शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईत 'रेड अलर्ट', घराबाहेर पडू नका; रस्ते, रेल्वे रुळांवरील पाण्यामुळे जनजीवन विस्कळीत
2
मुंबईत रात्रभर मुसळधार पाऊस, विक्रोळीत दरड कोसळली; दोघांचा मृत्यू, अनेक जण जखमी
3
चैनीच्या वस्तू महागणार? जीएसटी कररचनेत मोठे बदल, काही वस्तूंवरील कर वाढणार
4
आजचे राशीभविष्य : शनिवार १६ ऑगस्ट २०२५; आज ज्या-ज्या क्षेत्रात वावराल त्या-त्या क्षेत्रात आपली प्रशंसा होईल, प्रिय व्यक्तीच्या सहवासाने आनंदित व्हाल
5
किश्तवाड ढगफुटीत ६५ जणांचा गेला जीव, ३८ जणांची प्रकृती गंभीर; १०० अजूनही बेपत्ता
6
मालाडमध्ये इतके लोक राहतात? ट्रॅफिकला कंटाळून कश्मीरा शाहने शेअर केला मजेशीर व्हिडीओ
7
ठाकरे बंधू महापालिका निवडणुका एकत्र लढणार, मुंबई, ठाण्यात सत्ता; संजय राऊत यांचा दावा
8
पूर्णा नदीत आंदोलनकर्ता गेला वाहून, अद्याप शोध लागलेला नाही; स्वातंत्र्यदिनी आंदोलनाला लागले गालबोट
9
गणेशोत्सवात मराठी गाणी वाजवा; सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समितीची आग्रही भूमिका
10
'पती-पत्नी संकल्पना' व्याख्येत समलैंगिकांचाही समावेश व्हावा; हायकोर्टात गिफ्ट टॅक्स नियमाविरुद्ध याचिका
11
मध्य रेल्वेवर आज रात्री, तर 'परे'वर उद्या ब्लॉक; २१ मेल-एक्स्प्रेस फेऱ्यांना फटका, काही लोकल रद्द
12
स्वतःहून घराबाहेर पडलेला पती 'ती' मागणी करू शकत नाही : कोर्ट
13
आता वेटिंगची चिंता नको; 'वंदे भारत'ला जोडणार चार डबे! ३१२ अतिरिक्त प्रवासी प्रवास करणार
14
लाल किल्ल्यावर स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याला राहुल गांधी आणि मल्लिकार्जुन खरगे का उपस्थित राहिले नाहीत? काँग्रेसने कारण दिले
15
एमबीबीएसच्या कट ऑफमध्ये घट; खुल्या प्रवर्गाची गुणवत्ता यादी ५०९ पर्यंत घसरली
16
जालना: न्यायासाठी मंत्र्याचा ताफा अडवला, मस्तवाल पोलीस अधिकाऱ्याने उडी मारून घातली लाथ; व्हिडीओ बघून येईल संताप
17
नागालँडचे राज्यपाल एल गणेशन यांचे निधन, डोक्याला दुखापत झाल्याने चेन्नईच्या रुग्णालयात झाले होते दाखल
18
धक्कादायक! आईशी प्रेमसंबंध असल्याचा संशय, मुलानं कोयत्यानं वार करत एकाला संपवले केले; दौंडमधील घटना
19
भारताची 'वंडर वुमन', ज्यांनी सैन्यातील पुरुषांना दिले प्रशिक्षण; 'मल्हार'च्या मंचावर डॉ. सीमा राव यांनी उलगडला प्रवास!
20
'स्कॅम १९९२'च्या 'हर्षद मेहता'ने अनेकदा पचवला नकार! प्रतीक गांधीने सांगितलं प्रोजेक्टमधून रिजेक्ट होण्याचं कारण, म्हणाला... 

मॅन्युअल टायपिंगची पूर्वअट शिथिल

By admin | Updated: March 20, 2017 00:22 IST

गेल्या ५ डिसेंबर २०१६ रोजी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्वअटीचे शासननिर्णय निर्गमीत केले.

संस्थाचालकांचे प्रयत्न : शिक्षणमंत्र्यांना दिले होते मागण्यांचे निवेदन अर्जुनी-मोरगाव : गेल्या ५ डिसेंबर २०१६ रोजी शासनाच्या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने पूर्वअटीचे शासननिर्णय निर्गमीत केले. त्यात ३० श.प्र.मि. विषयाला प्रविष्ट होण्यासाठी ४० श.प्र.मि.ची अट घालून दिलेली होती. सोबतच तळटिपेमध्ये विद्यार्थी एकाच वेळेस ३० व ४० विषयांस बसू शकेल असे सुध्दा लिहण्यात आले होते. लिहलेल्या तळटीपेप्रमाणे राज्यातील सर्व संस्थामध्ये नविन शैक्षणिक सत्र माहे जानेवारी २०१७ ते जुलै २०१७ साठी प्रवेश देण्यात आले. मात्र महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेने १७ फेब्रुवारी २०१७ रोजी शासनाकडे शुध्दीपत्रक सादर करून त्यात ३० विषय उत्तीर्ण झाल्याशिवाय ४० चा निकाल देण्यात येणार नाही. याऐवजी ३० विषयास उत्तीर्ण झाल्याशिवाय ४० ला बसता येणार नाही असे नमूद केल्याने राज्यातील सर्व संस्थाचालकावर संकट कोसळले होते. आयुक्तांना याबाबत विचारपूस करून निर्णय मागे घेण्याबाबत विनंती केली. मात्र आयुक्त परीक्षा परिषद यांच्याकडून समाधान न झाल्याने संघटनेच्या पदाधिकारी आणि संस्थाचालकांनी १० मार्च रोजी आमदार तानाजी मुटकुळे, सतीश चव्हाण, अध्यक्ष प्रकार कराळे, नगरसेवक आणि संस्था चालक महेश माळवतर, संजय नाईक, सुभाष बागड, गिरीष टिभे, दिलीप कुलकर्णी, किशोर पाटील, हेमंत ढमढेरे, संजय भदे यांनी मंत्रालयात शिक्षण मंत्री विनोद तावडे यांना भेटून ३० व ४० मॅन्युअल टायपिंग अभ्यासक्रमात एकत्रीत बसण्याचा प्रश्न मार्गी लावला. तसेच शार्टहॅन्ड ८० साठी ६० विषयाची अटक वगळण्यास अनुकूलता दाखविली. दिनांक २१ ते २५ मार्च दरम्यान जानेवारी/फेब्रुवारी २०१७ चे निकाल जाहीर केले जाईल व नव्याने विद्यार्थ्यांच्या आवेदनपत्र भरण्यासाठी लिंक उपलब्ध परिषदेकडून दिली जाईल असे संघटनेचे अध्यक्ष तथा परीक्षा परिषदेचे अशासकीय सदस्य प्रकाश कराडे यांनी सांगितले. महाराष्ट्र शासनाने राज्यातील शासनमान्य संस्थामध्ये संगणक टायपिंग अभ्यासक्रम चालू करण्यासंबधाने मान्यता आणि संचालन नियमावली १९९१ सुधारीत नियमावली २०१४ निर्गमीत केली. मात्र परिक्षा परिषदेच्या शिफारशीवरून ५ डिसेंबर २०१६ रोजी सुधारीत नियमावली २०१६ मध्ये १४.२ बहिस्थ विद्यार्थी हा खाजगी अनाधिकृत संस्थाना बळ देणारा व सुमारे ५० वर्षापासून सेवा करणाऱ्या संस्थाचालकांवर अन्याय करणारा नियम काढण्यात आला. नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात राज्यातील सर्व संस्थाचालक प्रकाश कराडे यांच्या नेतृत्वाखाली एकत्र येवून धरणे आंदोलन केले होते. (तालुका प्रतिनिधी)