शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

अखेर पालकांनीच दिले ‘नवोदय’ला सौर हिटर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 7, 2018 00:34 IST

जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला.

ठळक मुद्दे५० हजारांची लोकवर्गणी : प्रशासनाने केले होते हात वर

लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : जवाहर नवोदय विद्यालय ऐनकेन प्रकारे चर्चेत राहत असून याचा त्रास तेथे शिक्षण घेणाऱ्या प्रज्ञावंत विद्यार्थ्यांना होत आहे. हिवाळ्याच्या दिवसातही या विद्यार्थ्यांना थंड पाण्याने आघोळ करावी लागत होती. हा प्रकार पालकांनी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र कोणतीही उपाययोजना झाली नाही. अखेर पालकांनी एकत्र येवून लोकवर्गनी केली आणि त्यातून ५० हजार रुपये किंमतीचे सौर उर्जा हिटर नवोदय विद्यालयाला भेट दिले.भंडारा जिल्ह्याला हक्काचे नवोदय विद्यालय मिळावे म्हणून विविध आंदोलने करण्यात आली. अखेर याला यश आले. भंडारा जिल्ह्यासाठी नवोदय विद्यालय मंजूर झाले. मात्र जागेचा मोठा प्रश्न निर्माण झाला. सुरुवातीला जकातदार विद्यालयाच्या जुन्या इमारतीत नवोदय सुरु झाले. जिल्ह्याभरातील प्रज्ञावंत विद्यार्थी येथे शिक्षण घेवू लागले. मात्र याठिकाणी कोणत्याही सोईसुविधा नसल्याचे पालकांच्या लक्षात आले. त्यानंतर आंदोलन सुरु झाले. प्रशासनाने अल्पसंख्याक विभागाच्या इमारतीत नवोदय विद्यालय हलविले. परंतु त्यावरही पालकांचा आक्षेप होता. अखेर मोहाडी येथील महिला आर्थिक विकास महामंडळाच्या इमारतीत नवोदय सुरु करण्यात आले.मात्र या इमारतीत कोणत्याही सुविधा नाही. सहावी आणि सातवीचे जिल्हाभरातील विद्यार्थी तेथे शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना सुरवातीला झोपण्यासाठी बेडही नव्हते. त्यावरुन बँक आॅफ इंडियाने आपल्या सामाजिक उपक्रमांतर्गत तेथे बेडची व्यवस्था केली. मात्र समस्या विद्यार्थ्यांची पाठ सोडायला तयार नव्हते. हिवाळ्यात विद्यार्थ्यांना येथे थंड पाण्याने आंघोळ करावी लागत होती. पालकांनी प्रशासनाला निवेदन दिले. पंरतु प्रशासनाने हात वर केले. आपली मुले कुडकुडत्या थंडीत थंडगार पाण्याने आंघोळ करीत आहेत. आरोग्यावर परिणाम होईल म्हणून पालक अस्वस्थ झाले. प्रशासन ऐकत नसल्याचे पाहून पालकांनीच पुढाकार घेतला. जिल्ह्यातील दानशुर व्यक्ती आणि पालकांकडून वर्गणी गोळा केली. तब्बल ५० हजार रुपये गोळा झाले. यातून सौरउर्जा हिटर विकत घेवून नवोदयमध्ये लावण्यात आले.शुद्ध पाण्याचा अभावनवोदय विद्यालयात पाणी शुध्दीकरणाची कोणतीही व्यवस्था नाही. त्यामुळे उपलब्ध असलेले अशुध्द पाणी विद्यार्थ्यांना प्राशन करावे लागते. आता आरो वॉटर प्लांट लावण्यासाठी पालकच पुढाकार घेत असून त्यासाठी पुन्हा लोकवर्गणी करण्याची तयारी पालकांनी चालविली आहे.

टॅग्स :Schoolशाळा