शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

कर्जमाफी संकल्पालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:25 IST

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहिर केली असली तरी...

मालगावेंचा आरोप : केवळ २० टक्के शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहिर केली असली तरी प्रशासनाने शासकीय परिपत्रकाद्वारे या कर्जमाफी संकल्पालाच हरताळ फासल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी डॉ.प्रकाश मालगावे यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या कर्जमाफीचे सुतोवाच करून १४ जून २०१७ च्या शासकीय परिपत्रकानुसार पात्र सभासदांसाठी निकष निश्चित केले त्यावर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. त्यावर पुन्हा विचार करून २८ जून रोजी शासकीय निर्णयाद्वारे काही अटी शिथिल केल्या असल्या तरी नविन अट समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल २०१२ नंतरच्या ३० जून २०१६ पर्यंतच्या थकीत कर्जाला माफ करण्याचा निर्णय घोषित केला. पंरतु या अटीमुळे केवळ २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होत आहे. ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शुन्य टक्के व्याज लावण्याची घोषणा सन २०११ मध्ये करण्यात आल्यामुळे ८० टक्के शेतकरी चालु कर्ज भरीत होते. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने ज्या कर्जामळे थकीत होतात त्या कर्जाला माफी मिळाली नाही, हे दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही अट रद्द करून ३० जून २०१७ च्या स्तरावर जे शेतकरी थकीत होणार आहेत. त्यांना कर्जमाफी द्यावी तेव्हाच सरसकट कर्जमाफी म्हणता येईल, असे म्हटले आहे.मध्यम मुदती कर्जाला माफी असा उल्लेख असला तरी मध्यम मुदती कर्जाची व्याख्या स्पष्ट नसल्यामुळे रूपांतर व पुर्नगठणाचा लाभ मिळालेले शेतकरी व त्याचे थकीत कर्ज कसे ठरवावे याबद्दल बँक / सेवा सहकारी संस्थाच्या स्तरावर संभ्रम निर्माण झाला असून कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. त्याच परिपत्रकात, पुढील सुचना व निकष देण्याची बाब उल्लेखित आहे. पंरतु अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून स्पष्ट सूचना व विहित नमुणे, जिल्हा बँकाना पुरवावे जेणेकरून या अचूक नमुन्यात माहिती गोळा होईल, अन्यथा प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या निर्देशामुळे पुन्हा संभ्रमावस्था निर्माण होईल असेही डॉ.मालगावे यांनी म्हटले आहे.