शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशमध्ये हिंदूंवर होत असलेल्या अत्याचारावरून मुंबईपासून दिल्लीपर्यंत संताप, तीव्र आंदोलने
2
कणकवलीचे नगराध्यक्ष संदेश पारकर यांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट, शिंदेसेनेत प्रवेश करणार? चर्चांना उधाण
3
अवजड ट्रक नियंत्रण सुटून कारवर उलटला, भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू 
4
पाकिस्तानला 'लॉटरी' लागली... १,३५,००,००,००,०००च्या बोलीवर PIA एअरलाईन्सचा सौदा पक्का !
5
IND W vs SL W : गोलंदाजीत शर्मा; फलंदाजीत वर्मा! दुसऱ्या टी-२० सामन्यातही लंकेसमोर टीम इंडियाचा डंका!
6
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
7
खरंच दारूच्या नशेत बेधुंद होते इंग्लंड क्रिकेटपटू? ECB नं चौकशीची तयारी दाखवली, पण...
8
ठाकरे बंधूंच्या युतीचा मुहुर्त ठरला, बुधवारी होणार घोषणा, अधिकृत कार्यक्रम पत्रिका समोर
9
उल्हासनगर: शिंदेसेनेत 'जुने विरुद्ध नवे' संघर्ष; तरुणांना संधी देण्याची युवासेनेची मागणी
10
IND W vs SL W : 'शर्माजी की बेटी' वैष्णवीसह श्री चरणीनं घेतली श्रीलंकेच्या बॅटर्सची फिरकी!
11
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
12
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
13
"नरेंद्र मोदींपेक्षा देवेंद्र फडणवीस जास्त फेकाफेकी करतात’’, हर्षवर्धन सपकाळ यांची बोचरी टीका
14
Jemimah Rodrigues: मुंबईकर जेमीला DC कडून मोठं सरप्राइज! फोटोशूटला गेली आणि दिल्लीची कॅप्टन झाली!
15
ज्ञानपीठ पुरस्काराने सन्मानित साहित्यिक विनोद कुमार शुक्ल यांचे निधन, पीएम मोदींनी वाहिली श्रद्धांजली
16
लेकीला शाळेत सोडण्यासाठी आलेल्या वडिलांचा गेटवर अचानक मृत्यू; Video पाहून पाणावतील डोळे
17
गोल्डन बॉय नीरज चोप्राने सपत्निक घेतली पंतप्रधान मोदींची भेट, खास फोटो सोशल मीडियावर पोस्ट
18
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
19
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
20
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

जलसंपदा विभागाअंतर्गत लाखोंचे हवामान यंत्र भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

मोहन भोयर तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. ...

मोहन भोयर

तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ हवामान यंत्र व सदनिकांची दुरवस्था झाली आहे. हवामान बदल व हवामानाची माहिती देण्याकरिता येथे लाखोंचा निधी खर्च करून हवामान यंत्र लावण्यात आले होते. नियोजनाच्या अभावामुळे सदर यंत्र सध्या धूळखात पडून आहे. शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग जलसंपत्ती विभाग अंतर्गत जलसंपदा विभाग क्रमांक चार नागपूरअंतर्गत आलेसूर गावाजवळ सितेकसा हवामान केंद्र आहे. या हवामान केंद्र ची दुरवस्था झाले असून, संपूर्ण हवामान केंद्र हे भंगार झाले आहे. येथे सदनिकांची दुरवस्था झाली आहे.

हवामान केंद्र व सदनिका येथे वाऱ्यावर सोडणे झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून सदर हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांकरिता वसाहती बनविल्या होत्या; परंतु त्यांच्या येथे उपयोग होताना दिसत नाही.

सितेकसा येथे बावनथडी प्रकल्प असून जंगल व्याप्त परिसरात आलेसूर येथे गावाशेजारी हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांच्या वसाहती बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीला हवामान केंद्र सुरळीत सुरू होते; परंतु त्यानंतर हे हवामान केंद्र बंद करण्यात आले. हवामान बदलाची अचूक माहिती देण्याकरिता राज्य शासनाने येथे हवामान केंद्र तयार केले होते. परंतु त्यानंतर सदर हवामान केंद्र का बंद करण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

सदर हवामान केंद्र उभारण्याकरिता शासनाच्या नियमानुसार संबंधित विभागाने प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर राज्य शासनाने लाखोंचा निधी येथे मंजूर केला. हवामानाची अचूक माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश होता.

हवामान केंद्र व वसाहती स्थापन केल्यानंतर येथील हवामान केंद्र का बंद करण्यात आले हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या निधीच्या येथे अपव्यय करण्यात आलेले दिसून येते शासन व प्रशासनाचे नियोजनाअभावी लाखोंचा निधी येथे पाण्यात गेला आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.

हवामान केंद्राची उपयोगीता असल्यामुळेच येथे हवामान केंद्र तयार करण्यात आले होते. सध्या हवामान केंद्राची उपयोगीता नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हवामान केंद्राची उपयोगिता नव्हती तर ते कां तयार करण्यात आले. असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधून संबंधित विभागाला विभागाला जाब विचारण्याची गरज आहे.