शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

राफेल घोटाळ्याचा पर्दाफाश करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2018 00:43 IST

राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे.

ठळक मुद्देनाना पटोले : शासनाच्या धोरणाविरुद्ध मोर्चा काढणार, भंडारा येथे पत्रपरिषद

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राफेल घोटाळा, पेट्रोल व डिझेलची वाढती दरवाढ, शेतकऱ्यांच्या समस्या, वाढती बेरोजगारी, महागाई या सर्व बाबींवर केंद्र व राज्य सरकार सपेशल फेल ठरली आहे. हाडमासांचा जीव स्वस्त झाला असून केंद्र व राज्य शासनाच्या धोरणांविरुद्ध काँग्रेसने एल्गार पुकारला आहे. १८ सप्टेंबर रोजी भंडारा येथे मोर्चा काढणार असून येथूनच भाजप सरकारचा पर्दाफाश करु, अशी माहिती माजी खासदार तथा काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष नाना पटोले यांनी दिली.गुरुवारी दुपारी ३ वाजता आयोजित वार्ताहर परिषदेत ते बोलत होते. पटोले म्हणाले, राफेलच्या करारसंदर्भात काँग्रेस शासनाच्या वेळी विमान ५२४ कोटी रुपयांनी खरेदी करण्याचा सौदा झाला होता. परंतु विद्यमान स्थितीत मोदी सरकारने हा करार १६७० कोटी रुपयांमध्ये केला. उद्योगपती मित्रांना लाभ देण्याच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला आहे. देशाच्या संरक्षणमंत्र्यांनी ही बाब गोपनीय असल्याचे सांगतीले होते. मात्र फ्रान्सने यात कुठलेही गोपनियता नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा सर्व भाजप सरकारतर्फे दिशाभुल करण्याचा प्रयत्न आहे. रॉफेल प्रकरणाचा पर्दाफाश करु असेही पटोले म्हणाले.पेट्रोल व डिझेल अन्य देशाना अनुक्रमे ३६ व ३४ रुपये लिटर दराने निर्यात केले जाते. मात्र भारतात तेच पेट्रोल व डिझेल अनुक्रमे ८७ व ७८ रुपये लिटर दराने विकले जात आहे. हा नागरिकांचा खिशे कापण्याचा सर्रास प्रकार आहे. शेतीच्या हमीभावाबाबतही भाजप सरकारने निवडणूकपूर्वी व नंतर अशा दोन्ही वेळी भाव वाढीची आश्वासन दिले होते. ते आश्वासनही पुर्ण झाले नाही.महिलांच्या अस्मितेचा मुद्दा समोर करुन माजी खा. पटोले म्हणाले, आमदार रामकदम यांनी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत होत असलेल्या समारंभातच महिलांचा सर्रास अपमान केला. काँग्रेस असा प्रकार कदापी सहन करणार नाही. मुख्यमंत्र्यांनीही याबाबत मौन घेतल्याने या बाबीला त्यांचा पाठींबा आहे काय? असा टोला ही पटोले यांनी लगावला.महिलांचा अपमान करण्याचा मानस भाजप व संघाने उचलला आहे काय? असा सवालही त्यांनी व्यक्त केला. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला धक्काही लागू देणार नाही, अशी खंबीर भुमिका ही पटोले यांनी स्पष्ट केले.आंदोलनाची रुपरेषा स्पष्ट करतांना पटोले म्हणाले, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या सुचनेनुसार भाजप शासनाच्या धोरणाविरुध्द १८ सप्टेंबरला भंडारा येथे भव्य मोर्चा काढण्यात येणार आहे. यात सर्वस्तरातील पिडीत नागरिकांसह काँग्रेसचे कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत. पत्रकारपरिषदेला काँग्रेसचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल गुडघे पाटील, माजी राज्यमंत्री बंडूभाऊ सावरबांधे, माजी आमदार आनंदराव वंजारी, जि.प. अध्यक्ष रमेश डोंगरे, प्रदेश महासचिव जिया पटेल, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणविर, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे, भंडारा जिल्हा प्रभारी सुरजित पठाण, तालुकाध्यक्ष राजकपुर राऊत, शहराध्यक्ष सचिन घनमारे यासह अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोले