शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिकच्या पालकमंत्रिपदाचा वाद चिघळण्याची चिन्हे; गिरीश महाजनच करणार महाराष्ट्रदिनी झेंडावंदन
2
भारत-पाकिस्तान तणाव शिगेला पोहोचला असतानाच अमेरिकेतून आली 'गुड न्यूज'! ट्रम्प म्हणाले, भारतासोबत होऊ शकतो करार
3
Gold Price on Akshay Tritiya : अक्षय्य तृतीयेला 'इतक्या' रुपयांनी स्वस्त झालं सोनं, काय आहे १४ ते २४ कॅरेट सोन्याचे नवे दर
4
PM मोदींच्या कॅबिनेट सुरक्षा समितीच्या बैठकीत मोठा निर्णय; माजी रॉ प्रमुखांकडे सोपवली महत्त्वाची जबाबदारी
5
पाकिस्तानचा खोटारडेपणा, हुतात्मा जवानाच्या आईला भारताने हाकलल्याची पसरवली बातमी, आता समोर आलं सत्य
6
'मुस्लीम रुग्णांवर उपचार करणार नाही' पहलगाम हल्ल्यानंतर इंदूरच्या डॉक्टरची पोस्ट व्हायरल
7
१ मेपासून देशातील १५ बँका होणार बंद; महाराष्ट्रातील बँकांचाही समावेश? खातेदारांच्या पैशाचं काय होणार?
8
"लहानपणापासून मी कित्येक पूजा केल्यात, काही लोकांना आज उत्तर मिळाले असेल"; शरद पवारांचा टोला
9
क्रिकेटसोबत कमाईतही नंबर वन आहे Rohit Sharma, वर्षाला कोट्यवधींची कमाई; कशी आहे लक्झरी लाईफस्टाईल?
10
निर्लज्ज पाकिस्तान! संसदेत, परराष्ट्रमंत्र्यांनी टीआरएफला वाचवल्याची कबुली दिली, म्हणाले, आम्ही त्यांचे नाव यूएनएससीच्या निवेदनातून...
11
ऐश्वर्या-अविनाश नारकर यांचे भन्नाट रील्स; लेकाची काय असते प्रतिक्रिया? म्हणाले, "तो कधीच..."
12
जगातील टॉप १० सर्वात महागडी शहरे; इथे एक दिवसांचा खर्च म्हणजे महिन्याचा पगार
13
वॉरेन बफेंनी १९८८ मध्ये खरेदी केलेले Coca-Cola चे शेअर्स, माहितीये त्यांच्या १ हजार डॉलर्सचं आज मूल्य काय आहे?
14
'माझा मुलगा फक्त १० वर्षांचा आहे आणि...' वैभव सूर्यवंशीबाबत एबी डिव्हिलियर्सचं मोठं वक्तव्य
15
पती सौदीला कमवायला गेला, इथं पत्नीचे जुळले शेजाऱ्याशी अनैतिक संबंध; पती परतला अन् शेवट झाला
16
नवऱ्याची दाढी आवडली नाही, कापण्यास नकार देताच बायको क्लीन शेव असलेल्या दिरासोबत पसार
17
Akshaya Tritiya 2025: यंदाची अक्षय्य तृतीया 'या' पाच राशींसाठी ठरणार खास; धनसंपत्तीची पूर्ण होणार आस!
18
मागण्या मान्य न झाल्यास २९ ऑगस्टपासून मुंबईत निर्णायक आंदोलन; मनोज जरांगेंचा अल्टिमेटम
19
रणबीर कपूरसोबत रिलेशनशिपमध्ये होती अमिषा पटेल? खुलासा करत म्हणाली, "आम्ही रोमँटिक..."
20
"पहलगामच्या हल्ल्यात धर्म आणायची गरज नाही, तो देशावरचा हल्ला"; 'त्या' विधानावर शरद पवारांचे स्पष्टीकरण

‘पीएम कुसुम’मध्ये सहभागी व्हा; वर्षाला एकरी लाखापर्यंत कमवा !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 27, 2023 17:03 IST

अनुदानावर मिळते सौर कृषिपंप : ऑनलाइन अर्ज करा

भंडारा : ज्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत वीज पोहोचविणे शक्य नाही, अशा शेतकऱ्यांना शासनामार्फत सौरऊर्जेवर चालणारे कृषिपंप उपलब्ध करून दिले जाते. यातून शेतात लाखो रुपयांचे उत्पादन घेणे शेतकऱ्यांना शक्य होते. जिल्ह्यातील १४६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप लावण्यात आले आहेत.

यापूर्वी शेतकऱ्यांना विजेवर चालणारे कृषिपंप शासन उपलब्ध करून देत होता. त्यासाठी शासनामार्फत अनुदान दिले जात होते. मात्र, कृषिपंपासाठी मोठ्या प्रमाणात वीज खर्च केली जात होती. तसेच, गावापासून शेत दूर राहत असल्याने तिथपर्यंत वीज पुरवठा करण्यास शासनाला लाखो रुपये खर्च येत होते. वेळोवेळी वीज पुरवठा खंडित होण्याची समस्या गंभीर राहते. ही बाब लक्षात घेऊन शासनाने शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करुन दिला जात आहे. गडचिरोली जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सूर्यप्रकाश राहतो. त्यामुळे सौर कृषिपंप पूर्ण क्षमतेने दिवसा काम करते. जवळपास आठ तास कृषिपंप चालले तर एका एकराला सिंचन होते.

काय आहे पीएम कुसुम योजना?

शेतकऱ्यांना सौर कृषिपंप उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र शासनाने प्रधानमंत्री कुसुम योजना सुरू केली आहे. या योजनेची अंमलबजावणी मागील चार ते पाच वर्षांपासून केली जात आहे. भारनियमनाच्या समस्येपासून दूर राहता येते.

कोणाला लाभ घेता येतो ?

बोअर, विहीर, नाला, नदी आदी पाण्याची सुविधा असल्यास शेतकऱ्याला या योजनेचा लाभ दिला जातो. विशेष म्हणजे त्याने यापूर्वी कृषिपंपाच्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा, हे विशेष.

निकष काय?

ज्या शेतकऱ्यांकडे शेतजमीन आहे. जवळपास पाण्याचे साधन आहे. तसेच शासनाच्या इतर योजनेअंतर्गत कृषिपंपाचा लाभ घेतला नसल्यास या योजनेंतर्गत सदर शेतकऱ्याला कृषिपंप उपलब्ध करून दिला जातो.

कोणती कागदपत्रे आवश्यक

सातबारा, लाभार्थ्यांचे आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, एससी, एसटी असल्यास जात प्रमाणपत्र, बँक पासबुक आवश्यक आहे.

उन्हाळ्यातही लाखोंचे उत्पादन

सौर कृषिपंप दिवसा पूर्ण क्षमतेने काम करतात. त्यामुळे उन्हाळ्यातही लाखो रुपयांचे उत्पादन घेणे शेतकऱ्याला शक्य होणार आहे. जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांना सिंचन विहिरी मिळाल्या आहेत. त्या ठिकाणी सोलरपंप बसविता येणार आहे.

१४६ शेतकऱ्यांनी घेतला लाभ

योजनेची सुरुवात झाल्यापासून १४६ शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्यात आले आहेत. जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज सादर केला आहे. काही शेतकऱ्यांच्या शेतात सौर कृषिपंप बसविण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. काहींची केवळ तपासणी सुरू आहे.

अर्ज कसा कराल?

- अर्ज ऑफलाइन आणि ऑनलाइन अशा दोन्ही प्रकारे आपण करू शकतो. आजच्या स्थितीत आपण अर्ज लिंकच्या माध्यमातून अथवा ऑनलाइनसुद्धा सहजपणे भरू शकतो.

टॅग्स :agricultureशेतीbhandara-acभंडारा