शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

भूमिअभिलेख कार्यालय पाच महिन्यांपासून अंधारात

By admin | Updated: June 1, 2016 01:50 IST

प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते

पाच वर्षांपासून प्रभारी अधिकारी : वीज बिल न भरल्याने कामे खोळंबली लाखांदूर : प्रमुख अधिकाऱ्याच्या पदावर प्रभारी अधिकाऱ्याची पाच वर्षापासून नियुक्ती असल्याने शासकीय कामे व कार्यालयाची कशी वाताहत होते याचे उत्तम उदाहरण येथील भूमिअभिलेख कार्यालयात तालुक्यातील नागरिकांना पाच वषार्पासून बघायला मिळत आहे. वीज पुरवठा खंडीत, पाण्याची समस्या यामुळे कर्मचाऱ्यांची काम करण्याची मानसिकता नसल्याने कामे खोळंबली आहेत.तालुक्याच्या ठिकाणी नागरिक व शेतकऱ्यांची कामे वेळेवर व्हावी, यासाठी उघडण्यात आली. या कार्यालयाअंतर्गत ६३ ग्रामपंचायत व ७९ गावाचा कारभार चालतो. शेतकऱ्यांचे शेती व जमिनीसंदर्भात महत्त्वाचे दस्ताऐवज या कार्यालयात राखून ठेवले जातात. शासनाच्या नविन धोरणानुसार आता शेतकऱ्यांना आनलाईन दस्ताऐवज मिळणे सुरू झाले. महत्त्वाच्या कार्यालयाच्या यादीत हे कार्यालय महत्त्वाची भुमीका बजावत असताना प्रशासन व अधिकाऱ्यांच्या बेजबाबदारपणामुळे हे कार्यालय बेभरवशाचे झाले आहे. मागील पाच वषार्पासून या कार्यालयात प्रभारी मुख्य अधिकारी म्हणुन नियुक्ती असल्याने. कर्मचाऱ्यावर वचक राहिला नाही. मागील पाच महिण्यांपासून वीज बिल न भरल्याने विद्युत पुरवठा खंडीत करण्यात आला. संपुर्ण उन्हाळ्यात येथील कर्मचारी उष्णता अंगावर झेलुन काम करताना दिसत होते. मात्र मानसिकता बिघडत असल्याने कर्मचारी कामे टाकून कार्यालयाबाहेर पडून थंडाव्याच्या शोधात फिरताना दिसतात.विद्युत पुरवठा खंडीत झाल्याने सर्व आनलाईन कामे मागील पाच महिण्यापासून बंद आहे. येथील कर्मचाऱ्यांची मानसिकता खराब झाल्याने कार्यालयीन कामासाठी आलेल्या शेतकरी व नागरिकावर येथील काही कर्मचारी कामे करुन न देता अर्वाच्च शब्दात बोलुन हाकलुन लावल्याचा प्रकार येथील अर्जनविस दररोजच अनुभवतात. त्यामुळे लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरू करून न शासकीय कामे नियमित सुरु करण्याची तसेच कायमस्वरूपी मुख्य अधिकाऱ्याची नियुक्तीची मागणी नगरपंचायस्त सदस्य प्रल्हाद देशमुख यानी केली आहे. (तालुका प्रतिनिधी)