शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
3
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
4
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
5
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
6
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
7
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
8
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
9
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
10
Uddhav Thackeray: "नशीब..., नाही तर फडणवीस म्हणून 20वे आले असते...!"; मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधत उद्धव ठाकरेंनी भरसभेत नेमकं काय वाचलं?
11
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
12
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
13
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
14
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
15
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार
16
 तामिळनाडूत संघाच्या शाखेवर मोठी कारवाई, ३९ स्वयंसेवक ताब्यात, समोर आलं असं कारण  
17
“लोकशाहीवर चौफेर हल्ले, चीनला शक्य ते भारत करू शकत नाही”; कोलंबियातून राहुल गांधींची टीका
18
याला म्हणतात ढासू परतावा...! ₹1 च्या शेअरमध्ये तुफान तेजी, ₹184 वर पोहोचला भाव; आता कंपनीनं केली मोठी डील
19
...अन्यथा महाराष्ट्रात निवडणुका होऊ देणार नाही; मनोज जरांगेंनी सरकारविरोधात पुन्हा थोपटले दंड, कोणत्या मागण्या केल्या?
20
IAS Srishti Dabas : शाब्बास पोरी! दिवसा काम अन् रात्री अभ्यास; सुंदर IAS चा नेत्रदीपक प्रवास, अडचणींवर केली मात

शेतकरी आत्महत्या प्रकरणी प्रशासनाची पाठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 19, 2019 00:53 IST

कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.

ठळक मुद्देचार दिवस लोटूनही चौकशी नाही

लोकमत न्यूज नेटवर्ककोंढा कोसरा : कोसरा येथील अल्पभूधारक शेतकरी विष्णू देवराम शेंडे (५५) याने स्वत:च्या शेतात आत्महत्या केली. या घटनेला चार दिवस होऊन गेले, पण शेतकऱ्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी प्रशासनाचा कर्मचारी, अथवा अधिकारी अशा कोणीही भेटण्यास आला नाही. याबद्दल प्रशासनाबद्दल संताप व्यक्त होत आहे.सध्या पवनी तालुक्यात अतिवृष्टीमुळे कोंढा परिसरात धानपिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. विष्णू शेंडे यांच्या कडे साडेतीन एकर जमीन आहे. त्यांनी कालव्याच्या पाण्याने रोवणी केली होती. अतिवृष्टीत धानपीक पाण्याखाली आहे. त्यामुळे तो विवंचनेत होता. कुटुंबात आई, पत्नी व एक मुलगा आहे. दोन मुलीचे लग्न झाले. त्यांचे कर्ज त्यांच्यावर आहे. यावर्षी विविध सेवा सहकारी संस्था, कोसरा येथून आई व पत्नी यांच्या नावाने ३६,५०० रुपये पीककर्ज घेतले. धान पीक पाण्याखाली गेले. त्यामुळे ते वाहून जाईल या विवंचनेत होते.कुटुंबाचा प्रमुख अचानक गेल्याने त्यांच्या कुटुंबावर संकट आले आहे. १४ आॅगस्टला त्याचा मृतदेह अड्याळ पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर १५ आॅगस्ट रोजी कोसरा येथे त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. अड्याळ पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.चार दिवस लोटले पण महसूल विभागाचा साधा कर्मचारी अथवा अधिकारी कुटुंबाची भेट घेण्यास येऊ शकत नाही. ही फार मोठी शोकांतिका म्हणावे लागेल. शेतकऱ्यांच्या मृत्यूला प्रशासन गंभीरपणे घेत नाही. म्हणून प्रशासनाबद्दल गावात संताप व्यक्त होत आहे.

टॅग्स :farmer suicideशेतकरी आत्महत्या