शहरं
Join us  
Trending Stories
1
हे काश्मीरच्या शत्रूंना पहावले नाही; पंतप्रधान नरेंद्र मोदींचे मन की बातमध्ये न्याय देण्याचे आश्वासन
2
पहलगाम हल्ल्याचा तपास NIA च्या हाती; पाकिस्तानी कनेक्शन अन् 26/11 सारख्या कटाचा संशय
3
Pahalgam Terror Attack : "मी वडील गमावले, पण माझे २ भाऊ काश्मीरमध्ये..."; आरतीने सांगितली डोळे पाणावणारी घटना
4
पहलगाम हल्ल्यानंतर दहशतवादाविरुद्धची कारवाई तीव्र, आतापर्यंत १० घरे उद्ध्वस्त; १७५ संशयितांना ताब्यात
5
शिक्षक, स्पर्धा परीक्षांची तयारी अन् अचानक झाला गायब; २६ पर्यटकांना मारणारा आदिल दहशतवादी कसा बनला?
6
प्रभसिमरन सिंगने इतिहास रचला, आयपीएलमध्ये खास विक्रम करणारा पहिला अनकॅप्ड खेळाडू ठरला
7
वंदे भारत आणि शताब्दी एक्सप्रेस गाड्यांचा खरा मालक कोण? अनेकांच्या मनात गैरसमज
8
नरेश म्हस्के यांची ज्ञानपीठच्या दिशेने वाटचाल होत आहे, सावधान..!
9
अनंत अंबानींना रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये मिळाली मोठी जबाबदारी; आकाश आणि ईशा अंबानी काय करतात?
10
"मी दहशतवाद्यांना एकच गोष्ट सांगेन की..."; 'केसरी २'च्या स्क्रीनिंगला अक्षय कुमारचा संताप अनावर, काय घडलं?
11
पहलगामनंतर काश्मीरमध्ये कडक सुरक्षा, कुपवाडामध्ये सामाजिक कार्यकर्त्यावर दहशतवादी हल्ला
12
तुम्ही मराठी सिनेसृष्टीत आजवर असं कधीच पाहिलं नसेल! 'माझी प्रारतना'चा विलक्षण ट्रेलर रिलीज
13
पाकिस्तानने पीओकेमध्ये इमरजन्सी घोषित केली, आरोग्य कर्मचाऱ्यांच्या सुट्या रद्द; काय घडतेय...
14
WhatsApp मध्ये सीक्रेट चॅटसाठी आलं नवं फीचर; आता प्रायव्हसीचं टेन्शन होणार छूमंतर
15
घरी आणि ऑफिस दोन्ही ठिकाणी Wi-Fi? मग 'हे' रिचार्ज प्लॅन तुमच्यासाठी बेस्ट; कोण देतंय चांगली ऑफर?
16
Pahalgam Terror Attack : हृदयस्पर्शी! गोळीबार सुरू असताना काश्मिरी मुलाने वाचवला चिमुकल्याचा जीव; Video व्हायरल
17
Pahalgam Terror Attack : "माझ्या पतीला शहीद दर्जा द्यावा, त्याने अनेकांचा जीव वाचवला"; शुभमच्या पत्नीची सरकारकडे मागणी
18
जिल्हाधिकारी पैसे घेतात, अधिकारी २% शिवाय फाइल काढत नाहीत, खासदार, आमदारांचा आरोप
19
TCS की इन्फोसिस, कोणी वाढवला सर्वाधिक पगार? आयटी क्षेत्रात कोणती कंपनी देणार जास्त नोकऱ्या?
20
अरे बापरे! प्लास्टिकच्या बॉटलमध्ये पाणी पिणाऱ्यांनो सावधान; हार्ट ॲटॅकचा मोठा धोका

शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:53 IST

कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचार दिवस लोटूनही चौकशी नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.सध्या पवनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोंढा परिसरात धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विष्णू शेंडे यांच्या कडे साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी कालव्याच्या पाण्याने रोवणी केली होती. अतिवृष्टीत धानपीक पाण्याखाली आहे. त्यामुळे तो विवंचनेत होता. कुटुंबात आई, पत्नी व एक मुलगा आहे. दोन मुलीचे लग्न झाले. त्यांचे कर्ज त्यांच्यावर आहे. यावर्षी विविध सेवा सहकारी संस्था, कोसरा येथून आई व पत्नी यांच्या नावाने ३६,५०० रुपये पीककर्ज घेतले. धान पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ते वाहून जाईल या विवंचनेत होते.कुटुंबाचा प्रमुख अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आले आहे. १४ आॅगस्टला त्याचा मृतदेह अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी कोसरा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.चार दिवस लोटले पण महसूल विभागाचा साधा कर्मचारी अथवा अधिकारी कुटुंबाची भेट घेण्यास येऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या मृत्यूला प्रशासन गंभीरपणे घेत नाही. म्हणून प्रशासनाबद्दल गावात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या