शहरं
Join us  
Trending Stories
1
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी निदर्शक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
2
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
3
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य
4
तुम्ही आता मागास झालात, आपआपसात विवाह ठरवूया; प्रा. लक्ष्मण हाके यांचा मनोज जरांगे यांना प्रस्ताव
5
अंगात 'सिंदूर' नव्हे तर खरी देशभक्ती भिनली पाहिजे; उद्धव ठाकरे यांची भाजपवर टीका
6
'एआय'मुळे खासगी आयुष्य धोक्यात! चेहऱ्यांचे बनावट फोटो, खोटे आवाज, सही याचा गैरवापर
7
आशिया चषकात दुबईच्या मैदानावर आज भारत-पाकिस्तान हायव्होल्टेज द्वंद्व
8
सर्व्हर डाऊनमुळे शेकडोंची 'स्टाफ सिलेक्शन' परीक्षा हुकली; केंद्रावर झाला गोंधळ : पोलिसांना केले पाचारण
9
तुम्हीही शौचालयात मोबाइल घेऊन जाता का?
10
एसईबीसी आरक्षणावर काय परिणाम होईल? मराठा आरक्षणावरील नव्या जीआरबाबत हायकोर्टाची राज्य सरकारला विचारणा
11
कोर्टाचे वारंवार निर्देश म्हणजे आमच्या अधिकारांवर गदा; निवडणूक आयोग म्हणाले, एसआयआर विशेषाधिकार
12
नवरात्रीत लवकर देवीदर्शन हवंय, दामदुप्पट मोजा; मंदिर प्रशासनाने केली शुल्कात वाढ
13
हिंसाचार सोडा, शांतीचा मार्ग स्वीकारा; मणिपूरला शांततेचे प्रतीक बनवू ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आवाहन
14
अमेरिकेनं ओसामा संपवला, पण त्याच्या बायकांचं काय झालं? पाकिस्तानच्या माजी राष्ट्रपतीच्या सहकाऱ्यानं सागितलं
15
IND vs PAK: गंभीरनं टीम इंडियातील खेळाडूंना स्पष्ट सांगितलंय की...; सहाय्यक कोच नेमकं काय म्हणाले?
16
याला म्हणतात 'दृढनिश्चय'...! मणिपूरमध्ये पाऊस बनला अडथळा, मग पंतप्रधान मोदींनी 'हा' मार्ग अवलंबला! 
17
Asia Cup 2025 Points Table : भारत-पाक लढतीआधी लंकेची विजयी सलामी! तरीही अफगाणिस्तान ठरले भारी!
18
नेपाळ हिंसाचारासंदर्भात CM योगी आदित्यनाथ यांचं मोठं विधान; म्हणाले - "छोट्या-छोट्या गोष्टींकडे..."
19
BAN vs SL : श्रीलंकेचा डंका! एका पराभवासह बांगलादेश संघ स्पर्धेतून OUT होण्याच्या उंबरठ्यावर
20
चार दिवसांत थंड व्हाल, हिंम्मत असेल तर कारागृहात पाठवून दाखवा; प्रशांत किशोर यांचं संजय जायसवाल यांना आव्हान

विवाह समारंभांनाही कर्जाचा विळखा

By admin | Updated: April 1, 2015 00:37 IST

यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे.

भंडारा : यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात खर्चीक विवाहाला फाटा देऊन कुंकवातच लग्न उरकवण्याचीही अनेक उदाहरणे ग्रामीण भागात आहेत; पण याचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसते. यामुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन वा उसनवारी, उधारी घेऊन खर्चीक लग्न करीत असल्याचे दिसते. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. कुंकवाच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा दिला जातो; पण संसारोपयोगी साहित्य व इतर खर्चासाठी वधु पित्याला कर्ज काढावे लागते; किमान हा खर्च उपयोगी पडतो. लग्नांमध्ये बॅन्डबाजा, डीजे, मंडप, कपडे खरेदी, जेवणावळ यावर सर्वाधिक खर्च होतो. वास्तविक या खर्चाचा भावी वर-वधूंना कोणताही उपयोग होत नाही. सध्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्याने दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या विचाराने कुंकवात लग्न उरकवण्यावर भर देत आहेत. ही उदाहरणे ताजी असताना दुष्काळातही कर्जबाजारी होऊन धडाक्यात लग्न उरकण्याचे प्रमाणही कमी झाले नाही. गत तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. कधी अपुरा पाऊस तर कधी अतीवृष्टी. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पादन आले नाही. केलेला खर्च निघत नसल्याने अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय सुरू केला. काही भागात प्रतिष्ठा राखण्यासाठी लग्नसराईत कर्ज काढून खर्च करायचा व शेतीचे उत्पन्न हाती न आल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. पिकांच्या भरवशावर कर्ज घ्यायचे. निसर्गाच्या प्रकोपाने हाती काही न लागल्यास कर्ज फेडायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत असून याला आळा घालणेही अगत्याचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)