शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी संकल्पालाच हरताळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2017 00:25 IST

राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहिर केली असली तरी...

मालगावेंचा आरोप : केवळ २० टक्के शेतकऱ्यांना मिळणार कर्जमाफीचा लाभलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : राज्य शासनाने छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेअंतर्गत कर्जमाफी जाहिर केली असली तरी प्रशासनाने शासकीय परिपत्रकाद्वारे या कर्जमाफी संकल्पालाच हरताळ फासल्याचा आरोप भाजपचे पदाधिकारी डॉ.प्रकाश मालगावे यांनी केला आहे.मुख्यमंत्र्यांना पाठविलेल्या कर्जमाफीचे सुतोवाच करून १४ जून २०१७ च्या शासकीय परिपत्रकानुसार पात्र सभासदांसाठी निकष निश्चित केले त्यावर शेतकऱ्यांमध्ये असंतोष पसरला. त्यावर पुन्हा विचार करून २८ जून रोजी शासकीय निर्णयाद्वारे काही अटी शिथिल केल्या असल्या तरी नविन अट समाविष्ट करण्यात आली. त्यानुसार १ एप्रिल २०१२ नंतरच्या ३० जून २०१६ पर्यंतच्या थकीत कर्जाला माफ करण्याचा निर्णय घोषित केला. पंरतु या अटीमुळे केवळ २० टक्के शेतकऱ्यांना कर्जमाफी होत आहे. ३१ मार्चपूर्वी कर्जाची परतफेड केल्यास शुन्य टक्के व्याज लावण्याची घोषणा सन २०११ मध्ये करण्यात आल्यामुळे ८० टक्के शेतकरी चालु कर्ज भरीत होते. त्यामुळे शेतकरी खऱ्या अर्थाने ज्या कर्जामळे थकीत होतात त्या कर्जाला माफी मिळाली नाही, हे दुर्देवी असल्याचे म्हटले आहे. त्यामुळे ही अट रद्द करून ३० जून २०१७ च्या स्तरावर जे शेतकरी थकीत होणार आहेत. त्यांना कर्जमाफी द्यावी तेव्हाच सरसकट कर्जमाफी म्हणता येईल, असे म्हटले आहे.मध्यम मुदती कर्जाला माफी असा उल्लेख असला तरी मध्यम मुदती कर्जाची व्याख्या स्पष्ट नसल्यामुळे रूपांतर व पुर्नगठणाचा लाभ मिळालेले शेतकरी व त्याचे थकीत कर्ज कसे ठरवावे याबद्दल बँक / सेवा सहकारी संस्थाच्या स्तरावर संभ्रम निर्माण झाला असून कर्जमाफीचा लाभ शेतकऱ्यांना होणार नाही. त्याच परिपत्रकात, पुढील सुचना व निकष देण्याची बाब उल्लेखित आहे. पंरतु अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणेकडून स्पष्ट सूचना व विहित नमुणे, जिल्हा बँकाना पुरवावे जेणेकरून या अचूक नमुन्यात माहिती गोळा होईल, अन्यथा प्रत्येक स्तरावर वेगवेगळ्या निर्देशामुळे पुन्हा संभ्रमावस्था निर्माण होईल असेही डॉ.मालगावे यांनी म्हटले आहे.