शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

स्वच्छता अभिप्राय नोंदविण्याची सुरुवात लाखांदुरातून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2018 22:50 IST

भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात आली.

ठळक मुद्देगावागावांत मार्गदर्शन : तालुक्यात ग्रामस्तरावर शुक्रवारी एकाच दिवशी नोंदविल्या हजारो प्रतिक्रिया

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा देशव्यापी कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या कार्यक्रमांतर्गत काल शुक्रवारी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात विशेष मोहीम राबविण्यात आली. ग्रामस्तरावरील अन्ड्राईड मोबाईल धारकांनी स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविवावा या करीता अधिकारी-कर्मचारी यांनी गावागावात जावून स्थानिक लोक प्रतिनिधी, कर्मचारी यांचे पुढाकारातून अभिप्राय नोंदविण्यात आला. छोटेखानी मार्गदर्शन कार्यक्रम व त्यानंतर चळवळ स्वरूपात मोहीम राबवून नागरिक, महिला पुरूष,विदयार्थी, तरूण मंडळी यांना स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात आले. या आवाहनाला उर्त्स्फूत प्रतिसाद मिळाला असून मोबाईल धारकांनी एस एस जी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे हजारो प्रतिक्रीया नोंदविण्यात आल्या.भारत सरकारच्या पेयजल व स्वच्छता मंत्रालयाच्या वतीने १ ते ३१ आॅगस्ट २०१८ या कालावधीत स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. भंडारा जिल्हयात मुख्य कार्यकारी अधिकारी मा.श्री रविंद्र जगताप यांचे मार्गदर्शनात, उप मुख्य कार्य कारी अधिकारी (पाणी व स्वच्छता) श्री सपाटे यांचे नेतृत्वात स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१८ कार्यक्रमाची अंमलबजावणी करण्यात येत आहे. या सर्वेक्षणांतर्गत ग्रामस्तरावरील सार्वजनिक स्थळे शाळा, अंगणवाडी, ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद, उपकेंद्र, धार्मिक स्थळ, बाजाराची ठिकाणे व गावातील अन्य महत्वाचे सार्वजनिक स्थळांची स्वच्छतेबाबत केआरसीच्या वतीने पडताळणी करण्यात आली. तसेच स्वच्छतेबाबत ग्राम सेवक, आशा, अंगणवाडी सेवीका, ग्रामस्थांची या सर्वेक्षणाच्या माध्यमातून केआरसी वतीने मते जाणून घेण्यात आली. केआरसी च्या वतीने सार्वनिक जागेवरील स्वच्छतेचे निरीक्षण, शासनाच्या संकेतस्थळावरील माहितीच्या आधारे स्वच्छता विषयक सदयास्थिती व मुख्य प्रभावी व्यक्तींची माहिती, मते, अभिप्राय घेण्यात आले आहे. स्वच्छतेसोबतच मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत ५ टक्के प्रतिक्रीया एस एस जी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे नोंदवावयाच्या आहेत. संपूर्ण भंडारा जिल्हयात मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत सकारात्मक प्रतिक्रीया नोंदविण्यासाठी जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन कक्ष व पंचायत समिती स्तरावरून नियोजन करण्यात आलेले आहे. तालुकास्तरावरील अधिकारी ,कर्मचारी, स्थानिक लोक प्रतिनिधी व कर्मचारी यांनी सहकायार्ने भंडारा जिल्हयाची स्वच्छतेची क्रमवारी वाढविण्यासाठी पुढाकार घेतलेला आहे. २४ आॅगस्ट ला शुक्रवारी सर्वप्रथम लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी ग्रामस्तरावर स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी गटविकास अधिकारी श्री देविदास देवरे यांचे नेतृत्वात पुढाकार घेण्यात आला. विविध बैठका घेवून ही विशेष मोहीम यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी नियोजन करण्यात आलेतालुकास्तरावरून अधिकारी, विभाग प्रमुख,विस्तार अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षिका व अन्य अधिकारी यांची संपर्क अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्राम विकास अधिकारी यांचे नेतृत्वात कर्मचारी, ग्रा.पं. पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी यांची चमू तयार करून वैयक्तीक व सार्वजनिक स्तरावर अभिप्राय नोंदविण्यासाठी नियोजन करण्यात आले. ग्रामस्तरावरील चमूच्या माध्यमातून गावातील ?न्ड्राईड मोबाईल धारकांकडे या चमूने जावून त्यांना स्वच्छतेबाबत माहिती दिली.त्यांनतर त्यांच्याकडून प्रतिक्रिया नोंदविण्यासाठी मोबाईल ?पद्वारे स्वच्छतेबाबत विचारण्यात आलेल्या चार प्रश्नांची सकारात्क उत्तरे देवून प्रतिक्रीया नोंदविण्यात आल्या आहेत.स्वच्छतेबाबत अभिप्रायस्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी लाखांदूर तालुक्यात एकाच दिवशी विशेष मोहीम राबविल्यानंतर सोमवारी २७ आॅगस्ट ला तुमसर, साकोली, पवनी पंचायत समिती अंतर्गत ग्रामस्तरावर एसएसजी १८ या मोबाईल अ‍ॅपद्वारे स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. तुमसर येथे गटविकास अधिकारी प्रकाश निर्वाण, साकोली येथे गटविकास अधिकारी तडस तर पवनी येथे गटविकास अधिकारी अनिता तेलंग यांचे नेतृत्वात या विशेष मोहीमेचे नियोजन करण्यात आले आहे. तालुकास्तरावरून संपर्क अधिकारी म्हणून अधिका-यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ग्रामस्तरावर ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांचे नेतृत्वात त्यांचे कार्यरत कर्मचारी, ग्राम पंचायत पदाधिकारी, विविध समित्यांचे पदाधिकारी, स्वछता दूत व प्रभावी व्यक्तींच्या सहायाने ग्रामस्तरावर,गृहभेटी व सामूहिकरित्या भेटी घेवून स्वच्छतेबाबत अभिप्राय नोंदविण्यासाठी आवाहन करण्यात येईल व प्रतिक्रीया नोंदवून घेण्यात येईल. तालुका व स्थानिक स्तरावर या बाबत नियोजन करण्यात आले असून २७ आॅगस्टला एकाच दिवशी तुमसर, साकोली व पवनी तालुक्यात हया विशेष मोहीमेद्वारे हजारों प्रतिक्रीया नोंदविण्यात येणार आहे.