शहरं
Join us  
Trending Stories
1
रोज विमाने उडतात, पण या विमानातून आवाजच येत नव्हता...; व्हिडीओ काढणाऱ्या तरुणाच्या काकीला वाटले...
2
इराण-इस्रायल युद्ध लांबलं तर 'या' महत्वाच्या वस्तू महागणार! जाणून घ्या, या देशांकडून काय-काय आयात करतो भारत?
3
SA Won WTC Final 2025 : 'चोकर्स'चा शिक्का पुसला, द. आफ्रिकेने इतिहास रचला; ऑस्ट्रेलियाला हरवून २७ वर्षांनी जिंकली ICC ट्रॉफी! मार्करमचे धमाकेदार शतक
4
Air India Plane Crash: ज्या आगीत जिवंत माणसांची झाली राख, त्यात एकच मानवी अवयव वाचला
5
अ‍ॅमेझॉनवर १६ जूनला अवघ्या १६ रुपयांना स्मार्टवॉच वाटली जाणार; कुपन कोड अन् वेळ लक्षात ठेवा...
6
"जर इस्त्रायलची साथ दिली तर..."; संतापलेल्या इराणचा पाश्चात्य देशांना मोठा इशारा
7
ऐन पेरणीत शेतकरी कुटुंबांवर संकट! वीज कोसळून दोन सख्ख्या भावांसह चार शेतकऱ्यांचा मृत्यू
8
अहमदाबाद प्लेन क्रॅशसंदर्भात बाबा रामदेव यांना वेगळाच संशय, स्पष्टच बोलले! केली मोठी मागणी
9
Maharashtra Rain Alert: कोकणाला रेड अलर्ट! मुंबई-ठाण्यासह 'या' जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा
10
अमेरिका, रशिया, ब्रिटन अणि फ्रान्स...; इस्रायल-इराण युद्धात कोणता देश कुणाच्या बाजूने? समोर आली लिस्ट
11
Tarot Card: कष्ट करावे लागतील, तडकाफडकी कोणतेही निर्णय घेऊ नका; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य!
12
Ahmedabad Plane Crash : कॅन्सरने आईला हिरावून नेलं, अपघातामुळे वडिलांचं छत्र हरपलं; १८ दिवसांत २ चिमुकल्या अनाथ
13
आम्ही असीम मुनीरला बोलावलेलेच नाही; अमेरिकेचा खुलासा, पाकिस्तान तोंडावर आपटला
14
काव्या मारन विवाहबंधनात अडकणार? हा प्रसिद्ध संगीतकार करतोय डेट, रजनीकांत बोलणी करायला... 
15
Video: वेदनने कळवळला, धावताना लंगडला... पण तरीही टेम्बा बवुमा ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना नडला, ठोकलं झुंजार अर्धशतक
16
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी निघणाऱ्या प्रत्येक दिंडीला सरकारकडून आर्थिक अनुदान जाहीर
17
अहमदाबाद विमान अपघात की अन्य काही?; उच्चस्तरीय समितीला तपासासाठी सरकारने दिली डेडलाईन
18
Ahmedabad Plane Crash : शेतकरी वडिलांनी कर्ज काढून लेकाला शिकवलं पण अपघातामुळे डॉक्टर होण्याआधीच सारं संपलं
19
"आम्ही बॅग आणि साड्यांमध्ये लोकांचे अवयव ठेवले"; अपघातानंतर मदत करणाऱ्याने सांगितली आपबिती
20
Coastal Road Tunnel Accident Video: रस्त्यावरून घसरली, कठड्यावर धडकली; कोस्टल रोड बोगद्यात भीषण अपघात

जीव धोक्यात घालून ‘ते’ देताहेत थंडीत पहारा

By admin | Updated: November 8, 2014 22:32 IST

लिलाव झालेल्या नदीघाटाची मुदत संपूनही रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तस्करांनी साठवून ठेवलेल्या रेतीची चौकीदारी करण्याचे आदेश तलाठी, पोलीस पाटील, कोतवालांना देण्यात आले आहे.

महसूल विभागाला आली उशिरा जागभंडारा : लिलाव झालेल्या नदीघाटाची मुदत संपूनही रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तस्करांनी साठवून ठेवलेल्या रेतीची चौकीदारी करण्याचे आदेश तलाठी, पोलीस पाटील, कोतवालांना देण्यात आले आहे. परंतु थंडीच्या दिवसात कोणतेही संरक्षण नसताना हे कर्मचारी जीव धोक्यात घालून कुडकुडत्या थंडीत खडा पहारा देत आहेत. रेती तस्करांकडून त्यांच्या जिवीताला काही झाल्यास त्याची हमी कोण घेणार? हा प्रश्न अनुत्तरीत आहे. भडारा जिल्ह्यात लिलाव नदीघाटाची मुदत संपलेली आहे. तरीसुद्धा रेतीचा अवैधरित्या उपसा सुरूच आहे. तालुक्यातील दाभा, बेटाळा, कोथुर्णा नदीघाटावरुन मोठ्या प्रमाणात रेतीचा उपसा सुरु आहे. या रेती भंडारा शहरालगतच्या रिंगरोड व टाकळी विद्युत विभागाच्या कार्यालयामागे मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात आलेली आहे. रेतीचा हा साठा जेसीबीच्या माध्यमातून ट्रकामध्ये भरून मध्यरात्री या रेतीची वाहतूक सुरू आहे. नवीन सरकार राज्यात सत्तारुढ झाल्यानंतर यावर नियंत्रण आणण्यासाठी भंडाराचे तहसीलदार सुशांत बनसोडे यांनी तालुक्यातील पोलीस पाटील, तलाठी व कोतवालांना साठविलेल्या रेतीच्या ढिगाऱ्यांची चौकीदारी करण्याचे लेखी आदेश दिले आहे. यासाठी हे कर्मचारी जीव धोक्यात घालून पहारा देत आहेत. उशिरा आली जागमहसूल विभागाच्या कारवाईला न जुमानता रेती तस्कर मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक करीत आहेत. ही बाब महसूल विभागाच्या निदर्शनास असतानाही निर्बंध लावण्याचे टाळत आले. मात्र जिल्हा प्रशासनाने निर्देश दिल्यानंतर उपसा करून आणलेल्या व साठवून ठेवलेल्या रेतीची वाहतूक होऊ नये, याकरिता तहसीलदारांनी तालुक्यातील सर्व पोलीस पाटलांना पत्र देऊन रेती साठविलेल्या परिसरात खडा पहारा देण्याचे आदेश दिले आहे. हे आदेश रेतीच्या सुरक्षीततेच्या दृष्टीने करण्यात आले असले तरी हे पोलीस पाटील जीव मुठीत घेऊन चौकीदाराच्या भूमिकेत ही जबाबदारी सांभाळत आहेत. इथे आहे रेतीसाठा भंडारा-वरठी मार्गावरील टाकळी येथील वीज वितरण कंपनीच्या कार्यालयामागील मोकळ्या जागेत तसेच रिंग रोड, पिंगलाई, खोकरला, जमनी या भागात रेतीची मोठ्या प्रमाणात साठवणूक करण्यात येत आहे. साठविलेल्या रेतीची दिवसा वाहतूक न करता मध्यरात्री जेसीबीच्या माध्यमातून ट्रक व टिप्परमध्ये रेती भरून नागपूरकडे पाठविण्यात येते. मागील अनेक दिवसांपासून ही वाहतूक सुरु आहे. नवीन सरकार राज्यात आल्यानंतर महसूल प्रशासनाने रेतीघाट व साठविलेल्या परिसरामध्ये भादंवि १४४ कलमान्वये गुन्हा नोंदविण्याची कारवाई सुरु केली आहे. गावातील कामे रखडलीगावातील शांतता व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस पाटलांची जबाबदारी असते. परंतु महसूल विभागाने ही अतिरिक्त जबाबदारी टाकल्यामुळे गावाकडे दुर्लक्ष होणार आहे. पोलीस पाटलांच्या मुख्य जबाबदारीकडे महसूल प्रशासनाने डोळेझाक केल्यामुळे गावातील जी जबाबदारी आहे, ती कामे रखडली आहेत.पोलीस पाटलांना धमक्याआता कुठल्याही संरक्षणाव्यतिरिक्त रेतीसाठी चौकीदाराची भूमिका निभवावी लागणार आहे. यात त्यांना रेती तस्करांकडून धमक्या मिळत असल्यामुळे त्यांचा जीव धोक्यात आला आहे. या कामासाठी महसूल किंवा गृहविभागाने मदत केलेली नाही. ज्या रेतीसाठ्यावर त्यांची नियुक्ती केली आहे तिथून त्यांच्या गावाचे अंतर दूरवर असल्याने स्वत:च्याच खर्चाने त्यांना तिथे पोहचायचे आहे. यासाठी आर्थिक, शारीरिक व मानसिक त्रास त्यांना होत आहे. ‘इकडे आड - तिकडे विहीर’ सध्या हिवाळ्याचे दिवस सुरु असल्याने महसूल प्रशासनाने त्यांच्या निवासाची किंवा भोजनाची व्यवस्था केलेली नाही. त्यामुळे ‘इकडे आड - तिकडे विहीर’ अशा स्थितीत पोलीस पाटलांसह महसूल विभागाचे कर्मचारी सापडले आहेत. मात्र वरिष्ठांचे आदेश असल्याने महसूल कर्मचाऱ्यांना ते पाळणे गरजेचे आहे. यात पोलीस पाटलांना नाहक जुंपण्यात आल्याने त्यांच्यामध्ये प्रशासनाप्रति रोष पसरला आहे. (शहर / नगर प्रतिनिधी)