शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: चांदा ते बांदा आज नगरपरिषद अन् नगरपंचायतीचा निकाल; दहा वाजता मतमोजणीस होणार सुरुवात
2
नगरांवर सत्ता कोणाची? आज फैसला; एक्झिट पोल काय सांगतात? महाविकास आघाडीचे काय होणार...
3
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
4
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
5
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
6
अंबरनाथमध्ये ५४.५०% मतदान; या ठिकाणी निवडणुका झाल्या बिनविरोध
7
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
8
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
9
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
10
'टी-२०' विश्वचषकासाठी संघ जाहीर : गिलचा पत्ता कट; इशान, रिंकूला संधी
11
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
12
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
13
अंबरनाथमधील हॉलमधून १७३ संशयित व्यक्तींना घेतले ताब्यात, बोगस मतदार असल्याचा काँग्रेस, भाजपचा आरोप
14
मुंबईत काँग्रेसला आता धर्मनिरपेक्ष मते आठवली, ठाकरेंची साथ नको, एकटे लढणार; वंचितसाठी दरवाजे खुले ?
15
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
16
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
17
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
18
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
19
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
20
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएस प्रणित शासनाचा डाव आहे. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण सपवण्याचा प्रयत्नात असून काँग्रेस पक्ष हा कुटील डाव हाणून पाडेल. या विरोधात काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.केंद्रातील भाजप सरकारविरूद्ध भाजप हटाव आरक्षण बचाव या अंतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मधूकर लिचडे, प्रकाश पचारे, सुरेश मेश्राम, रविभूषण भुसारी, महेंद्र निंबार्ते, मुकूंद साखरकर, अमरनाथ रगडे, रेखा वासनिक, प्रेम वनवे, होमराज कापगते, उत्तम भागडकर, मंगेश हुमणे आदी उपस्थित होते.सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या देण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण विरोधी मुद्यावर भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. काँगे्रस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.लाखनीतही निषेधलाखनी : येथील महिला काँग्रेस कमिटीतर्फे मीनाक्षी बोपचे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रजनी मुळे, मुरमाडीच्या सरपंच सुनिता भालेराव, माधवी बावनकुळे, सविता गौरे, शांता भोसकर, प्रिया खंडारे, जिजा तुमडाम, मोनाली गाढवे, रूपलता जांभुळकर, रजनी आत्राम, कल्पना भिवगडे, मुनेश्वरी पटले, संध्या धांडे आदी उपस्थित होते.प्रति सिलिंडरमागे दरवाढतेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत १४४ रूपये प्रती सिलिंडर वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर ९१४ रूपयात प्रती सिलिंडर मिळत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही भाव वाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.