शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात दुपारी १ वाजेपर्यंत ३०.८५ टक्के मतदान; 'या' मतदारसंघात मिळाला सर्वाधिक प्रतिसाद!
2
बारामतीतील EVM स्ट्राँगरुमचे CCTV अचानक बंद झाल्याचा सुळेंचा आरोप; निवडणूक अधिकारी म्हणाले...
3
धावत्या BULLET ला लागली आग; पेट्रोल टाकीचा स्फोट होऊन एकाचा मृत्यू तर 9 गंभीर जखमी
4
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates :राज्यात निवडणुकीच्या चौथ्या टप्प्यात दुपारी १ वाजेपर्यंत सरासरी ३०.८५ टक्के मतदान झाले
5
पैसे काढण्याशिवायही आहे तुमच्या ATM कार्डाचा उपयोग, त्यावर मिळणाऱ्या विम्याची माहिती आहे का? पाहा
6
Lok Sabha Election दरम्यान शेअर बाजारात का दिसतो चढ-उतार? आकडेवारीवरुन मिळेल उत्तर
7
Rahul Gandhi : "सरकार स्थापन झालं तर खटा-खट, खटा-खट पैसे..."; राहुल गांधींनी स्पष्टच सांगितलं
8
शरद पवारांकडून सुपारी घेऊन संजय राऊतांनी उबाठा संपवली; मनसेचा जोरदार पलटवार
9
रोहित वयाच्या ५० व्या वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो; युवीच्या वडिलांचा दावा, BCCI ला दिला खास सल्ला
10
भाजपा उमेदवार माधवी लता आणखी एका वादात; मतदान केंद्रावर महिलांच्या चेहऱ्यावरून काढला बुरखा;ओळखपत्र तपासले
11
Exclusive:"नरेंद्र मोदीच निवडून येतील असं वातावरण.."; श्रेयस तळपदेने स्पष्टच सांगितलं
12
'बजरंगी भाईजान'च्या मुन्नीने केलं आलमजेबला कॉपी; 'एक बार देख लिजिए'वर दिले जबरदस्त एक्स्प्रेशन्स
13
निलेश लंके हे सोशल मीडियाने निर्माण केलेलं वादळ, खरा चेहरा समोर आला; राधाकृष्ण विखेंचा हल्लाबोल
14
गुरु-केतु नवमपंचम योग: ३ राशींना दिलासा, ३ राशींनी अखंड सावध राहावे; नेमके काय करु नये?
15
सावनी रविंद्रनंतर सुयश टिळकलाही बजावता आला नाही मतदानाचा हक्क, म्हणाला - "ह्याची खंत वाटते..."
16
पोलीस कॉन्स्टेबल वराला प्रेयसीने भर मंडपातून पळवले, दुसऱ्या तरुणीशी विवाह होण्यापूर्वी रंगला ड्रामा
17
मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरमध्ये ७-८ बॅगा; त्यात ५०० सफारी, सूट होते का? संजय राऊतांचा आरोप
18
पाकिस्तान विरूद्ध आयर्लंड मालिका म्हणजे क्लब क्रिकेट; PCB च्या माजी अध्यक्षाची टीका
19
PAK vs IRE: पहिल्या पराभवानंतर पाकिस्तानने लाज राखली; आयर्लंडची कडवी झुंज!
20
संविधान बदलण्याचं काम नेहरू-इंदिरा अन् राजीव गांधींनीच केलंय; नरेंद्र मोदींचा पलटवार

खैरलांजीत नांदताेय सामाजिक एकाेपा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2021 1:07 PM

समाजमन हेलावून टाकणाऱ्या खैरलांजी हत्याकांडाचे नाव घेताच मन सुन्न होतं, अंगावर काटे येतात. मात्र, या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गावकऱ्यांनी आता समृद्धीकडे वाटचाल सुरू केली असून गत पंधरा वर्षांत या गावात विविध विकास याेजना गावात राबविण्यात आल्या आहेत.

ठळक मुद्दे'त्या' घटनेच्या कटु आठवणींनी आजही येतात शहारे 

भंडारा : खैरलांजी नाव उच्चारताच आजही अंगावर शहारे येतात. या गावात भाेतमांगे परिवारातील चाैघांची अमानुष हत्या झाली होती. समाजमन हेलावून टाकणाऱ्या या घटनेचा खैरलांजीत साक्षीदार आहे, ताे भाेतमांगे परिवाराचा उघड्यावर असलेला 'लाेखंडी पलंग'. तर आता या हत्याकांडाच्या कटु आठवणी सांभाळत आता गावात सामाजिक एकाेपा नांदताेय. गाव विकासाची कास धरून प्रगतीचे पाऊल टाकत आहे. मात्र, घटनेची धग आजही कायम आहे.

खैरलांजीची समृद्धीकडे वाटचाल

तो कलंक पुसून काढत खैरलांजीकरांनी समृद्धीकडे वाटचाल सुरू केली. गत १५ वर्षांत विविध विकास याेजना गावात राबविण्यात आल्या. जलजीवन-जलमिशन अंतर्गत खैरलांजीसाठी ५५ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठा याेजना मंजूर झाली आहे. शाळेच्या वर्गखाेल्याही मंजूर झाल्या आहेत. गावात साैरऊर्जेवर प्रकाश देणारे दिवे लावण्यात आले तर काही खांबांवर एलईडी बल्ब प्रकाशमान आहे. अंगणवाडी पूर्णत: साैरऊर्जेवर प्रकाशमान हाेत आहे. या गावाला २००९ साली तंटामुक्त गाव पुरस्कारही मिळाला हाेता. आता गावाची १०० टक्के हगणदारीमुक्तीकडे वाटचाल सुरू आहे. सरपंच माेरेश्वर धुमनखेडे यांच्या मार्गदर्शनात गाव आता विकासाचा मार्ग चाेखाळत आहे.

आठवणींचा काहूर

दीड दशक झाले तरी आजही आठवणींचा काहूर दाटून येताे. संपूर्ण देशच नव्हे तर जागतिक पातळीवर या हत्याकांडाचे पडसाद उमटले हाेते. गावाच्या एका टाेकावर राहणाऱ्या भैय्यालाल भाेतमांगे यांच्या कुटुंबातील चार सदस्यांची निर्घृण हत्या झाली हाेती. ताे काळाकुट्ट दिवस हाेता, २९ सप्टेंबर २००६. भैय्यालाल भाेतमांगे यांची पत्नी सुरेखा, मुलगी प्रियंका आणि राेशन व सुधीर या दाेन मुलांची हत्या करण्यात आली. अमानुषपणे त्यांचे मृतदेह कालव्यात फेकून दिले. भैय्यालाल शेतावर असल्याने ते या भीषण हल्ल्यात बचावले. संपूर्ण देश या हल्ल्याने हादरून गेला हाेता. विधानसभेपासून संसदेपर्यंत चर्चा झाली. न्यायाच्या लढाईसाठी रस्त्यावर आंदाेलनेही झाली.

या हत्याकांडानंतर तब्बल एक महिन्यानंतर खटला सुरू झाला. १५ ऑक्टाेबर २००८ राेजी भंडारा सत्र न्यायालयाने आठ जणांना दाेषी ठरविले. आता या घटनेला दीड दशक झाले आहे. भाेतमांगे परिवारातील कुणीही खैरलांजीत राहत नाही. रहायला कुणी त्या कुटुंबातील जिवंतही नाही. भैय्यालाल भाेतमांगे यांचाही २० जानेवारी २०१७ राेजी हृदयविकाराने मृत्यू झाला. खैरलांजीत त्यांची काही वर्षापर्यंत झाेपडी हाेती. आता तीही उद्ध्वस्त झाली असून त्याठिकाणी गवत वाढले आहे. या गवतात एकमेव लाेखंडी पलंग २९ सप्टेंबर २००६ च्या रात्री घडलेल्या थरार नाट्याचा साक्षीदार आहे.

दीड दशकापूर्वी घडलेल्या घटनेची धग आजही या गावात जाणवते. बाहेरील कुणी अनाेळखी व्यक्ती गावात आला की, सर्वांच्या नजरा त्याच्यावर खिळतात. हत्याकांडाचा विषय काढला की, कुणी फारसे बाेलायला तयारही नसतात. मात्र, या कटु आठवणी हृदयात साठवत गावकऱ्यांनी सामाजिक एकाेपा निर्माण केला आहे. विकासाची कास धरत प्रगतीकडे वाटचाल करीत आहे. आता गावात कुठे भांडण तंटा नाही की कुणाबद्दल आकसही नाही. आपण भले आणि आपले काम अशी स्थिती या गावातील नागरिकांची आहे. मात्र, आजही खैरलांजीच्या त्या घटनेचा काहूर प्रत्येकाच्या मनात दाटलेला दिसून येताे.

झाेपडी जमीनदाेस्त, लाेखंडी पलंग देताे साक्ष

खैरलांजी गावाच्या एका टाेकावर भैय्यालाल भाेतमांगे यांचे झाेपडीवजा घर हाेते. या झाेपडीत पाच जणांचे कुटुंब वास्तव्याला हाेते. हत्याकांडानंतर भैय्यालाल भाेतमांगे भंडारा येथे वास्तव्याला आले. या झाेपडीत कुणाचेच वास्तव्य नसल्याने आता ती झाेपडी पूर्णत: जमीनदाेस्त झाली. झाेपडीच्या ठिकाणी आता घरातील एकमेव लाेखंडी पलंग आहे. या पलंगालाही गंज चढला असून अवतीभाेवती गवत आणि झुडपी वनस्पती वाढली आहे. पंधरा वर्षात बदल काय झाला असेल तर या झाेपडीपुढे असलेला कच्चा रस्ता आता सिमेंटचा झाला आणि घटनेच्यावेळी छाेटासा असलेला वृक्ष आज चांगलाच माेठा झाला. 

भाेतमांगे परिवाराचा हत्याकांडाचा आमच्या गावावर माेठा कलंक लागला. या घटनेला जबाबदार असणाऱ्याला न्यायालयाने शिक्षाही दिली. आता कटू आठवणी जपत गावात सर्व जाती, धर्माचे लाेक गुणागाेविंदाने राहत आहेत. गावात विविध विकासकामे हाेत आहेत. हत्याकांडाच्या स्मृती कधीच संपणार नसल्या तरी सामाजिक एकाेपा निर्माण करण्यात मात्र यश आले.

- माेरेश्वर धुमनखेडे

सरपंच, खैरलांजी, ता. माेहाडी