शहरं
Join us  
Trending Stories
1
यश दयालसमोर धोनी ठरला फिका! नो बॉल.. फ्री हिट ट्विस्टनंतरही CSK नं गमावला सामना, RCB टॉपला
2
सारा तेंडुलकर 'या' बॉलिवूड अभिनेत्याला करतेय 'डेट'? दीपिका पदुकोणसोबत दिलेत भरपूर 'किसिंग सीन'
3
भारत-पाक सीमेवर मोठी कारवाई, राजस्थानात पाकिस्तानी रेंजर ताब्यात!
4
घरगुती वाद विकोपाला! अकोला येथे दुहेरी खून: पतीकडून पत्नी, सावत्र मुलीची गळा दाबून हत्या
5
रामराजे नाईक-निंबाळकर यांनाही उत्तरे द्यावीच लागणार, मुख्यमंत्र्यांचे यावर बारीक लक्ष- जयकुमार गोरे
6
आयपीएल २०२५ मध्ये युवा फलंदाजांचा दबदबा, आरसीबीविरुद्ध आयुष म्हात्रेचं सुपरफास्ट अर्धशतक
7
अँथनी अल्बानीज पुन्हा होणार ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान! ऐतिहासिक विजयानंतर PM मोदींनी केलं अभिनंदन
8
"भारताला कारवाईचा पूर्ण अधिकार...!"; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर माजी अमेरिकन NSA जॉन बोल्टन स्पष्टच बोलले
9
२१ वर्षीय पोराची कडक फिफ्टी! कोण आहे किंग कोहलीचा नवा ओपनिंग पार्टनर Jacob Bethell?
10
पाकिस्तानी महिलेशी केलेला विवाह लपवला; CRPF ने देशासाठी धोकादायक म्हणत मुनीर अहमदला केले बडतर्फ
11
IPL 2025 : कोहलीनं जिरवली! खलील अहमदनं दुसऱ्याच्या जीवावर असा काढला राग, मग... (VIDEO)
12
नवविवाहितेच्या खून प्रकरणात आरोपी पतीला जन्मठेपेची शिक्षा; १० हजारांचा दंड, लातुरातील घटना
13
Romario Shepherd: ३७९ चा स्ट्राईक रेट, १४ चेंडूत अर्धशतक, चेन्नईविरुद्ध रोमारियो शेफर्डची वादळी खेळी
14
सोन्याचा भाव 6658 रुपयांनी घसरला, आता खरेदी करणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या काय सांगतायत एक्सपर्ट्स?
15
मुंबईतील विवाहित जोडप्याकडून खंडणी उकळणारे ठाण्यातील तीन पोलीस कर्मचारी निलंबित
16
IPL 2025 : किंग कोहलीचे षटकारांचे 'त्रिशतक'; असा पराक्रम करणारा ठरला पहिला फलंदाज
17
लातुरच्या माहेश्वरी पतसंस्थेत झाला सव्वा आठ काेटींचा अपहार; फरार राेखपालाला पोलिसांनी पकडले!
18
Virat Kohli: विराट कोहलीचा आणखी एक पराक्रम, आयपीएलमध्ये सर्वाधिक वेळा ५००+ धावा करणारा पहिलाच
19
पहलगाम हल्ल्यानंतर पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींना भेटले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला, 30 मिनिटे चालली चर्चा
20
मामाच्या गावी आलेले तिघे तलावात बुडाले; दोघांचा मृत्यू, एकास जिगरबाज तरुणीने वाचवलं

जीवघेणी बेशिस्त

By admin | Updated: February 3, 2015 22:50 IST

झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही,

भंडारा : झपाट्याने विकसित होणाऱ्या भंडारा जीवघेण्या अपघाताचे प्रमाण सारखे वाढत आहे. जीवन अनमोल असल्याचे बेदरकार वाहनचालकांना मान्य नाही. दुसऱ्याच्या जीवाची त्यांना कदर नाही, त्यामुळेच लाखमोलाची माणसे रस्त्यांवर किड्या-मुंग्यांप्रमाणे चिरडली जात आहेत. मागील आठवड्यात बेला येथे एक विद्यार्थिनी असेच चिरडले गेले अन पुन्हा एकदा अपघाताचा भयावह विषय चर्चा आणि चिंता वाढवणारा ठरला आहे. राष्ट्रीय महामार्गावर वसलेल्या भंडारा शहराची लोकसंख्या झपाट्याने वाढत आहे. लोकसंख्या वाढली, वाहने वाढली अन् दुर्दैवाने अपघातही वाढले. मागील वर्षभरात ४४१ अपघात घडले आहेत. या अपघातांमध्ये १४८ जणांचे बळी गेले आहेत. या अपघातातील मृत आणि जखमींची संख्या बघता शहरातील वाहतूक व्यवस्था किती बेशिस्त आहे. अन् वाहनचालक किती निर्ढावले आहेत त्याचा प्रत्यय येत आहे. त्यामुळे या शहरात आता मुख्य चौकांमध्ये वाहतूक सिग्नलची आवश्यकता बळावली आहे. (लोकमत चमू) असून नसल्यासारखेभंडारा शहरात लहान मोठे १५ ते २० चौक आहेत. यापैकी मुख्य मार्गांना जोडणारे सहा चौक आहेत. शहरातील वाहतूक सुरळीत असावी आणि वाहनचालकांनी शिस्तीत वाहने चालवावी, यासाठी चौकाचौकात सिग्नल लावण्याची गरज आहे. परंतु एकाही चौकात सिग्नल नाहीत. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना चाप बसविण्यासाठी वाहतूक पोलिसांची तैनाती असते. मात्र, हे सारेच असून नसल्यासारखे आहे. वाहतूक शाखेच्या पोलिसांनी चौकात उभे राहण्यासाठी लोखंडी चौकी देण्यात आली आहे. जिल्हा परिषद चौक, जिल्हाधिकारी चौक आणि आणखी एखाद दुसऱ्या चौकातला अपवाद वगळता कोणत्याही सिग्नलवर पोलीस उभे दिसत नाहीत. ते उभे असतात सिग्नलपासून काही अंतरावर, एखाद्या झाडाच्या आडोशाला. चौकात ते दिसत नसल्यामुळे निर्ढावलेले वाहनचालक भरधावपणे वाहन दामटतात. या बेशिस्त वाहनचालकामुळे दुसऱ्याच वाहनचालकाला धोका होतो अन् भलत्याच्याच जीवावर बेतते. सारेच धक्कादायक येथील वाहतूक नियंत्रित करण्यासाठी पोलिसांची स्वतंत्र वाहतूक शाखा आहे. मात्र, ती खिळखिळी आहे. शहरातील चौकांचा आणि सिग्नलचा विचार केल्यास किमान १०० पोलीस कर्मचाऱ्यांची वाहतूक शाखेला गरज आहे. मात्र, वाहतूक शाखेच्या पोलिसांची संख्या केवळ ५० आहे. त्यांना सांभाळण्यासाठी एक पीआय आणि एक पीएसआय आहेत. आजारी आणि साप्ताहिक रजा अन् अन्य संबंधित कारणे लक्षात घेतल्यास यापैकी रोज केवळ ४० पोलीस प्रत्यक्ष कर्तव्यावर असतात. वाहतूक नियंत्रित करण्यासोबतच शहरात येणाऱ्या अतिमहत्त्वाच्या व्यक्तीची (व्हीव्हीआयपींची) वाट मोकळी करून देण्याचीही जबाबदारी याच पोलिसांना सांभाळावी लागते. बेभान होऊन वाहन चालविणाऱ्या वाहनचालकांची संख्या अन् उपद्रव वाढत असताना वाहतूक शाखेच्या पोलिसांजवळ एकही गती मोजणारे उपकरण नाही, ही सर्वात धक्कादायक बाब आहे.