शहरं
Join us  
Trending Stories
1
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
2
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
3
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
4
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
5
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
6
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 
7
हेल्थ-लाईफ इन्शुरन्स, दैनंदिन वापराच्या गोष्टी होणार स्वस्त; या गोष्टी महागणार, दिवाळीनंतर GST मध्ये मोठा बदल
8
४ तासांची भेट, एकाच खोलीतून ७००० अणुबॉम्बवर नियंत्रण; पुतिन-ट्रम्प भेटीत हायटेक सुरक्षा
9
'जरा... जरा मराठी'! गोड 'कॅडबरी'च्या तोंडी मराठीचे 'धडे'; तुम्हीही म्हणाल, खूपच भारी 
10
Agni-6 Missile : मोठी तयारी! अग्नि-६ क्षेपणास्त्र किती धोकादायक? भारत चाचणी करू शकतो, २ दिवसांचा नोटम जारी
11
पालघर: मालवाहू जहाजाची मासेमारी करणाऱ्या बोटीला धडक, चार मच्छिमार पडले समुद्रात; 15 मच्छिमारांना कुणी आणले किनाऱ्यावर?
12
बुलढाणा: जलसमाधी आंदोलन करायला गेले अन् आंदोलकच गेला वाहून; अधिकाऱ्यांसोबत कशावरून झाली बाचाबाची?
13
कोट्यवधीची रोकड, ६.७ किलो सोनं आणि..., काँग्रेसच्या आमदाराकडे सापडलं घबाड, EDची कारवाई   
14
हुमायूं मकबऱ्यात भिंत कोसळली, ७-८ जण दबले; मदत कार्य सुरू; व्हिडीओ आला समोर
15
'अमरीका ने कुत्ते पाले, वर्दी वाले-वर्दी वाले', पीओके मध्ये पाकिस्तान लष्कर प्रमुखांविरोधात घोषणा; व्हिडीओ व्हायरल
16
"चीनपेक्षाही धोकादायक म्हणजे RSS…"; ओवेसींनी साधला निशाणा, PM मोदींना विचारला एक प्रश्न
17
डोनाल्ड ट्रम्प भेटीपूर्वी व्लादिमीर पुतिन यांचा झटका; ४१५ कोटींचं लढाऊ विमान 'गायब'? 
18
ज्या चित्रपट निर्मात्याला राखी बांधली, पुढे त्याचीच पत्नी बनली ही अभिनेत्री, लग्नापूर्वीच...    
19
"भटक्या कुत्र्यांना शेल्टर होममध्ये ठेवल्याने प्रश्न सुटणार नाही, तर..."; सरसंघचालक भागवतांनी काय सुचवला पर्याय?
20
VIDEO: जय महाकाल !! आशिया कपआधी गौतम गंभीर सहकुटुंब महाकालेश्वराच्या चरणी, भस्म आरतीही केली!

भूमी अधिग्रहण बिल शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे

By admin | Updated: April 23, 2015 00:17 IST

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे.

पत्रपरिषद : विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मोर्चा काढणारभंडारा : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे. यात औद्योगिक कॉरीडोअरच्या नावाखाली उद्योगपतींना भरभराटीचे दिवस तर शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. भूमी अधिग्रहण बिल, एपीएल धारकांना धान्य, धानाला भाव, ऊसाचे चुकारे यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने दि. ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार तथा भंडारा जिल्हा प्रभारी विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज सकाळी ११.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, आनंदराव वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे,काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, सीमा भुरे, प्रमिला कुटे यासह अन्य उपस्थित होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने भूमी अधिग्रहण कायदा बिल आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. असे बिल आणायचे असल्यास ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे, मात्र तसे झाले नाही. फक्त उद्योगपतींचा फायदा दृष्टीसमोर ठेवून वटहुकूम काढण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने धानाला २०० रुपये बोनस व प्रत्येकी दोन हेक्टरी प्रमाणे मदत दिली होती. मात्र यावर्षी आवाज बुलंद करणाऱ्या शासनाचा आवाज कुठेतरी हरपला आहे. विभागाचे खासदार बोलत नाही. एकेकाळी धानाच्या मुद्यावर रान माजविणारे खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी उचलून धरली. शासनाच्या नवीन धोरणानुसार एपीएल धारकांना धान्य मिळत नाही. रॉकेलचा कोट्यातही कपात करण्यात आली आहे. गोसेखुर्दसाठी लढणारे नेते जिल्ह्यातून गायब झाले आहेत. गोसेखुर्दच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची कामे रखडली आहेत. ऊस उत्पादकांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांची लग्नपत्रिका दाखविल्याखेरीज चुकारे मिळत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दि. ७ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री बाळाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री व अमरावती येथे जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाबाबत विजय वडेट्टीवार यांनी निषेध नोंदविला. पत्रपरिषदेचे संचालन व आभार जिया पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)