शहरं
Join us  
Trending Stories
1
तीन राज्यांचे पोलीस होते मागावर, अखेर असे मारले गेले दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणारे हल्लेखोर
2
पाकिस्तानवर कुणी हल्ला केल्यास तर 'हा' इस्लामिक देश थेट युद्धात उतरणार; काय आहे 'डिफेन्स डील'?
3
राज्याचे तीन महिने आचारसंहितेत; ‘झेडपी’मध्ये याचिकांचाच अडसर
4
आजचे राशीभविष्य- १८ सप्टेंबर २०२५: नोकरी- व्यवसायात अडचणी येतील; अनपेक्षित घटना घडण्याची शक्यता
5
तीस जिल्ह्यांत १७ लाख हेक्टरवरील पिकांची माती; अतिवृष्टीचा सर्वाधिक फटका नांदेड जिल्ह्याला
6
लोकशाहीचा पाचोळा होऊ नये !... तर लोकशाही केवळ नावापुरती उरेल
7
‘गर्व से कहो यह स्वदेशी हैं’ प्रत्येक दुकानावर फलक लावा ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा दिला स्वदेशीचा नारा
8
नोकरीच्या नावाखाली बनवले ‘गुलाम’, थायलंडमध्ये नोकरीचे आमिष दाखवून केली फसवणूक
9
उपराष्ट्रपतींची निवडणूक : ‘कोऱ्या’ मतपत्रिकांचे रहस्य!
10
एअर इंडिया अपघाताची सरकारने चौकशी करावी; माझ्या मुलावर बट्टा नको, सुमितच्या वडिलांची मागणी
11
मृतदेहाची ‘डोली’तून दोन किमी फरपट, मृत्यूनंतरही अवहेलना
12
देशातील दोनच राज्यांत त्रिभाषा सूत्र, हिंदी सक्तीवरून वाद; नरेंद्र जाधव समितीची पहिली बैठक संपन्न; जनमत जाणून देणार अहवाल
13
विरार-डहाणू रोडदरम्यान सात स्टेशन; चौपदरीकरणामुळे गर्दी टाळण्यास मदत
14
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
15
Asia Cup 2025 : पाकनं UAE संघाला केलं 'आउट'! Super 4 मध्ये पुन्हा सेट झाली IND vs PAK मॅच
16
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
17
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
18
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
19
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
20
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!

लाखांदूर तालुक्यात नदीकाठच्या गावांत गाळांचे थर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 05:00 IST

२८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते.

ठळक मुद्देहजारो हेक्टर शेती पीक झाले नष्ट, शेकडो घरांचे नुकसान, सर्वत्र दुर्गंधीयुक्त वातावरण

लोकमत न्यूज नेटवर्कलाखांदूर : तालुक्यातील वैनगंगा व चूलबंद नदीला पूर येऊन पुराचे पाणी नदीकाठावरील अनेक गावातील घरात व शेतीतपीकांत जमा झाले होते. यामुळे या घटनने हजारो हेक्टर पीकांखालील शेती नष्ट होत शेकडो घरांचे नुकसान झाले आहे. मात्र तब्बल दोन-तीन दिवसांनी सदर पुराचे पाणी ओसरत असल्याने पुरबाधित सर्वच गावात दुगंर्धीचे वातावरण निर्माण झाले असून गावात गाळांचे थर साचल्याचे दिसून येत आहेत. २८ ऑगष्ट रोजी जिल्ह्यात अतिवृष्टीने गोसी (खु.) धरणाचे पाणी वैनगंगा नदीला मोठ्या प्रमाणात सोडले गेल्याने वैनगंगेच्या पाण्याचा दाब निर्माण होऊन तालुक्यात वैनगंगेसह चुलबंद नदीला देखील मोठा पूर आला होता. या नदीला चक्क तिसऱ्यांदा पूर आल्याने नदीकाठावरील गावांसाह लगतच्या गावातील पीक शेतीसह घरांचे मोठे नुकसान होत पडझड झाले आहे. वैनगंगा नदीकाठावरील जवळपास ६५० घरात पुराचे पाणी शिरल्याने संबंधितांना प्रशासनाने स्थलांतरीत देखील केले होते. या पुरामुळे शेकडो घरांची पडझड व लागवडी खालील पिक शेती पुर्णत: नष्ट होत रस्तेदेखील खड्डेमय झाले आहेत. पुराने विरली (खु.) येथील गोवर्धन कुथे नामक तरुण शेतकºयाचे कुक्कुट पालन व मत्स्य केंद्र पुराच्या पाण्यात वाहुन गेल्याने सुमारे सहा लक्ष रुपयांचे नुकसान झाले आहे. डांभेविरली येथील एका शेतकºयाची टरबूज शेती पुर्णत: नष्ट होवून लाखोंचे नुकसान झाले आहे. पूर संकटामुळे घरे, शेती व रस्त्यांची मोठी हानी झाली आहे. पूर ओसरतच पूर बाधित गावात प्रचंड दर्गंधी पसरली असून आरोग्याचे संकट निर्माण झाले आहे.स्वच्छता मोहीम गरजेचीवैनगंगेला आलेल्या पुरामुळे तालुक्यातील अनेक घरामध्ये तसेच गावात ठिकठिकाणी चिखल पसरला आहे. त्यामुळे तालुका प्रशासनाने स्वच्छता मोहीम राबविण्याची गरज आहे. यामुळे अनेक आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या असून कोरोना संकटामुळे नागरिकांना विशेष उपाययोजना करण्यासाठी मार्गदर्शन करण्याची गरज आहे. नागरिकांना मोफत औषधे तसेच दवाखान्याच्या सोयी उपलब्ध करून देण्याची गरज आहे.

टॅग्स :floodपूर