शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांनी विचारलं, कॅनडातून परतताना अमेरिकेत थांबू शकता? पंतप्रधान मोदींनी दिला नकार, म्हणाले...
2
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
3
IND vs ENG: गौतम गंभीर कुठेच दिसेना... टीम इंडियासोबत 'कोच' म्हणून VVS लक्ष्मण इंग्लंडमध्ये, पण का?
4
Sonam Raghuvanshi : चक्की चालवणारे सोनमचे बाबा कसे झाले करोडपती? कमाई एवढी की नातेवाईकांच्या नावावर खाती
5
अहमदाबाद विमान अपघाताबाबत मोठा खुलासा; तीन महिन्यांपूर्वी बदलले होते विमानाचे इंजिन...
6
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
7
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
8
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
9
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
10
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
11
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
12
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
13
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
14
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
15
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
16
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
17
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्रीने सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
18
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
19
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे

विवाह समारंभांनाही कर्जाचा विळखा

By admin | Updated: April 1, 2015 00:37 IST

यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे.

भंडारा : यंदाचा लग्नसराईचा हंगाम सुरू झाला असून दुष्काळातही ग्रामीण भागात खर्चीक सोहळ्यांना ऊत आल्याचे चित्र आहे. काही प्रमाणात खर्चीक विवाहाला फाटा देऊन कुंकवातच लग्न उरकवण्याचीही अनेक उदाहरणे ग्रामीण भागात आहेत; पण याचे प्रमाण नगण्य असल्याचे दिसते. यामुळे अनेक जण कर्जबाजारी होऊन वा उसनवारी, उधारी घेऊन खर्चीक लग्न करीत असल्याचे दिसते. याला कुठेतरी आळा बसणे गरजेचे असल्याचे मत जाणकार व्यक्त करीत आहेत. कुंकवाच्या लग्नात अनावश्यक खर्चाला फाटा दिला जातो; पण संसारोपयोगी साहित्य व इतर खर्चासाठी वधु पित्याला कर्ज काढावे लागते; किमान हा खर्च उपयोगी पडतो. लग्नांमध्ये बॅन्डबाजा, डीजे, मंडप, कपडे खरेदी, जेवणावळ यावर सर्वाधिक खर्च होतो. वास्तविक या खर्चाचा भावी वर-वधूंना कोणताही उपयोग होत नाही. सध्या ग्रामीण भागात शिक्षणाचे प्रमाण वाढले असल्याने दोन्हीकडील मंडळी एकमेकांच्या विचाराने कुंकवात लग्न उरकवण्यावर भर देत आहेत. ही उदाहरणे ताजी असताना दुष्काळातही कर्जबाजारी होऊन धडाक्यात लग्न उरकण्याचे प्रमाणही कमी झाले नाही. गत तीन वर्षांपासून दुष्काळाने शेतकऱ्यांची पाठ सोडली नाही. कधी अपुरा पाऊस तर कधी अतीवृष्टी. यामुळे शेतकऱ्यांच्या हाती मोठ्या प्रमाणात उत्पादन आले नाही. केलेला खर्च निघत नसल्याने अनेकांनी शेतीला जोडव्यवसाय सुरू केला. काही भागात प्रतिष्ठा राखण्यासाठी लग्नसराईत कर्ज काढून खर्च करायचा व शेतीचे उत्पन्न हाती न आल्याने कर्जबाजारीपणाला कंटाळून नैराश्यातून आत्महत्येचे प्रमाणही वाढत आहे. पिकांच्या भरवशावर कर्ज घ्यायचे. निसर्गाच्या प्रकोपाने हाती काही न लागल्यास कर्ज फेडायचे कोठून, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडतो. यातूनच आत्महत्येचे प्रमाण वाढत असून याला आळा घालणेही अगत्याचे झाले आहे. (नगर प्रतिनिधी)