून काही अंतरावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला. चौकात ते दिसत नसल्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक भरधावपणे वाहन दामटतात. या बेशिस्त वाहनचालकामुळे दुसऱ्याच वाहनचालकाला धोका होतो अन् भलत्याच्याच जीवावर बेतते. सारेच धक्कादायक येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. मात्र, ती खिळखिळी आहे. शहरातील चौकांचा आणि सिग्नलचा विचार केल्यास किमान १०० पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांची संख्या केवळ ५० आहे. त्यांना सांभाळण्यासाठी एक पीआय आणि एक पीएसआय आहेत. आजारी आणि साप्ताहिक रजा अन् अन्य संबंधित कारणे लक्षात घेतल्यास यापैकी रोज केवळ ४० पोलीस प्रत्यक्ष कर्तव्यावर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची (व्हीव्हीआयपींची) वाट मोकळी करून देण्याचीही जबाबदारी याच पोलिसांना सांभाळावी लागते. बेभान होऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या अन् उपद्रव वाढत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ एकही गती मोजणारे उपकरण नाही, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.