शहरं
Join us  
Trending Stories
1
"संतोष देशमुखांच्या खुनाचा बदला होणार..."; कसा होणार? मनोज जरांगे यांनी स्पष्टच सांगितलं!
2
मोठी घडामोड! अमेरिकेविरोधात युद्धास तयार झाला हा देश; ३७ लाखांच्या सैन्याला तयारीचे आदेश, रशियाचेही समर्थन...
3
"भारतीय कंपन्या 'क्रोनीझम'ने नाही, तर..", राहुल गांधींचे कोलंबियातून भाजपवर टीकास्त्र
4
Video - अग्निकल्लोळ! लॉस एंजेलिसमध्ये रिफायनरीला भीषण आग, परिसरात धुराचं साम्राज्य
5
मारुतीचं साम्राज्य धोक्यात...? ह्यूंदाई-महिंद्राला पछाडत 'ही' कंपनी बनली देशातली No.2 ब्रँड! 'MS' पासून फक्त एक पाऊल दूर
6
हृदयद्रावक! कफ सिरप पिऊन झोपला अन् उठलाच नाही; मोफत औषधामुळे मुलाचा मृत्यू
7
Bigg Boss 19: आता खरी मजा येणार! भारतीय क्रिकेटरची बहीण 'बिग बॉस'च्या घरात येणार, कोण आहे ती?
8
पाशांकुश एकादशीला 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; काय घ्यावी काळजी? वाचा!
9
उद्धव ठाकरेंची सोडली साथ, शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करताच राजन तेली म्हणाले, "दुर्दैवाने तिथे..."
10
डोनाल्ड ट्रम्प यांना धक्का! 'भारतातून मालाची आयात वाढवण्याचे पुतिन यांचे आदेश; पंतप्रधान मोदींचे कौतुकही केले
11
एआयपासून बनलेली जगातील पहिली अभिनेत्री, ओळखून दाखवणं कठीण; कलाकारांकडून तीव्र निषेध!
12
सकाळी रुग्णालयात... संध्याकाळी जिंकलं गोल्ड मेडल; रोझा कोझाकोव्स्काच्या जिद्दीला सॅल्यूट!
13
"मला त्याची गरज आहे...", घटस्फोटानंतर एकटीच करतेय मुलाचा सांभाळ; अभिनेत्री म्हणाली...
14
डॉक्टरांच्या खराब हँडरायटिंगवर हायकोर्टचा 'स्ट्राँग' डोस! म्हणाले, रुग्णांच्या आयुष्याशी खेळ...
15
टाटा मोटर्सचा IPO... दोन दिवसांनी कमाईची संधी, लिस्टिंग कधी, प्राईज बँड काय, सर्वकाही जाणून घ्या
16
"'युद्ध का डर...!'; आम्ही कागदी वाघ, तर मग नाटो कोण?" पुतिन यांचा अमेरिकेवर तगडा प्रहार, भारतासंदर्भातही स्पष्टच बोलले!
17
VIDEO : केएल राहुलनं शिट्टी मारत साजरी केली सेंच्युरी; जाणून घ्या त्यामागचं कारण
18
त्या' 11 संशयितांची कसून चौकशी अकोला, मुंबईचे पोलीस पथक परतवाड्यात दाखल, इंट्रोगेशन सुरू
19
अमेरिकेनंतर आणखी एका मोठ्या देशात शटडाऊन; कर्मचारीच गेले संपावर, पर्यटन स्थळेही झाली बंद...
20
Mirabai Chanu : मीराबाई चानूने वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रचला इतिहास; १९९ किलो वजन उचलून जिंकलं सिल्व्हर मेडल

गावतलाव मोजताहेत अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:22 IST

मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देखोलीकरणाची गरज : दुर्लक्षामुळे गावागावांना बसतोय पाणीटंचाईचा फटका

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या भरोश्यावर भात शेती केली जाते. गुराढोरांची तहान भागते. नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळते. तलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ व्हायची. पंरतू आता सर्वच तलावच धोक्यात आले आहेत. पाणी बचतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसेच तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्या समान झाले आहे. परिणामी गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहे.या गावतलावांचे पुर्नरुज्जीव करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षापुर्वी लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार व नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी लोकसहभागतून गाळ उपसा केला. त्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले. पंरतू आता याकडे दुर्लक्ष होत आहे.देवरीगोंदी तलावाचे असेच ४० वर्षांपासून भिजत घोंगडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आमदार बाळा काशिवार यांना तलावाची हकीकत सांगितली. त्यानंतर या तलावाचे काम हाती घेण्यात आले. वर्षभरात तलाव व कालव्याचे काम केले. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा तलाव आता जीवनदायी ठरत आहे. असेच सर्व तलावांसाठी केल्यास जिल्ह्यातील तलाव उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरुन राहतील.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई