शहरं
Join us  
Trending Stories
1
अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर ठोस निर्णय घ्या, विशेष अधिवेशन बोलवा; जयंत पाटलांची सरकारकडे मागणी
2
आशिया कप २०२५ फायनल: क्रिकेटचा थरार, प्राईज मनी ५० टक्क्यांनी वाढविला, भारताला मिळणार एवढे कोटी...
3
“आज-उद्याचा दिवस चिंताजनक, सरकार-प्रशासन अलर्ट”; CM फडणवीसांचे आढावा घेत महत्त्वाचे निर्देश
4
“नवी मुंबईत सत्ता हे आनंद दिघेंचे स्वप्न, महायुतीचे आम्ही पाहू, तुम्ही फक्त...”: एकनाथ शिंदे
5
हृदयद्रावक! फ्लॅटमध्ये आग, अभिनेत्रीच्या दोन्ही मुलांचा गुदमरून मृत्यू; बाल कलाकाराने गमावला जीव
6
BCCIचे अध्यक्ष झालेले मिथुन मन्हास आहेत कोण? कधी वीरू-युवीच्या नेतृत्वाखाली खेळले, असा आहे रेकॉर्ड
7
दुर्गा पूजा ते दिवाळी! ऑक्टोबरमध्ये बँकांना २१ दिवस सुट्टी! 'ही' यादी तपासूनच कामाचे नियोजन करा
8
मराठवाडा, सोलापूर येथील परिस्थिती कायम; धरणांतील विसर्ग वाढला, हजारो नागरिक सुरक्षितस्थळी
9
Tamilnadu Stampede : “आता कोणाला नवरदेव बनवू?”, चेंगराचेंगरीत लेकाचा मृत्यू; आईचा टाहो, पुढच्या महिन्यांत होतं लग्न
10
"सरकार मायबाप… आता कसं जगायचं?", अतिवृष्टीने हिरवी स्वप्नं चुराडली; राहेरीतील शेतकऱ्यांचा हंबरडा
11
प्रणितकडे इशारा करत वरुण धवन म्हणाला, 'इसने मेरा भी मजाक उडाया है!', कॉमेडियन म्हणतो...
12
आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा मोठा धक्का! 'या' कंपनीने ११,००० हून अधिक कर्मचाऱ्यांना कामावरून काढलं
13
बीसीसीआयला मिळाला नवा अध्यक्ष, या माजी क्रिकेटपटूच्या नावावर झालं शिक्कामोर्तब
14
एस जयशंकर यांच्या संयुक्त राष्ट्रातील भाषणावर पाकिस्तान प्रतिक्रिया देऊन फसले; स्वतःला दहशतवादाचे अड्डे मानले
15
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
16
डोंबिवलीत त्या तरुणाने ११ व्या मजल्यावरुन उडी का मारली; धक्कादायक कारण आले समोर
17
'फुलवंती'सारखंच खऱ्या आयुष्यातही नकळत दुसऱ्या महिलेच्या प्रेमात पडलास तर? गश्मीर म्हणाला...
18
दिवाळीत बाइक खरेदीचा विचार करताय? ८०,००० रुपयांच्या बजेटमधील टॉप ५ पर्याय पाहा!
19
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
20
मिशन शक्ती : ९ वी ते १२ वीच्या विद्यार्थिनींना मोफत मध्यान्ह भोजन, योगींच्या मार्गदर्शनाखाली अनोखं पाऊल

आरक्षण संपविण्याचा शासनाचा डाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2020 05:00 IST

काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.

ठळक मुद्देकाँग्रेसचे आंदोलन : ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करा

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : एससी, एसटी व ओबीसींचे आरक्षण संपविण्याचा भाजप व आरएसएस प्रणित शासनाचा डाव आहे. केंद्रातील भाजप सरकार आरक्षण सपवण्याचा प्रयत्नात असून काँग्रेस पक्ष हा कुटील डाव हाणून पाडेल. या विरोधात काँग्रेस तीव्र लढा देईल, असा इशारा काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रेमसागर गणवीर यांनी दिला. काँग्रेसने सोमवारी घरगुती गॅसच्या दरवाढ मागे घ्यावी व ओबीसी समाजाची जातीनिहाय जनगणना करावी या मागणीला घेऊन आंदोलन केले. यावेळी मार्गदर्शन करताना गणवीर बोलत होते.केंद्रातील भाजप सरकारविरूद्ध भाजप हटाव आरक्षण बचाव या अंतर्गत सदर आंदोलन करण्यात आले. यावेळी काँग्रेसचे प्रदेश सचिव प्रमोद तितीरमारे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष सीमा भुरे, विकास राऊत, माणिकराव ब्राम्हणकर, मधूकर लिचडे, प्रकाश पचारे, सुरेश मेश्राम, रविभूषण भुसारी, महेंद्र निंबार्ते, मुकूंद साखरकर, अमरनाथ रगडे, रेखा वासनिक, प्रेम वनवे, होमराज कापगते, उत्तम भागडकर, मंगेश हुमणे आदी उपस्थित होते.सोमवारी येथील त्रिमुर्ती चौकात काँग्रेस जिल्हा पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत ठिय्या देण्यात आला. यावेळी उपस्थित नेत्यांनी मार्गदर्शन केले. आरक्षण विरोधी मुद्यावर भाजपावर जोरदार टीका करण्यात आली. काँगे्रस पक्ष मागासवर्गीयांच्या पाठिशी भक्कमपणे उभा असून भाजपचा हा डाव हाणून पाडण्यासाठी काँग्रेस मागेपुढे पाहणार नाही, असेही ते म्हणाले.लाखनीतही निषेधलाखनी : येथील महिला काँग्रेस कमिटीतर्फे मीनाक्षी बोपचे यांच्या नेतृत्वात गॅस दरवाढीचा निषेध करण्यात आला. तहसीलदार मल्लीक विराणी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी रजनी मुळे, मुरमाडीच्या सरपंच सुनिता भालेराव, माधवी बावनकुळे, सविता गौरे, शांता भोसकर, प्रिया खंडारे, जिजा तुमडाम, मोनाली गाढवे, रूपलता जांभुळकर, रजनी आत्राम, कल्पना भिवगडे, मुनेश्वरी पटले, संध्या धांडे आदी उपस्थित होते.प्रति सिलिंडरमागे दरवाढतेल कंपन्यांनी घरगुती गॅसच्या किंमतीत १४४ रूपये प्रती सिलिंडर वाढ केली आहे. त्यामुळे घरगुती सिलिंडर ९१४ रूपयात प्रती सिलिंडर मिळत आहे. या दरवाढीने सर्वसामान्य जनता त्रस्त झाली असून आर्थिक बजेट कोलमडले आहे. ही भाव वाढ त्वरीत मागे घेण्यात यावी, असेही निवेदनात नमूद केले आहे. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले.