शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताने एकामागोमाग एक १५ गोल डागले; समोरचे '0'वरच पाहत राहिले
2
मुंबईकडे जाण्यासाठी रेल्वे स्थानकांवर गर्दीच-गर्दी; मराठा आंदोलकांवर रेल्वे पोलिसांचे लक्ष...
3
मोदी चीनमध्ये असताना डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा दावा; म्हणे, भारताने टेरिफवर ऑफर दिली...
4
डोनाल्ड ट्रम्प यांची भगवा पार्टीने अंत्ययात्रा काढली, लोकांना तेराव्यालाही बोलावले
5
शक्य तितक्या लवकर मुंबईचे रस्ते सोडा...; मनोज जरांगे यांची मराठा आंदोलकांना सूचना
6
...तर आम्हीही लाखोंच्या संख्येने मुंबईत येऊ; OBC समाजाचा इशारा, मंत्री छगन भुजबळ जरांगेंवर संतापले
7
जगदीप धनखड कुठे आहेत? एका बड्या नेत्याच्या फार्महाऊसवर...; माजी आमदारांच्या पेन्शनसाठीही अर्ज...
8
अफगाणिस्तानात भूकंपामुळे हाहाकार, भारताने पुढे केला मदतीचा हात!१ हजार तंबूंसह काय काय पाठवलं?
9
PNB आणि बँक ऑफ इंडियाच्या ग्राहकांसाठी आनंदाची बातमी...; आजपासून स्वस्त झालं कर्ज!
10
WhatsApp हॅकर्सच्या निशाण्यावर? 'ही' चूक केल्यास तुमचा फोन होऊ शकतो हॅक!
11
"...तर यातून लवकर मार्ग निघू शकतो"; CM देवेंद्र फडणवीसांचा मराठा आंदोलकांना प्रामाणिक सल्ला
12
जीममध्ये पुरुष ट्रेनर महिलांना देतायेत ट्रेनिंग...! अलाहाबाद उच्च न्यायालयाने व्यक्त केली चिंता; म्हणाले...
13
"आता प्रशासन कोर्टाच्या निर्णयाचे उचित पालन करेल..."; CM देवेंद्र फडणवीसांचं रोखठोक मत
14
हॉटेलला पोहचूनही ५० मिनिटे कारमध्येच थांबले; मोदी-पुतिन यांची खास भेट, जाणून घ्या भेटीमागे काय?
15
५ वर्ष बेस्ट फ्रेंडच्या पतीसोबत अफेअर; पत्नीला भनक लागली, तिनं 'असा' बदला घेतला अख्खं शहर बघत राहिलं
16
लग्नाला २२ वर्षे झाली तरी 'तो' देतोय त्रास; पत्नीने थेट मुख्यमंत्र्याकडे मागितली इच्छामृत्यूची परवानगी
17
१४५ कोटींची लोकसंख्या मोजण्यासाठी खर्च किती? जनगणनेसाठी मागितले गेले एवढे पैसे...
18
रोहित शर्माची फिटनेस टेस्ट झाली; निकालही आला! किंग कोहलीचं काय?
19
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
20
फक्त कारच नाहीत, १७५ वस्तू स्वस्त होणार, पण या वस्तू महागणार...

‘खाकी’ची राेगप्रतिकार शक्ती वाढली, दुसऱ्या लाटेत काेराेनावर मात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2021 05:00 IST

भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे.

ठळक मुद्देपहिल्या लाटेत पाच जणांचा मृत्यू

लाेकमत न्यूज नेटवर्कभंडारा : कोरोना संसर्गाच्या दुसऱ्या लाटेत लसीकरण झालेल्यांची राेगप्रतिकार शक्ती वाढल्याने काेराेना हाेऊनही मृत्यूदर शून्यावर आल्याचे भंडारा जिल्हा पाेलीस दलात दिसून येत आहे. नियमित व्यायाम आणि प्रतिकारक्षमता वाढविण्यासाठी केलेल्या उपाययाेजनेचे हे फलित हाेय. भंडारा जिल्ह्यात पाेलीस दलात ११७ अधिकारी आणि १४३८ पोलीस कर्मचारी कार्यरत आहेत. जिल्हा पाेलीस अधीक्षक वसंत जाधव आणि अपर पाेलीस अधीक्षक अनिकेत भारती यांच्या मार्गदर्शनात पाेलीस दलात प्रबळपणे लसीकरण माेहीम राबविण्यात आली. जवळपास सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे लसीकरण पूर्ण झाले आहे.  कायम नागरिकांच्या संपर्कात अधिकारी व कर्मचारी असतात. त्यामुळे त्यांना संसर्गाचा धाेका अधिक असताे. परंतु आता लसीकरण झाल्याने काही कर्मचाऱ्यांना काेराेनाची बाधा झाली असली तरी त्यावर यशस्वीपणे त्यांनी मात केली आहे.

नियमित व्यायाम महत्वाचाराेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम महत्वाचा आहे. त्यासाेबतच संतुलित आहारही महत्वाचा आहे. जिल्हा पाेलीस दलातील कर्मचारी व अधिकारी दरराेज नियमित व्यायाम करतात. यासाेबतच जिल्हा पाेलीस दलाच्यावतीने मेडिटेशन शिबिरासह याेगासनाबाबतही विविध शिबिरांचे आयाेजन केले आहे. त्यामुळेच दुसऱ्या लाटेत जिल्ह्यातील पाेलिसांना काेराेनाची बाधा झाली नाही. आजही जिल्हा मुख्यालयातील पाेलीस परेड ग्राऊंडसह विविध ठाण्यात पाेलीस व्यायाम करीत असल्याचे चित्र दिसून येत आहे. 

नियमित व्यायाम आणि संतुलित आहार यामुळे शरीरात राेगप्रतिकार शक्ती वाढते. काेराेना संसर्गात कर्तव्य बजावताना अनेकांशी संपर्क येताे. मात्र लसीकरणानंतर आता मनात भीती राहिली नाही. तरीही आम्ही सर्व नियमांचे पालन करुनच आपले कर्तव्य बजावताे. - रमाकांत दिक्षीत,पाेलीस उपनिरीक्षक

कर्तव्याच्या निमित्ताने सतत बाहेर रहावे लागते. लसीकरण झाले असले तरी काेराेना नियमांचे पालन केले जाते. ठाण्यात असाे की घरी, स्वच्छतेला महत्व दिले जाते. राेगप्रतिकार क्षमता वाढविण्यासाठी नियमित व्यायाम आणि याेग्य आहार घेताे. मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करताे.- बापूराव भुसावळे, पाेलीस हवालदार

भंडारा जिल्हा पाेलीस दलात पहिल्या लाटेत दुर्देवाने पाच जणांचा मृत्यू झाला. मात्र त्यानंतर आपण लसीकरणासाठी पुढाकार घेतला. सर्वांचे लसीकरण करुन घेतले. त्यामुळेच आता दुसऱ्या लाटेत कुणाचाही मृत्यू झाला नाही. काेराेनावरील लस प्रभावी असल्याचे यावरुन सिध्द हाेते. त्यामुळे प्रत्येकाने लसीकरण करुन घेणे गरजेचे झाले आहे.- वसंत जाधव, जिल्हा पाेलीस अधीक्षक

 

टॅग्स :Policeपोलिसcorona virusकोरोना वायरस बातम्या