शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई सेंट्रल स्टेशनचे नाव बदलले जाणार, नवे नाव काय असणार? CM देवेंद्र फडणवीस म्हणाले...
2
हरयाणा,गोव्यासह लडाखला मिळाले नवे राज्यपाल; घोष, गुप्ता आणि गजपती राजू यांची राष्ट्रपतींकडून नियुक्ती
3
IND vs ENG : गौतम गंभीरने Live सामन्यात दिली शिवी; अपशब्द उच्चारतानाचा Video झाला व्हायरल
4
ठाकरे गटाला पुन्हा कोकणात मोठा धक्का; बडे पदाधिकारी, माजी नगरसेवकांचा रामराम, भाजपात प्रवेश
5
भाचाच्या प्रेमात वेडी झालेली बायको पळाली, घरी आणण्यासाठी गेलेल्या नवऱ्याचा हार्ट अटॅकने मृत्यू
6
भारताच्या शेअर बाजारात घसरण, पण पाकिस्तानच्या स्टॉक मार्केटमध्ये तुफान तेजी; १,३५,००० अंकांच्या पार, कारण काय?
7
"पहाटे ४ वाजता उठतो, रात्री ८ ला झोपतो", लेकाची शिस्त पाहून आर माधवनही होतो दंग; म्हणाला...
8
IND vs ENG :दुखापतग्रस्त पंत 'डिफेन्स' करताना फसला! जोफ्रा आर्चरची 'वेदनादायी' गोलंदाजी
9
Viral Video: चक्क माणसासारखं दोन पायावर उभा राहिला बिबट्या; स्वत: बघितल्याशिवाय विश्वास बसणार नाही!
10
"राज ठाकरे मराठीच्या नावावर द्वेष पसरवतात, त्यांच्यावर रासुका लावा’’, मुंबई हायकोर्टातील वकिलांची मागणी  
11
DSP सिराजला इंग्लिश बॅटर बेन डकेटशी पंगा घेणं पडलं महागात! ICC नं फाडलं 'चलान'
12
मुंबई-पुण्यात घरं घेणाऱ्यांसाठी गुडन्यूज! मालमत्ता विक्रीत ३०% घट; 'या' कारणामुळे किमती खाली येणार!
13
भयंकर! कर्ज फेडण्यासाठी, विम्याचे २ कोटी हडपण्यासाठी मित्राची केली हत्या, जिवंत जाळलं अन्...
14
अनिल अग्रवाल याच्या वेदांतानं भाजपला चार पट जास्त देणगी दिली, काँग्रेसच्या देणगीत मोठी घट, रिपोर्टमधून खुलासा
15
एकनाथ शिंदेंना ‘संजय’ लाभदायक नाही? विरोधकांनी कोंडी केली; पक्षाची डोकेदुखी वाढली!
16
Karka Sankranti 2025 : कर्क संक्रांतीला 'या' पाच राशींच्या आयुष्यात होईल मोठे संक्रमण; येतील अच्छे दिन!
17
“एसटीचे कदापि खाजगीकरण होऊ देणार नाही”; परिवहन मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
18
आधी कोट्यवधी रुपयांचे घर पाडले, आता प्रशासन छांगूर बाबाकडून पाडण्याचा खर्च ८ लाख ५५ हजार रुपये वसूल करणार
19
Ahilyanagar: पोलिसांना बघून धरणात मारल्या उड्या, एका चोराचा बुडून मृत्यू, तर दुसरा...
20
Astro Tips: बायपाससारख्या मोठ्या शस्त्रक्रीया होण्यामागे कारणीभूत असते 'ही' ग्रहस्थिती!

अखेर पालकांनीच दिले ‘नवोदय’ला सौर हिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:34 IST

जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

ठळक मुद्दे५० हजारांची लोकवर्गणी : प्रशासनाने केले होते हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र कोणतीही उपाययोजना झाली नाही. अखेर पालकांनी एकत्र येवून लोकवर्गनी केली आणि त्यातून ५० हजार रुपये किंमतीचे सौर उर्जा हिटर नवोदय विद्यालयाला भेट दिले.भंडारा जिल्ह्याला हक्काचे नवोदय विद्यालय मिळावे म्हणून विविध आंदोलने करण्यात आली. अखेर याला यश आले. भंडारा जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत नवोदय सुरु झाले. जिल्ह्याभरातील प्रज्ञावंत विद्यार्थी येथे शिक्षण घेवू लागले. मात्र याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर आंदोलन सुरु झाले. प्रशासनाने अल्पसंख्याक विभागाच्या इमारतीत नवोदय विद्यालय हलविले. परंतु त्यावरही पालकांचा आक्षेप होता. अखेर मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत नवोदय सुरु करण्यात आले.मात्र या इमारतीत कोणत्याही सुविधा नाही. सहावी आणि सातवीचे जिल्हाभरातील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुरवातीला झोपण्यासाठी बेडही नव्हते. त्यावरुन बँक आॅफ इंडियाने आपल्या सामाजिक उपक्रमांतर्गत तेथे बेडची व्यवस्था केली. मात्र समस्या विद्यार्थ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. हिवाळ्यात विद्यार्थ्यांना येथे थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती. पालकांनी प्रशासनाला निवेदन दिले. पंरतु प्रशासनाने हात वर केले. आपली मुले कुडकुडत्या थंडीत थंडगार पाण्याने आंघोळ करीत आहेत. आरोग्यावर परिणाम होईल म्हणून पालक अस्वस्थ झाले. प्रशासन ऐकत नसल्याचे पाहून पालकांनीच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती आणि पालकांकडून वर्गणी गोळा केली. तब्बल ५० हजार रुपये गोळा झाले. यातून सौरउर्जा हिटर विकत घेवून नवोदयमध्ये लावण्यात आले.शुद्ध पाण्याचा अभावनवोदय विद्यालयात पाणी शुध्दीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध असलेले अशुध्द पाणी विद्यार्थ्यांना प्राशन करावे लागते. आता आरो वॉटर प्लांट लावण्यासाठी पालकच पुढाकार घेत असून त्यासाठी पुन्हा लोकवर्गणी करण्याची तयारी पालकांनी चालविली आहे.

टॅग्स :Schoolशाळा