शहरं
Join us  
Trending Stories
1
‘जन’ आक्रोश नाही, सत्ता गेली, खुर्ची गेली म्हणून ‘मन’ आक्रोश; CM फडणवीसांचे ठाकरेंना उत्तर
2
"खोलीत बोलवायचे, घाणेरड्या नजरेने बघायचे, रात्री व्हिडीओ..."; IAS अधिकाऱ्याविरोधात महिलांचे गंभीर आरोप 
3
"आपली ही तक्रार मी..."; अभिनेते किशोर कदम यांच्या पोस्टला मुख्यमंत्री फडणवीसांचा 'रिप्लाय'
4
शेअर बाजारात आधी घसरण मग तेजी; 'या' स्टॉक्सनं घसरणीसह सुरू केला व्यवहार
5
भिवंडीत भाजप युवा मोर्चा जिल्हा उपाध्यक्षासह दोन जणांची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या; परिसरात तणावाचे वातावरण 
6
आसिम मुनीरनंतर बिलावल भुट्टोंची फडफड; भारताला दिली युद्धाची धमकी! म्हणाले... 
7
“राहुल गांधी म्हणजे फेक नॅरेटीव्हची फॅक्टरीच, फेक न्यूजचे बादशाह”; भाजपाने पुरावेच दिले!
8
अंगारकी चतुर्थीनिमित्त गणपतीपुळेत भाविकांचा महासागर
9
बँका आपल्या मनमर्जीनं मिनिमम अकाऊंट बॅलन्स ठरवू शकतात का? RBI गव्हर्नरांनी सांगितला नियम
10
'उत्पन्नावर आधारित' आरक्षण व्यवस्था असावी; जनहित याचिकेवर विचार करण्यास सुप्रीम कोर्टाने दर्शवली तयारी
11
डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण: सरकारी वकील प्रदीप घरत यांना खटल्यातून हटवल्याने न्यायालय नाराज
12
Post Office च्या MIS स्कीममध्ये ₹१,००,००० जमा कराल तर महिन्याला किती मिळेल व्याज, पाहा कॅलक्युलेशन
13
दोन मुलांची आई, १३ वर्षांनंतर कमबॅक करणार अभिनेत्री; मराठी बिझनेसमॅनसोबत बांधलेली लग्नगाठ
14
कबुतरांच्या विष्ठेमुळे मुलांना फप्फुसाचे गंभीर आजार; फायब्रोसिसवर औषधेही परिणामकारक ठरत नाहीत
15
आजचे राशीभविष्य : मंगळवार १२ ऑगस्ट २०२५; आज शक्यतो प्रवास टाळावा, अचानक खर्च उदभवण्याची शक्यता
16
पाकिस्तानचे लाड सुरूच! अमेरिकेचा आणखी एक धक्का, 'या' संघटनेवर मारला दहशवादाचा शिक्का
17
दुचाकीला बांधून पत्नीचा मृतदेह नेताना चार पोलिस ठाणी झोपेत होती का? चार मोठी, १५ छोटी गावे ओलांडली, पण...
18
लोकलची प्रवासी वाहतूक क्षमता २५ टक्के वाढणार; सीएसएमटी-खोपोली दरम्यान १५ डब्यांची गाडी धावणार
19
हत्तीचं ॲक्युपंक्चर, बिबट्याचं रूट कॅनल अन् ICU मधील माकड
20
Indian Embassy in Pakistan :'ऑपरेशन सिंदूर'नंतर पाकिस्तान घाबरला! इस्लामाबादमधील भारतीय राजदूतांना पाणी, गॅस पुरवठा थांबवला, वर्तमानपत्रांवरही बंदी

शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:53 IST

कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचार दिवस लोटूनही चौकशी नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.सध्या पवनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोंढा परिसरात धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विष्णू शेंडे यांच्या कडे साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी कालव्याच्या पाण्याने रोवणी केली होती. अतिवृष्टीत धानपीक पाण्याखाली आहे. त्यामुळे तो विवंचनेत होता. कुटुंबात आई, पत्नी व एक मुलगा आहे. दोन मुलीचे लग्न झाले. त्यांचे कर्ज त्यांच्यावर आहे. यावर्षी विविध सेवा सहकारी संस्था, कोसरा येथून आई व पत्नी यांच्या नावाने ३६,५०० रुपये पीककर्ज घेतले. धान पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ते वाहून जाईल या विवंचनेत होते.कुटुंबाचा प्रमुख अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आले आहे. १४ आॅगस्टला त्याचा मृतदेह अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी कोसरा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.चार दिवस लोटले पण महसूल विभागाचा साधा कर्मचारी अथवा अधिकारी कुटुंबाची भेट घेण्यास येऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या मृत्यूला प्रशासन गंभीरपणे घेत नाही. म्हणून प्रशासनाबद्दल गावात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या