शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

‘जंक फूड’ वाढवत आहे विविध आजार

By admin | Updated: January 5, 2016 00:38 IST

बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात.

भंडारा : बैठे काम करणाऱ्या जीवनशैलीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. साधारण २५ ते ३० टक्के श्रमजीवी रस्ते, कॅफे व इतर बाह्य ठिकाणांवरील जंक फूडवर अवलंबून राहतात. परिणामी, हे लोक लठ्ठपणा या आजारापासून पीडित आहेत. त्यांच्यामध्ये विविध आजारांचा धोका वाढला आहे. आयर्नच्या कमी सेवनासह अपुऱ्या आहारामुळे अ‍ॅनेमिया व जीवनसत्त्वाची कमतरता असण्याची प्रकरणे वाढली आहेत. एका सर्वेक्षणात २४ टक्के पुरुष व १९ टक्के स्त्रियांमध्ये जीवनसत्त्व (ब) ची कमतरता आढळून आली आहे. हृदयविकारात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या अधिकआईच्या गर्भामध्ये असल्यापासून हृदयाचे काम सुरू होते, ते अखेरचा श्वास घेईपर्यंत सुरूच असते. जन्मापासून अखेरपर्यंत अव्याहतपणे कार्यरत असणाऱ्या शरीराचा हा एकमेव महत्त्वपूर्ण असा अवयव आहे, त्याची दक्षता घेणे गरजेचे आहे. असे असताना शहरातील २५.२१ टक्के पुरूष हृदयविकाराने पीडित आहेत. धक्कादायक म्हणजे, यात पुरुषांपेक्षा महिलांची संख्या सर्वात जास्त आहे. २६.२६ टक्के महिला या आजाराने पीडित आहेत. २३ टक्के स्त्री-पुरुषांना डोळ्यांचा विकार लोहयुक्त आहाराच्या अभावामुळे २३.६९ टक्के पुरुष व २३.८८ टक्के स्त्रियांमध्ये डोळ्यांविषयक समस्या असल्याचे आढळून आले. वेळेचा अभाव, १० तासांपेक्षा अधिक कालावधीपर्यंत लॅपटॉप्स व संगणकांचा वापर. रात्री दोन-तीन तास मोबाईलचा वापर यामुळे मुख्यत: २० ते २५ वर्षे वयोगटातील युवा पिढीच्या दृष्टीवर परिणाम झाल्याचे आढळून आले. लोहयुक्त आहाराच्या कमी सेवनामुळे १९.३६ टक्के स्त्रिया अ‍ॅनेमियापासून पीडित आहेत. २८ ते ३५ वर्षीय स्त्रियांमध्ये वाढतोय लठ्ठपणाशहरात लठ्ठपणाच्या केसेसमध्ये दरवर्षी तीन टक्क्यांनी वाढ होत आहे. तणाव, जंक व तेलकट फूडचे अधिक प्रमाणात सेवन यासोबतच आठवड्यामधून दोन किंवा तीनदा जेवणासाठी बाहेर जाणे, या कारणांमुळे मुख्यत: २८ ते ३५ वर्षे वयोगटातील स्त्रियांना लठ्ठपणाचा धोका असल्याचे आढळून आले आहे. जीवनसत्त्वाचे कमी सेवन व चरबीयुक्त पदार्थांचे अधिक प्रमाणात सेवन अशा खाण्याच्या सवयींमुळे २५ ते ३० टक्के युवा पिढींच्या जीवनात आजाराचा धोका वाढला आहे. ३१.९ टक्के पुरुष मधुमेहीभारतामध्ये जगातील सर्वाधिक मधुमेहाचे रूग्ण आढळतात आणि मृत्यूच्या कारणामध्ये मधुमेह हे सर्वाधिक कारणांपैकी एक आहे. मधुमेह ही व्याधी केवळ रक्तातील वाढलेली शर्करा या स्वरूपात नसून तो शरीरातील महत्त्वाच्या अवयवांना हळूहळू निकामी करतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मधुमेह होण्याच्या कारणांमध्ये चुकीचा आहार व व्यायामाचा अभाव ही दोन महत्त्वाची करणे आहेत. शहरात ३१.०९ टक्के पुरूष तर २६.२३ टक्के महिला या व्याधीने पीडित असल्याचे स्पष्ट झाले आहे. (जिल्हा प्रतिनिधी)