शहरं
Join us  
Trending Stories
1
पालघर: मासेमारी करताना चुकून पाकिस्तानी हद्दीत प्रवेश केलेले नामदेव मेहेर पाकच्या ताब्यात!
2
आजचे राशीभविष्य, ०८ नोव्हेंबर २०२५: काळजी मिटेल, आनंदाची बातमी मिळेल, धनलाभ शक्य
3
नवी मुंबईत मनसेने भरवले मतदार यादीतील बाेगस नावांचे प्रदर्शन; अमित ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
4
पार्थ पवारांच्या कंपनीचा आणखी एक गैरव्यवहार; आधी जमीन घाेटाळा, मग व्यवहार रद्द
5
माझे नाव दोन मतदार याद्यांत असणे ही निवडणूक आयोगाची चूक- आमदार अस्लम शेख
6
धनंजय मुंडेंनी दिली मारण्याची सुपारी; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप; पोलिसांकडे तक्रार
7
वर्ल्ड चॅम्पियन्सचा गौरव! स्मृती, जेमिमा, राधा यादव यांना प्रत्येकी सव्वादोन कोटींचे बक्षीस
8
जिल्हा परिषद निवडणुकांची दोन आठवड्यांत घोषणा; ३० दिवसांच्या कालावधीतच पार पाडणार निवडणुका
9
नरेंद्र माेदी माझे मित्र आहेत; पुढील वर्षी मी नक्की भारतात येईन: डोनाल्ड ट्रम्प
10
मनोज जरांगे यांच्या आरोपांची सीबीआय चौकशी व्हायलाच हवी; धनंजय मुंडेंचे आरोपांना प्रत्युत्तर
11
प्रभागरचना, आरक्षणावरील निकालांच्या अधीन असेल स्थानिक संस्था निवडणूक- उच्च न्यायालय
12
धक्कादायक! ऑनलाइन क्रीम खरेदी केली, महिलेच्या शरीरावर सापासारखे व्रण; १० वर्षांत १२ लाख रुपये खर्च
13
अधिकाऱ्यांना वाचवण्याच्या नादात दोघांचा मृत्यू; सॅण्डहर्स्ट रेल्वे अपघातामध्ये मुलीचा मृत्यू; आई जखमी
14
पार्थ पवार भूखंड प्रकरणाचा व्यवहार रद्द; अजित पवार म्हणाले, "मी मुख्यमंत्री फडणवीसांना कॉल केला आणि..."
15
देशातील सर्वात मोठ्या विमानतळावर विमानांच्या उड्डाणाला ब्रेक! ATC मध्ये झाला तांत्रिक बिघाड, १००० विमानांना फटका
16
60 टक्क्यांहून अधिक मतदान म्हणजे NDA ची सत्ता परतणार; बिहारबाबत अमित शाहांचा दावा
17
"त्या एक टक्केवाल्या पाटलाला पार्थ पवारने जमीन दिली असती का?"; अजित पवारांचा उल्लेख, दानवेंची मोठी मागणी
18
धोत्रे हत्या प्रकरण: अत्यंविधीला आला आणि पोलिसांनी पकडला, स्मशानभूमीत लावला होता सापळा
19
चार नाही, दहा लाख महिना पोटगी, मोहम्मद शमीच्या पत्नीच्या मागणीवर सर्वोच्च न्यायालयाने नोटीस बजावली
20
महाराष्ट्राचा अभिमान! स्मृती, जेमिमा अन् राधाचा मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते कोट्यवधींच्या बक्षीसासह सन्मान

जलसंपदा विभागाअंतर्गत लाखोंचे हवामान यंत्र भंगारात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:32 IST

मोहन भोयर तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. ...

मोहन भोयर

तुमसर : हवामान बदलाचे अचूक माहिती देणारे पाटबंधारे विभागांतर्गत जलसंपत्ती विभागाचे लाखोंचे हवामान यंत्र भंगार झाले आहे. तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ हवामान यंत्र व सदनिकांची दुरवस्था झाली आहे. हवामान बदल व हवामानाची माहिती देण्याकरिता येथे लाखोंचा निधी खर्च करून हवामान यंत्र लावण्यात आले होते. नियोजनाच्या अभावामुळे सदर यंत्र सध्या धूळखात पडून आहे. शासन व प्रशासनाचे याकडे दुर्लक्ष दिसत आहे.

राज्याच्या शेवटच्या टोकावर तुमसर तालुक्यातील आलेसूर गावाजवळ महाराष्ट्र शासनाच्या पाटबंधारे विभाग जलसंपत्ती विभाग अंतर्गत जलसंपदा विभाग क्रमांक चार नागपूरअंतर्गत आलेसूर गावाजवळ सितेकसा हवामान केंद्र आहे. या हवामान केंद्र ची दुरवस्था झाले असून, संपूर्ण हवामान केंद्र हे भंगार झाले आहे. येथे सदनिकांची दुरवस्था झाली आहे.

हवामान केंद्र व सदनिका येथे वाऱ्यावर सोडणे झाल्याचे दिसून येते. राज्य शासनाने लाखो रुपये खर्च करून सदर हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांकरिता वसाहती बनविल्या होत्या; परंतु त्यांच्या येथे उपयोग होताना दिसत नाही.

सितेकसा येथे बावनथडी प्रकल्प असून जंगल व्याप्त परिसरात आलेसूर येथे गावाशेजारी हवामान केंद्र व कर्मचाऱ्यांच्या वसाहती बांधकाम करण्यात आले आहे. सुरुवातीला हवामान केंद्र सुरळीत सुरू होते; परंतु त्यानंतर हे हवामान केंद्र बंद करण्यात आले. हवामान बदलाची अचूक माहिती देण्याकरिता राज्य शासनाने येथे हवामान केंद्र तयार केले होते. परंतु त्यानंतर सदर हवामान केंद्र का बंद करण्यात आले हा संशोधनाचा विषय आहे.

सदर हवामान केंद्र उभारण्याकरिता शासनाच्या नियमानुसार संबंधित विभागाने प्रस्ताव सादर केला होता त्यानंतर राज्य शासनाने लाखोंचा निधी येथे मंजूर केला. हवामानाची अचूक माहिती मिळावी हा त्यामागील उद्देश होता.

हवामान केंद्र व वसाहती स्थापन केल्यानंतर येथील हवामान केंद्र का बंद करण्यात आले हे न उलगडणारे कोडे आहे. शासनाच्या निधीच्या येथे अपव्यय करण्यात आलेले दिसून येते शासन व प्रशासनाचे नियोजनाअभावी लाखोंचा निधी येथे पाण्यात गेला आहे. शासनाने संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारून या प्रकरणाची चौकशी करण्याची गरज आहे.

हवामान केंद्राची उपयोगीता असल्यामुळेच येथे हवामान केंद्र तयार करण्यात आले होते. सध्या हवामान केंद्राची उपयोगीता नाही काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. हवामान केंद्राची उपयोगिता नव्हती तर ते कां तयार करण्यात आले. असा प्रश्न उपस्थित होत आहे. लोकप्रतिनिधींनी लक्ष वेधून संबंधित विभागाला विभागाला जाब विचारण्याची गरज आहे.