शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
3
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
4
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
5
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
6
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
7
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
8
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
9
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
10
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
11
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
12
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
13
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
14
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
15
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
16
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
17
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
18
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
19
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
20
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
Daily Top 2Weekly Top 5

जीर्ण इमारतीत विद्यार्थी करताहेत ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:44 IST

कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.

ठळक मुद्देवाघबोडीच्या जि.प. शाळेतील प्रकार : पावसामुळे हनुमान मंदिर, वऱ्हांड्यात भरते शाळा, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.'लोकमत'ने भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले जाते. येथे दोन शिक्षक असल्याचे दिसून आले. येथे वर्गखोल्यादेखील दोन आहेत. शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुक्त मनाने जात असतात. परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र वाघबोडी येथील शाळेत पहावयाला मिळत आहे.शाळेचे स्लॅब खचलेले असून इमारतीतून तुकडे पडलेले आहेत. शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून दोनही वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. वाघमोडी येथे चार वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात ज्ञानार्जन दिले जात आहे. तिथे दोन वर्ग बसण्याची सोय केली आहे.स्वयंपाकाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर शाळेच्या वºहांड्यात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली जाते. सुविधाअभावी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक दडपणाखाली आहे.विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होवून विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहते काय, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शाळेची दुरूस्ती करण्याची, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर बडोले, उपाध्यक्ष विश्वनाथ वालदे, जाकीर शेख, गौतम तिरपुडे, अनिल शेख, जयेंद्र मरस्कोल्हे, राकेश कायते, विक्रम अंबादे, सारीका बडोले, प्रतिक्षा खोब्रागडे, आशिष बडोले आदींनी केली आहे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मात्र वाघबोडी येथील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्यासाठी अशोभनीय असून विद्यार्थ्यांना धोका झाल्यास याला जबाबदार कोण राहील, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.-मंगेश हुमणे, उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस भंडारा.राज्यशासन व केंद्र सरकार शिक्षणावर कोट्यवधी रूपये खर्च करीत असल्याचे छातीछोकपणे सांगत असले तरी वाघबोडीतील ही परिस्थिती सरकारचे दावे फोल ठरणारे आहे. वाघबोडी येथे दोन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अन्यथा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.-जनार्दन निंबार्ते, सामाजिक कार्यकर्ता, धारगाव.