शहरं
Join us  
Trending Stories
1
Coronavirus: देशातील अनेक राज्यात कोरोना रुग्णसंख्येत वाढ; महाराष्ट्रात ८६ नवीन रुग्ण आढळले
2
राजासोबत 'ते' तिघे कोण होते, ज्यांच्या मागून सोनम चालत होती; स्थानिक गाईडचा खुलासा
3
तेलंगणा सीमेवरील गोदापात्रात सहा मुले बुडाली; नदीकाठी काळीज पिळवटणाारा आक्रोश
4
भारत-पाकिस्ताननंतर आशियातील आणखी २ देशात युद्धजन्य स्थिती; सीमेवर वाढवले सशस्त्र सैन्य
5
"उद्धव-राज एकत्र येऊ शकतात, उद्धवजींनी त्या लोकांपासून सावध राहावं", गजानन कीर्तिकरांचा ठाकरेंना महत्त्वाचा सल्ला
6
बिहार विधानसभा निवडणूक 2025 : NDA चा फॉर्म्युला ठरला! जाणून घ्या, कुणाच्या वाट्याला किती जागा येणार?
7
पोलीस नोकरी सोडली अन् बनला Youtuber; भारतीय क्रिएटर्सला अडकवलं, हेरगिरीसाठी पाकचा नवा डाव
8
सोनिया गांधी रूटीन चेकअपसाठी शिमला येथील IGMC हॉस्पिटलला दाखल; उपचारानंतर घरी सोडले
9
राज ठाकरेंसोबतच्या संबंधावर सोनाली बेंद्रेने मौन सोडलं; पहिल्यांदाच उघडपणे केला खुलासा
10
'या' कंपनीला रिलायन्सकडून मिळाली 700 कोटींची ऑर्डर; आता सोमवारी फोकसमध्ये राहणार शेअर?
11
स्वत:चं नग्न छायाचित्र दाखवलं संसदेत, खासदार लॉरा मॅकक्लूर यांनी सगळ्यांना दिला धोक्याचा इशारा
12
राहुल गांधींच्या 'महाराष्ट्र निवडणूक फिक्सिंग' लेखावरून राजकारण तापलं, काँग्रेस का हारते? जेपी नड्डा यांनी स्पष्टच सांगितलं!
13
"बापरे..., आम्ही एवढं घाबरलोय की...!"; राज-उद्धव युतीच्या चर्चेवर नितेश राणेंनी उडवली खिल्ली
14
IPL २०२६ मध्ये यंदाच्या विजेत्या RCB टीमवर बंदी आणणार?; बीसीसीआय का घेऊ शकतं मोठा निर्णय?
15
पोलिसांनी घेरताच आरोपी शूटर AK47 ने दिली इमारतीवरून उडी मारण्याची धमकी, नंतर...
16
नको त्या अवस्थेत दुसऱ्यासोबत पाहिले; संतापलेल्या पतीने बायकोचे मुंडके उडविले अन् थेट...
17
Viral Video: लग्नात नवरदेवाच्या मित्रांनी दिलं 'असं' गिफ्ट; पाहून वधूही लाजली, व्हिडीओ व्हायरल!
18
'टीव्ही बंद करून अभ्यास करायला बस' आईचं बोलणं जिव्हारी, दहावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या!
19
अरेरे! ६ महिन्यांपूर्वीच लग्न करुन घरी आणली पण 'ती' दिरासोबत पळाली, गावात असं काय घडलं?
20
Diabetes Sign: डायबिटीस होण्याआधी शरीरात दिसू लागतात 'हे' पाच बदल; वेळीच सावध व्हा!

अड्याळ येथे पार्किंगचा अभाव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 08:42 IST

गावात दर दिवसाला दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत गुजरी भरत असल्याने गावातील व परगावातील ग्रामस्थांना यामुळे कसाबसा रोजगार ...

गावात दर दिवसाला दुपारी दोन ते रात्री आठपर्यंत गुजरी भरत असल्याने गावातील व परगावातील ग्रामस्थांना यामुळे कसाबसा रोजगार मिळेल त्या ठिकाणी दुकाने थाटून बसतात. हे सत्य असले तरी त्या प्रत्येकाने कुठे आणि कशा प्रकारे दुकाने थाटायची वा थाटू नये, यासाठी कधीच प्रयत्न केला गेला नाही, हेही तितकेच महत्त्वाचे आहे. एकीकडे गावातील व्यवसाय, बाजार हा आता आधीसारखा राहिला नसल्याने प्रत्येक व्यावसायिक ओरडतो, तर दुसरीकडे आलेल्या ग्राहकांना आपली वाहने उभी करायलासुध्दा जागा उपलब्ध होत नाही. यात दोष द्यायचा तरी कुणाला?

गावातील मुख्य चौकात बँक एटीएम, पोस्ट ऑफिस असल्याने रोज हजारो ग्रामस्थ बाहेरगावाहून कामानिमित्त याठिकाणी येत असतात. पण त्याच ठिकाणी पार्किंगची सोय नाही तर मग येणाऱ्या प्रत्येकाने वाहन घरीच ठेवून यायचे का. हीच परिस्थिती येथे सर्वांना भेडसावत असते. पण, त्यावर उपाय आजपर्यंत ना ग्रामपंचायत प्रशासनाने काढला, ना संबंधितांनी. मग यात कधी कधी रस्ता जाम होऊन अनेकदा मारपीट, शिविगाळ होऊन नाहक त्रास सर्वांना सहन करावा लागतो. या रस्त्यावरून एखाद्याला रुग्णालयात अर्जंट जायचे झालेच तर ते शक्य नाही. त्यात पुन्हा भर पडते ती मोठमोठ्या जड वाहनांची. गावातील मुख्य गल्लीतील हा प्रकार आजचा नसून, अनेक वर्षांपासून वाढत चालला आहे. तो बसस्थानक परिसरातील का असेना. पण, जेव्हा हा प्रकार वाढत राहतो. विभाग प्रशासन बघ्याची भूमिका घेते आणि नाहक त्रास सर्वांनाच सहन करावा लागतो, तेव्हा यावर तत्काळ उपाययोजना आखणे गरजेचे झाले आहे.

गुजरी चौकात बँक, एटीएम आणि पोस्ट कार्यालय असून, पार्किंगसाठी जागा नसल्याने बऱ्याचदा या ठिकाणी दुचाकी वाहनांची तोबा गर्दी होते. त्यामुळे अनेकवेळा तंटे होतात. हे कधी बंद होणार, याकडेही कुणाचेच लक्ष नसल्याने ग्रामस्थांमध्ये असंतोष पाहायला मिळतो आहे.