शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025: घासून नाही ठासून जिंकली मॅच! राजस्थान रॉयल्सला 'आउट' करत मुंबई इंडियन्स टॉपला
2
मतदार याद्यांमधील घोळ कमी होणार! निवडणूक आयोग करणार हे महत्त्वाचे बदल, जाणून घ्या सविस्तर
3
IPL 2025 : रोहित शर्माचा बॉल बॉयसोबतचा व्हिडिओ होतोय व्हायरल; नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
"दहशतवाद्यांनाही त्यांच्या कुटुंबीयांसमोर गोळ्या घालाव्यात’’, पहलगाममध्ये मृत्युमुखी पडलेल्या शुभम यांच्या पत्नीची मागणी 
5
...अन् हिटमॅन रोहितनं युवा बॅटर वैभवला पुन्हा हिमतीनं मैदानात उतरण्यासाठी दिलं बळ
6
काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या गिरिजा व्यास यांचं निधन, पूजा करताना साडीला आग लागून झाल्या होत्या गंभीर जखमी
7
जे रोहित-विराटलाही नाही जमलं ते सूर्या भाऊनं करून दाखवलं; मोडला ११ वर्षांपूर्वीचा विक्रम
8
बुलढाण्यात जळका भडंग नजिक एसटी बस उलटली; दिवसभरात किरकोळ अपघातांची मालिका सुरूच
9
जातनिहाय जनगणनेनंतर आता काँग्रेसचा आणखी मोठा डाव, मल्लिकार्जुन खर्गेंनी केली अशी मागणी
10
केवळ युद्धाच्या नावानेच पाकिस्तानला भरलीय धडकी, बंद केले पीओकेतील 1000 हून अधिक मदरसे!
11
IPL 2025 : विक्रमी शतकवीर वैभवच्या पदरी भोपळा! विकेट गमावल्यावर १४ वर्षांच्या पोरानं डोळे मिटले अन्...
12
भारतासाठी गुड न्यूज...! सीमेवर तणावाची स्थिती असतानाच मोठी मदत करणार अमेरिका; पाकिस्तानचं टेन्शन वाढणार!
13
"मुस्लिम आणि काश्मिरींविरोधात द्वेष पसरवू नका’’, पहलगाममध्ये हत्या झालेल्या विनय नरवाल यांच्या पत्नीचं आवाहन
14
"जातीनिहाय जनगणनेसाठी गळा काढणारे शरद पवार, उद्धव ठाकरे आता गप्प का?"; भाजपाचा सवाल
15
भारतासोबतचा तणाव कमी करण्यासाठी पाकिस्तानची ट्रम्प यांच्याकडे धाव, म्हणाला मोठ्या...
16
सरकार जात विचारणार, पण एखाद्याने जात सांगितली नाही तर? याबाबत कायदा काय सांगतो  
17
RR vs MI : एक सेकंद बाकी असताना DRS घेतल्यामुळे वाचला; मग रोहितनं फिफ्टीसह नवा इतिहास रचला
18
"घर में घुसकर मारेंगे नहीं, अब घर में घुस के...!"; पाकिस्तान विरुद्ध निर्णायक युद्ध करण्याची ओवेसी यांची मागणी, बघा VIDEO
19
IPL 2025: राजस्थान रॉयल्सला मोठा धक्का! स्टार गोलंदाज दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर
20
Mumbai RTO: महिलेकडून आरटीओ कर्मचाऱ्याला मारहाण, कार्यालयातही तोडफोड; मुंबईतील घटना

भूमी अधिग्रहण बिल शेतकऱ्यांना उध्वस्त करणारे

By admin | Updated: April 23, 2015 00:17 IST

केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे.

पत्रपरिषद : विजय वडेट्टीवार यांचा आरोप, मोर्चा काढणारभंडारा : केंद्राच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य सरकारने भूमी अधिग्रहण नामक वटहुकूम काढला आहे. यात औद्योगिक कॉरीडोअरच्या नावाखाली उद्योगपतींना भरभराटीचे दिवस तर शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा घाट घातला आहे. भूमी अधिग्रहण बिल, एपीएल धारकांना धान्य, धानाला भाव, ऊसाचे चुकारे यासह अन्य ज्वलंत प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने दि. ७ मे रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात येत असल्याची माहिती काँग्रेसचे आमदार तथा भंडारा जिल्हा प्रभारी विजय वडेट्टीवार यांनी दिली. आज सकाळी ११.३० वाजता येथील विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत वडेट्टीवार बोलत होते. यावेळी माजी आमदार बंडूभाऊ सावरबांधे, आनंदराव वंजारी, माजी जिल्हाध्यक्ष मधुकर लिचडे,काँग्रेसचे प्रभारी जिल्हाध्यक्ष जिया पटेल, माजी नगराध्यक्ष बशीर पटेल, सीमा भुरे, प्रमिला कुटे यासह अन्य उपस्थित होते. विजय वडेट्टीवार म्हणाले, राज्य शासनाने भूमी अधिग्रहण कायदा बिल आणून शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळले आहे. असे बिल आणायचे असल्यास ८० टक्के शेतकऱ्यांची सहमती असणे आवश्यक आहे, मात्र तसे झाले नाही. फक्त उद्योगपतींचा फायदा दृष्टीसमोर ठेवून वटहुकूम काढण्यात आला आहे. मागील वर्षी शासनाने धानाला २०० रुपये बोनस व प्रत्येकी दोन हेक्टरी प्रमाणे मदत दिली होती. मात्र यावर्षी आवाज बुलंद करणाऱ्या शासनाचा आवाज कुठेतरी हरपला आहे. विभागाचे खासदार बोलत नाही. एकेकाळी धानाच्या मुद्यावर रान माजविणारे खासदारांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला पाहिजे, अशी मागणीही वडेट्टीवार यांनी उचलून धरली. शासनाच्या नवीन धोरणानुसार एपीएल धारकांना धान्य मिळत नाही. रॉकेलचा कोट्यातही कपात करण्यात आली आहे. गोसेखुर्दसाठी लढणारे नेते जिल्ह्यातून गायब झाले आहेत. गोसेखुर्दच्या सुधारित प्रशासकीय मान्यतेची कामे रखडली आहेत. ऊस उत्पादकांना अजूनही चुकारे मिळाले नाहीत. शेतकऱ्यांना त्यांच्या पाल्यांची लग्नपत्रिका दाखविल्याखेरीज चुकारे मिळत नसल्याचा आरोपही वडेट्टीवार यांनी केला. या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी दि. ७ मे रोजी जिल्हा काँग्रेस कमेटीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी, शेतमजूर, अल्पभूधारकांचा मोर्चा काढण्यात येणार आहे. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री बाळाकृष्ण विखे पाटील, प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, माजी प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे करणार आहेत. केंद्रीय कृषीमंत्री व अमरावती येथे जाहीर सभेत नितीन गडकरी यांनी शेतकऱ्यांवर केलेल्या विधानाबाबत विजय वडेट्टीवार यांनी निषेध नोंदविला. पत्रपरिषदेचे संचालन व आभार जिया पटेल यांनी केले. (प्रतिनिधी)