शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
2
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
3
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
4
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
5
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
6
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
7
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
8
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
9
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
10
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा
11
जळगावात मालवाहू वाहनाची दुचाकीला धडक; बाप-लेक जागीच ठार; माय- लेक गंभीर जखमी!
12
घटस्फोटानंतर पुन्हा प्रेम? 'या' क्रिकेटपटूंच्या अफेरच्या सर्वत्र चर्चा!
13
शूर मराठा सरदार रघुजी भोसले यांची तलवार मिळवण्यात महाराष्ट्र सरकार यशस्वी; जिंकला लिलाव
14
जिद्दीला सलाम! आई नोट्स बनवून वाचून दाखवायची; अंध मुलाने क्रॅक केली UPSC...
15
650 KM रेंज, 15 मिनिटात चार्ज अन्...BYD ने लॉन्च केली नवीन सील Seal EV
16
Cricket VIDEO: 'शायनिंग' नडली..!! हेल्मेट न घालता खेळायला गेला, तोंडावर चेंडू आदळला अन्...
17
ही पाच ठिकाणं आहेत पाकिस्तानी सैन्याचे पंचप्राण, भारताने इथे हल्ला केल्यास पाकिस्तान गुडघे टेकून पत्करेल शरणागती
18
आता ते दया-माया दाखवणार नाहीत! शास्त्रींनी युवा शतकवीर वैभव सूर्यंवशीला केलं सावध
19
टी२० मुंबई लीगसाठी आयकॉन खेळाडूंची घोषणा; यादीत सूर्यकुमार, श्रेयससह ८ भारतीय खेळाडू
20
अक्षय कुमार-ऋषी कपूर यांच्यासोबत केलं काम, पण आता उदरनिर्वाहासाठी अभिनेता करतोय वॉचमेनची नोकरी

जीर्ण इमारतीत विद्यार्थी करताहेत ज्ञानार्जन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 5, 2018 22:44 IST

कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.

ठळक मुद्देवाघबोडीच्या जि.प. शाळेतील प्रकार : पावसामुळे हनुमान मंदिर, वऱ्हांड्यात भरते शाळा, अधिकारी, लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

देवानंद नंदेश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कुणीही बालक शिक्षणापासून वंचित राहू नये म्हणून सक्तीच्या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत शासनांमार्फत कोट्यवधी रूपयांचा खर्च केला जात आहे. परंतु शासनाच्या उदासीन धोरणामुळे शिक्षणाचा खेळखंडोबा होत असल्याचा प्रकार भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील तडे गेलेल्या वर्गखोलीत बसून विद्यार्थी शिक्षण घेत असलेल्या परिस्थितीतून दिसून येते.'लोकमत'ने भंडारा तालुक्यातील वाघबोडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला भेट दिली असता येथे इयत्ता १ ते ४ पर्यंत शिक्षण घेतले जाते. येथे दोन शिक्षक असल्याचे दिसून आले. येथे वर्गखोल्यादेखील दोन आहेत. शाळेत शिक्षण घेण्यासाठी विद्यार्थी मुक्त मनाने जात असतात. परंतु शाळेची शिकस्त झालेली इमारत पाहून शिक्षक, पालकांसह त्यांच्याही निरागस मनाची घालमेल होते. प्रशासनाला मात्र त्याचे सोयरसुतक नसल्याचे चित्र वाघबोडी येथील शाळेत पहावयाला मिळत आहे.शाळेचे स्लॅब खचलेले असून इमारतीतून तुकडे पडलेले आहेत. शाळेच्या इमारतीला भेगा पडल्या असून दोनही वर्गखोल्या जीर्णावस्थेत आहेत. वाघमोडी येथे चार वर्ग असले तरी विद्यार्थ्यांना बसण्याची सोय नाही. त्यामुळे येथील विद्यार्थ्यांना शाळेशेजारी असलेल्या हनुमान मंदिरात ज्ञानार्जन दिले जात आहे. तिथे दोन वर्ग बसण्याची सोय केली आहे.स्वयंपाकाच्या खोलीमध्ये विद्यार्थ्यांच्या बसण्याची सोय करण्यात आली आहे. पाऊस थांबल्यानंतर शाळेच्या वºहांड्यात विद्यार्थ्यांना बसण्याची व्यवस्था केली जाते. सुविधाअभावी विद्यार्थ्यांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. या गंभीर बाबींमुळे विद्यार्थी, शिक्षक, पालक दडपणाखाली आहे.विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात घालणारे प्रशासन मोठा अपघात होवून विद्यार्थ्यांचा बळी जाण्याची वाट पाहते काय, असा संतप्त सवाल पालकांनी केला आहे. शाळेची दुरूस्ती करण्याची, नवीन वर्गखोल्या बांधकाम करण्याची मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाधर बडोले, उपाध्यक्ष विश्वनाथ वालदे, जाकीर शेख, गौतम तिरपुडे, अनिल शेख, जयेंद्र मरस्कोल्हे, राकेश कायते, विक्रम अंबादे, सारीका बडोले, प्रतिक्षा खोब्रागडे, आशिष बडोले आदींनी केली आहे.शिक्षणाशिवाय तरणोपाय नाही. मात्र वाघबोडी येथील जिल्हा परिषदच्या विद्यार्थ्यांना जीव धोक्यात घालून ज्ञानार्जन करावे लागत आहे. हा प्रकार जिल्ह्यासाठी अशोभनीय असून विद्यार्थ्यांना धोका झाल्यास याला जबाबदार कोण राहील, याकडे जिल्हा प्रशासनाने लक्ष द्यावे, अन्यथा काँग्रेसतर्फे तीव्र आंदोलन करण्यात येईल.-मंगेश हुमणे, उपाध्यक्ष, तालुका काँग्रेस भंडारा.राज्यशासन व केंद्र सरकार शिक्षणावर कोट्यवधी रूपये खर्च करीत असल्याचे छातीछोकपणे सांगत असले तरी वाघबोडीतील ही परिस्थिती सरकारचे दावे फोल ठरणारे आहे. वाघबोडी येथे दोन वर्गखोल्यांचे बांधकाम तातडीने करण्यात यावे, अन्यथा शाळा व्यवस्थापन समिती व पालकांच्या सहकार्याने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषण करण्यात येईल.-जनार्दन निंबार्ते, सामाजिक कार्यकर्ता, धारगाव.