शहरं
Join us  
Trending Stories
1
निमिषा प्रियाची फाशी आता अटळ? ब्लड मनीसाठी ठाम नकार; सुप्रीम कोर्टाने काय म्हटलं?
2
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
3
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
4
नेते आणि गुन्हेगार कसे ब्लॅक मनीला व्हाईट मनी बनवतात; ED च्या माजी प्रमुखांचा गौप्यस्फोट
5
अलर्ट! गुगल वाचू शकतं तुमचे WhatsApp मेसेज; फक्त 'ही' सेटिंग्ज बदलून राहा सेफ
6
पाय घसरून पुराच्या पाण्यात वाहून गेली महिला, १० तास चालला मृत्यूशी संघर्ष, अखेर ६० किमी अंतरावर झाली सुखरूप सुटका
7
मोठी बातमी! मनपा निवडणुकीपूर्वी उद्धव ठाकरेंना मिळणार 'कौल'?; सुप्रीम कोर्टात आज काय घडलं? 
8
Vivo X200 FE: विवोच्या नव्या फोनची बाजारात दहशत; थेट अ‍ॅपलशी स्पर्धा? गुगल, सॅमसंगनेही डोक्याला लावला हात!
9
शेजारच्या देशात एअरस्ट्राईक, ड्रोन-मिसाइलच्या सहाय्यानं जबरदस्त हल्ला; भारतानं दिलं उत्तर!
10
Countries Without Rivers: जगातल्या 'या' ६ देशांमध्ये एकही नदी नाही! मग, कशी भागवतात लोकांची तहान?
11
“जयंत पाटील अन्य पक्षात जाणार असतील, तर त्यांना शिंदेसेनेत आणू”; कोणत्या नेत्यांचा निर्धार?
12
धक्कादायक! यावर्षी १.१२ कोटी SIP बंद, गुंतवणूकदार म्युच्युअल फंडांपासून दूर पळतायत? काय आहे कारण?
13
ज्याच्या नावाने थरथर कापायचे लोक, त्याचा सडलेला मृतदेह सापडला?; कॉन्डमच्या साठ्यामुळे उलगडले रहस्य
14
चवीच्या नादात खाताय जास्त मीठ; महामारीसारखे पसरतात 'हे' आजार, धडकी भरवणारा रिपोर्ट
15
Indian Bank मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळेल ₹२९,३२५ चं फिक्स व्याज; पटापट चेक करा कॅलक्युलेशन
16
Air India Plane Crash :'विमानात कोणतीही यांत्रिक समस्या नव्हती, आताच निष्कर्ष काढू नका', AAIB अहवालावर एअर इंडियाच्या सीईओंचे विधान
17
'बॉलिवूडपेक्षाही मराठी सिनेमा भारी', नवाजुद्दीन सिद्दीकी अन् जयदीप अहलावत यांची प्रतिक्रिया चर्चेत
18
Ola Electric Mobility Q1 Results: निव्वळ तोटा वाढून ४२८ कोटींवर पोहोचला; नफाही ५० टक्क्यांनी कमी झाला, तरीही शेअरमध्ये १६ टक्क्यांची तेजी
19
पहलगाम हल्ला मोठी सुरक्षा चूक; घटनेची पूर्ण जबाबदारी माझी; मनोज सिन्हांचे मोठे वक्तव्य
20
Gold Silver Price 14 July: चांदीनं तोडले सर्व रेकॉर्ड, एका झटक्यात ₹३४८३ ची वाढ; सोन्यातही मोठी तेजी, खरेदीपूर्वी पाहा नवे दर

सासरच्या घरी शौचालय पाहिजे

By admin | Updated: October 22, 2015 00:36 IST

ना गाडी, ना बंगला पाहिजे तर सासरच्या घरी फक्त एक शौचालय पाहिजे, आप मेरा एक बार कहना मान लिजीए, घर मे एक बार संडास बनवा लिजिए, ...

स्वच्छतामित्र वक्तृत्व स्पर्धा : विद्या झोडे, रुपाली दिघोरे ठरल्या विजेत्याभंडारा : ना गाडी, ना बंगला पाहिजे तर सासरच्या घरी फक्त एक शौचालय पाहिजे, आप मेरा एक बार कहना मान लिजीए, घर मे एक बार संडास बनवा लिजिए, अशा एक नव्हे तर अनेक एकापेक्षा एक सरस काव्यपंक्तीने स्वच्छतामित्र वक्तृत्व करंडक स्पर्धेत विद्यार्थ्यांनी विचार मांडल्याने स्वच्छ भारत मिशन या कार्यक्रमाच्या माध्यमातून घेण्यात आलेली स्पर्धा अधिकच प्रभावी ठरली. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील स्पर्धकांनी एवढ्यावरच आपले विचार मर्यादित ठेवले नाही तर निर्मलग्रामच्या सरपंचाची गावाप्रती भूमिका, मानवी आरोग्याला शुद्ध व स्वच्छ पाण्याची गरज, आपले पाणी आपली योजना, हागणदारीमुक्त गावांसाठी तरुण युवकांचा सहभाग, स्वच्छतेचे विचार घराघरात पोहचविण्यासाठी तरुणाईचा जोश, स्वच्छतेतून समृद्धीकडे गावांना नेण्यासाठी लोकसहभागीय भूमिका यासह विविध विषयावर आपले विचार स्पर्धेतून मांडून गावांना स्वच्छ व समृद्ध बनविण्यासाठी सकारात्मक संदेश दिला.जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन जि.प. भंडारा व पंचायत समिती लाखांदूर यांचे वतीने १७ आॅक्टोबर २०१५ ला लाखांदूर येथे शिक्षण विभागाच्या सभागृहात कनिष्ठ व वरिष्ठ गटासाठी स्वच्छता मित्र वर्क्तृत्व करंडक स्पर्धा पार पडली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज व संत गाडगेबाबा यांचे प्रतिमेला माल्यार्पणाने स्पर्धेचे उद्घाटन पार पडले. मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांचे मार्गदर्शनात उपमुख्यकार्यकारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) धांडे, गट विकास अधिकारी झिंगरे यांचे नेतृत्वात पार पडलेल्या स्पर्धेला यावेळी सेवानिवृत्त प्राचार्य भेंडारकर, सेवानिवृत्त गटशिक्षणाधिकारी एस.झेड. राऊत, सेवानिवृत्त प्राचार्य बी.एस. मेश्राम, विस्तार अधिकारी मेंढे, जिल्हा कक्षाचे माहिती शिक्षण संवाद सल्लागार राजेश्वर येरणे, वित्त नि संपादणूक सल्लागार बबन येरणे, गट समन्वयक त्रिरत्ना उके, समूह समन्वयक जगदीश तऱ्हेकार, चेतन मेश्राम आदी मान्यवरांची उपस्थिती होती.यावेळी मार्गदर्शन करताना सेवानिवृत्त प्राचार्य भेंडारकर म्हणाले, ग्रामीण भागात शुद्ध व स्वच्छ पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आ वासून उभा ठाकतो आहे. मानवी आरोग्याला चांगले ठेवायचे असेल तर शुद्ध पाणी गावागावात मिळणे आवश्यक आहे. शरीराला आजार जडल्यास ज्या प्रमाणे औषधोपचाराची गरज असते, त्याच प्रमाणे शुद्ध व स्वच्छ पाण्याची गरज आहे. याकरिता विद्यार्थी युवकांनी पाणी व स्वच्छतेबाबतचे आपले विचार गावागावात पोहचविले तर सकारात्मक विचारांचा फायदा नागरिकांकरिता करून घेता येईल असे सांगितले. एकापेक्षा एक सरस विचार स्पर्धेतून मांडण्यात आल्याने स्पर्धेत पाणी व स्वच्छतेची वातावरण निर्मिती झाली होती. कनिष्ठ व वरिष्ठ गटातील विद्यार्थ्यांनी पाणी व स्वच्छतेबाबत एकापेक्षा एक सरस मांडलेल्या विचारांचे मूल्यांकन केल्यानंतर परीक्षकांनी स्पर्धेचा निकाल घोषित केला. त्यात कनिष्ठ गटात रुपाली दिघोरे ही प्रथम क्रमांकाची मानकरी ठरली तर द्वितीय सनम लोणारे, तृतीय प्रतीक्षा बोरकर ठरली. वरिष्ठ गटातून विद्या झोडे ही प्रथम ठरली तर द्वितीय नेहा तिघरे व तृतीय क्रमांकाचा मानकरी मंगेश राऊत हा ठरला. यातील दोन्ही गटातील प्रथम व द्वितीय क्रमांकाचे विजेते जिल्हास्तरीय स्पर्धेकरिता पात्र ठरले. स्पर्धेचे संचालन जगदीश तऱ्हेकार यांनी तर आभार त्रिरत्ना उके यांनी मानले. (शहर प्रतिनिधी)