एसडीआेंना निवेदन : भारतीय शेतमजूर युनियनचा एसडीओ कार्यालयावर मोर्चासाकोली : भारतीय शेतमजूर युनियनतर्फे शेतमजूर आदिवासी दलित अधिकार बचाव आंदोलनाचे आयोजन करण्यात आले. हे आंदोलन मोर्चात रुपांतर करण्यात आले. हा मोर्चा साकोलीच्या प्रमुख मार्गावरून एसडीओ कार्यालयात आणण्यात आला. प्रधानमंत्री व मुख्यमंत्री यांना उपविभागीय अधिकाऱ्यांमार्फत निवेदन देऊन मोर्चाची सांगता करण्यात आली.शेतमजुरांकरिता सर्वंकष केंद्रीय कायदा करण्यात यावे व केरळच्या धर्तीवर कल्याण मंडळ बनविण्यात यावे, मनरेगा अंतर्गत किमान २०० दिवस काम देण्याचा कायदा करावा व मनरेगा वरील खर्चाची तरतूद वाढवून ती दरवर्षी किमान १ लाख कोटी इतकी करावी, खाद्य सुरक्षा कायद्यात दुरुस्ती करून एपीएल, बीपीएलचा भेद न करता प्रतिकार्ड ३५ किलो रेशन स्वस्त दराने देण्यात यावा, वनजमिनीचे पट्टे देण्याचे कायद्यात दुरुस्ती करून इतर वहिवाटाकरिता असलेली तीन पिढ्यांच्या दाखल्याची अट काढून सर्वांना पट्टे देण्यात यावे, भूमीअधिग्रहीत अध्यादेश रद्द करण्यात यावा, ६० वर्षे वयानंतर तीन हजार रुपये मासिक पेंशन देण्यात यावी, दलित आदिवासी उप योजनावरील तरतूद कमी करण्यात येऊ नये, अशी मागणी निवेदनात नमूद आहे. शिष्टमंडळात शिवकुमार गणवीर, पी.एस. मेश्राम, शांताराम शेंडे, विश्वनाथ बडोले, राजू बडोले, नामदेव लांबकाने, यशवंत तिरपुडे आदी उपस्थित होते. (तालुका प्रतिनिधी)
२०० दिवस काम द्या
By admin | Updated: August 24, 2015 00:45 IST