शहरं
Join us  
Trending Stories
1
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
2
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
3
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
4
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
5
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
6
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
7
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
8
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
9
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
10
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
11
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
12
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
13
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
14
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड
15
शिक्षिकेचा जडला महिला मुख्याध्यापकावर जीव, प्रेम मिळवण्यासाठी AI टूल्स वापरून रचला भयानक खेळ
16
IND vs PAK: भारत- पाकिस्तान यांच्यातील ५ टी-२० सामन्यांचा रेकॉर्ड, कुणाचं पारडं जड?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
बाहेर ‘झटपट कॉम्प्युटर शिका’ची पाटी, आत वेगळाच खेळ, सापडल्या ९ तरुणी, ४ पुरुष आणि...
19
परी म्हणू की सुंदरा... Gemini Prompt ने 'असा' करा ९० च्या दशकातील 'रेट्रो साडी लूक'
20
"मी शिव भक्त, सर्व विष गिळून टाकतो...", पंतप्रधान मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल; म्हणाले...

सरपंचपद आरक्षणाची सोडत फेब्रुवारी महिन्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2021 04:17 IST

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी ...

तुमसर : ग्रामपंचायतीच्या निवडणुकीनंतर सदस्यांना सरपंचपदाचे डोहाळे लागले आहेत. तुमसर तालुक्यातील सरपंचपदाची आरक्षण सोडत ३ ते ४ फेब्रुवारी रोजी होणार असल्याची माहिती आहे. याकरिता निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणा सोडतीकरिता धडपड सुरू आहे.

ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांनी सरपंचपदाची आरक्षण सोडत १० ते १२ दिवसांत घेण्याचे निर्देश स्थानिक निवडणूक विभागाला दिले होते दिले होते. त्याअनुषंगाने सांगली निवडणूक विभागाची सरपंच आरक्षणकरिता नियोजन सुरू करण्यात आले आहे. येत्या ३ ते ४ फेब्रुवारी रोजी सरपंचपदाचे आरक्षण होणार असल्याची माहिती आहे.

बॉक्स

नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य भ्रमंतीवर जाणार

सरपंच आरक्षण सोडत निघाल्यानंतर इच्छुक ग्रामपंचायत सरपंच सदस्यांसह भ्रमंतीवर जाणार असल्याची चर्चा तालुक्यात सुरू आहे. सध्या सरपंचपदाकरिता मोर्चेबांधणी सुरू आहे. आता प्रतीक्षा आहे ती सरपंच आरक्षणाची बहुमताने पॅनल निवडून आलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये सरपंच कोण होणार, कुणाची सोडत निघणार या चर्चेला उधाण आलेले आहे. अनेकजण सरपंचाची माळ आपल्या गळ्यात कशी पडेल या विचारात आहेत. अखेर सरपंच आरक्षणानंतरच सरपंच कोण होणार हे चित्र स्पष्ट होईल. अनेक पॅनलमध्ये राखीव उमेदवार नाहीत. ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये काहींचे पॅनल निवडून आले त्यांच्याकडे स्पष्ट बहुमत आहे; परंतु काही पॅनलमध्ये काही राखीव उमेदवार उपलब्ध नसल्याने विरोधी पक्षाकडे राखीव उमेदवार नसल्याने त्यांना सरपंचपद येथे मिळण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे अनेकांचे सरपंच होण्याचे स्वप्न येथे भंगणार असल्याची चर्चा सुरू आहे.

बॉक्स

अर्थकारणाला महत्त्व

सरपंचपद हस्तगत करण्याकरिता अनेकांनी मोर्चेबांधणी केली असली तरी अखेरच्या क्षणाला अर्थकारणाला मोठे महत्त्व प्राप्त होणार आहे. येथे अपक्ष सदस्यांना अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त होणार आहे. काही ग्रामपंचायतींमध्ये घोडेबाजाराला आतापासूनच सुरुवात झाल्याचे समजते. पंचायतराज लागू झाल्याने केंद्र व राज्य शासनाच्या मोठा निधी थेट ग्रामपंचायतीकडे येतो. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. राजकारणाची दिशा गावातूनच पुढे सरकते. त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीला मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. गावात आपलाच सरपंच व्हावा याकरिता राजकीय पक्षानेसुद्धा कंबर कसलेली दिसत आहे.