शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलंबियाची ४८ तासांत कोलांटी उडी! शशी थरूरनी शाळाच घेतली; पाकिस्तानच्या बाजुने केलेले वक्तव्य मागे घ्यायला लावले
2
मे महिना संपायला अन् खाद्य तेलाच्या किंमती कमी करायला...; केंद्राने आयात शुल्क निम्म्याने घटविले...
3
पीक नुकसानभरपाईच्या मदत रकमेत आता कपात; तीनऐवजी दोन हेक्टरपर्यंतच मिळणार मदत
4
'या' ४ ठिकाणी पत्नी मिळवून देऊ शकते जबरदस्त नफा; पाहा कोणत्या आहेत या स्कीम्स?
5
"हे असं अर्धवट..."; सुदेश म्हशिलकरांच्या लेखी तक्रारीवर प्राची पिसाटची आगपाखड, चांगलीच भडकली
6
आजचे राशीभविष्य: शनिवार 31 मे 2025; खर्चाचे प्रमाण वाढेल, एखाद्या स्त्रीमुळे त्रास होऊ शकतो
7
'केईएम'मध्ये पुन्हा पाणी साचायला नको, उपाययोजनांसह प्रतिज्ञापत्र सादर करा : हायकोर्ट
8
युद्धनौका, पाणबुड्यांची नावे, ठावठिकाणा वर्माने पाकला पुरवला; कोठडीत रवानगी
9
दुनिया हिला देंगे हम! MI नं 'बेबी ओव्हर'सह GT चा खेळ खल्लास करत मिळवलं क्वालिफायर २ चं तिकीट
10
राज्यात साडेएकवीस हजार शासकीय वाहने भंगारात; अपघातांसह प्रदूषणास बसेल आळा
11
गेट लॉस्ट, मि. मस्क! दुसऱ्याच्या पदच्युतीसाठी किमान चार वर्षे लागतील
12
गाळ टाकण्याच्या जागेतही हेराफेरी; लॉगशीटवर गुंदवली, माल उतरवला दिवे गावात!
13
विलीनीकरणाचा कोणताही प्रस्ताव आमच्याकडे नाही; राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष खा. तटकरे यांचे स्पष्टीकरण
14
तुर्की एअरलाइन्ससोबतचा करार रद्द करा, भारत सरकारने इंडिगोला निर्देश दिले
15
मामांचे पितळ उघडे पडले! शंशाक, सुशीलला दिलेल्या शस्त्र परवान्यावर सुपेकरांची सही
16
पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तान एकाकी पडला; तालिबानशी संबंध सुधारण्याची घोषणा
17
आधी कॅच घेताना गडबडला; बॅटिंग करताना Hit Wicket झाला! मग नेटकऱ्यांमध्ये रंगली मॅच 'फिक्सिंग'ची चर्चा
18
"राज्यपातळीवरुन 'गोकुळ'च्या राजकारणात हस्तक्षेप झाला नाही..."; सतेज पाटलांनी स्पष्टच सांगितलं

‘खाकी’ची राेगप्रतिकार शक्ती वाढली, दुसऱ्या लाटेत काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 04:37 IST

भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर ...

भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे. कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे. परंतु आता लसीकरण झाल्याने काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाली असली तरी त्यावर यशस्वीपणे त्यांनी मात केली आहे.

नियमित व्यायाम महत्वाचा

राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. त्यासाेबतच संतुलित आहारही महत्वाचा आहे. जिल्हा पाेलीस दलातील कर्मचारी व अधिकारी दरराेज नियमित व्यायाम करतात. यासाेबतच जिल्हा पाेलीस दलाच्यावतीने मेडिटेशन शिबिरासह याेगासनाबाबतही विविध शिबिरांचे आयाेजन केले आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पाेलिसांना काेराेनाची बाधा झाली नाही. आजही जिल्हा मुख्यालयातील पाेलीस परेड ग्राऊंडसह विविध ठाण्यात पाेलीस व्यायाम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. राेगप्रतिकारक्षमता वाढविण्यावर भर आहे. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीरात राेगप्रतिकार शक्ती वाढते. काेराेना संसर्गात कर्तव्य बजावताना अनेकांशी संपर्क येताे. मात्र लसीकरणानंतर आता मनात भीती राहिली नाही. तरीही आम्ही सर्व नियमांचे पालन करुनच आपले कर्तव्य बजावताे.

- रमाकांत दिक्षीत,

कर्तव्याच्या निमित्ताने सतत बाहेर रहावे लागते. लसीकरण झाले असले तरी काेराेना नियमांचे पालन केले जाते. ठाण्यात असाे की घरी, स्वच्छतेला महत्व दिले जाते. राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि याेग्य आहार घेताे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताे.

- बापूराव भुसावळे,

पाेलीस हवालदार कर्तव्याच्या निमित्ताने सतत बाहेर रहावे लागते. लसीकरण झाले असले तरी काेराेना नियमांचे पालन केले जाते. ठाण्यात असाे की घरी, स्वच्छतेला महत्व दिले जाते. राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि याेग्य आहार घेताे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताे.

- बापूराव भुसावळे,

पाेलीस हवालदार

भंडारा जिल्हा पाेलीस दलात पहिल्या लाटेत दुर्देवाने पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आपण लसीकरणासाठी पुढाकार घेतला. सर्वांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळेच आता दुसऱ्या लाटेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनावरील लस प्रभावी असल्याचे यावरुन सिध्द हाेते. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे झाले आहे.

- वसंत जाधव,

जिल्हा पाेलीस अधीक्षक भंडारा जिल्हा पाेलीस दलात पहिल्या लाटेत दुर्देवाने पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आपण लसीकरणासाठी पुढाकार घेतला. सर्वांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळेच आता दुसऱ्या लाटेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनावरील लस प्रभावी असल्याचे यावरुन सिध्द हाेते. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे झाले आहे.

- वसंत जाधव,

जिल्हा पाेलीस अधीक्षक