शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! १५ हजार पोलीस भरतीस मंजुरी; मंत्रिमंडळाच्या बैठकीत ४ महत्त्वाचे निर्णय, वाचा
2
“निवडणुका आल्या की मनोज जरांगे वातावरण खराब करतात, त्यांचा रिमोट पवारांकडे”; कुणी केली टीका?
3
न्यायमूर्ती वर्मा यांच्याविरुद्ध महाभियोग प्रस्ताव लोकसभेत मंजूर; ओम बिर्लांनी स्थापन केली समिती
4
दिल्लीनंतर आता राजस्थानमध्येही भटक्या कुत्र्यांना हटविण्याचे आदेश; महाराष्ट्रात कधी?
5
पोटाच्या नसा तुटल्या, यकृत फाटलं; बॉयफ्रेंडसोबत मिळून पत्नीने पतीला बेदम मारलं! लेकीने केला आईचा गुन्हा उघड
6
देशावर आलं तर भारतीयांनी शपथच घेतली! अमेरिकन ब्रांड्सना करणार बॉयकॉट? McD, Coca-Cola, Amazon, Apple चं काय होणार
7
असीम मुनीरचा एकुलता एक मुलगा काय करतो? ज्याच्या जीवावर पाकिस्तान भारताला देतोय धमक्या
8
कोण असेल एनडीएचा उपराष्ट्रपतीपदाचा उमेदवार? मोदी आज निर्णय घेणार, या नेत्याचं नाव चर्चेत
9
गुंतवणूकदारांवर आली डोकं झोडून घ्यायची वेळ, एका वर्षात अर्ध्या झाला शेअर; तरीही तज्ज्ञ म्हणतायत खरेदी करा!
10
...तर निवडणूक आयोगाला हृदयविकाराचा झटका आला असता का?; 'मतचोरी'वरून संजय राऊतांचा हल्लाबोल
11
Health Tips: रात्री ब्रा काढून झोपल्याने ब्रेस्टसाईज वाढते की स्तन ओघळतात? डॉक्टर सांगतात...
12
शिव्यांची लाखोली, एकमेकांची कॉलर पकडली...; शिंदेसेनेच्या बैठकीत जोरदार राडा, पोलिसांची धावपळ
13
चीनवर ट्रम्प यांचं प्रेम जातंय उतू, टॅरिफवर ९० दिवसांची सूट; जिनपिंगना म्हटलं 'चांगला मित्र', कारण काय?
14
दहिसर टोल नाका वेस्टर्न हॉटेलसमोर स्थलांतरित करावा; प्रताप सरनाईकांची एकनाथ शिंदेंकडे मागणी
15
मुंबई: सह्याद्री अतिथीगृहासमोर BEST बसची कारला जोरदार धडक, महिलेचा चिरडून मृत्यू
16
चोरांचा कारनामा! अवघ्या १८ मिनिटांत १४ कोटींचं सोनं, ५ लाखांवर डल्ला; हेल्मेट घालून आले अन्...
17
धनंजय मुंडेंकडून CM फडणवीसांबद्दल भर सभेत गौरवोद्गार, कौतुकाच्या माळेतून मंत्रि‍पदाची गळ?
18
२० विमाने अन् ५० जहाजे गिळली...! बर्म्युडा ट्रँगलचे रहस्य शास्त्रज्ञांनी उलगडले खरे, पण... नुकतेच एक विमान...
19
'वॉर २'च्या प्रमोशनवेळी ज्युनिअर एनटीआरचा पारा चढला, रागारागात चाहत्यांना दिली ताकीद
20
सावधान! बनावट नोटांचा सुळसुळाट! तुमच्या हातातली नोट खरी की खोटी, असे ओळखा!

गावतलाव मोजताहेत अखेरच्या घटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 19, 2019 00:22 IST

मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.

ठळक मुद्देखोलीकरणाची गरज : दुर्लक्षामुळे गावागावांना बसतोय पाणीटंचाईचा फटका

मुखरु बागडे।लोकमत न्यूज नेटवर्कपालांदूर : मालगुजारी काळापासून गावात उताराच्या ठिकाणी तलाव बांधल्या गेले. या तलावामुळे गावकऱ्यांचा पिण्याच्या पाण्यासह सिंचनाची चिंता मिटली. काळानुरुप तलावाची देखभाल दुरुस्ती करणे गरजेचे होते. मात्र त्याकडे दुर्लक्ष झाले आणि आता गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहेत.भंडारा जिल्हा तलावाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. या तलावाच्या भरोश्यावर भात शेती केली जाते. गुराढोरांची तहान भागते. नागरिकांना हक्काचे पिण्याचे पाणी मिळते. तलावातील पाण्यामुळे गावातील जलस्त्रोतात वाढ व्हायची. पंरतू आता सर्वच तलावच धोक्यात आले आहेत. पाणी बचतीकडे जसे दुर्लक्ष झाले तसेच तलावाच्या देखभाल दुरुस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले. पुर्वी अथांग दिसणारे तलाव आता डबक्या समान झाले आहे. परिणामी गाव तलाव अखेरच्या घटका मोजत आहे.या गावतलावांचे पुर्नरुज्जीव करण्याची गरज निर्माण झाली आहे. दोन वर्षापुर्वी लाखनीचे तहसीलदार राजीव शक्करवार व नायब तहसीलदार विनोद थोरवे यांनी लोकसहभागतून गाळ उपसा केला. त्यावेळी नागरिकांनी सहकार्य केले. पंरतू आता याकडे दुर्लक्ष होत आहे.देवरीगोंदी तलावाचे असेच ४० वर्षांपासून भिजत घोंगडे होते. माजी जिल्हा परिषद सदस्य भरत खंडाईत यांनी आमदार बाळा काशिवार यांना तलावाची हकीकत सांगितली. त्यानंतर या तलावाचे काम हाती घेण्यात आले. वर्षभरात तलाव व कालव्याचे काम केले. दृष्काळ सदृष्य परिस्थितीत हा तलाव आता जीवनदायी ठरत आहे. असेच सर्व तलावांसाठी केल्यास जिल्ह्यातील तलाव उन्हाळ्यातही पाण्याने तुडूंब भरुन राहतील.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई