शहरं
Join us  
Trending Stories
1
येमेनमध्ये इस्रायलच्या हवाई हल्ल्यात हुथी सरकारचे पंतप्रधान अहमद अल-राहवी ठार
2
केंद्र सरकारच्या GST सुधारणांना विरोधी पक्षांचा पाठिंबा, पण..; जयराम रमेश स्पष्टच बोलले
3
BREAKING: मनोज जरांगेंना तिसऱ्या दिवशीही आझाद मैदानात आंदोलनास परवानगी
4
प्रेमप्रकरणातून आंबा घाटात तरूणीचा खून; मृतदेह दरीत फेकून दिला
5
'कोणता कायदा रोज अर्ज करण्यास सांगतो?'; रोजच्या परवानगीच्या अटीमुळे मनोज जरांगे पोलिसांवर चिडले
6
ITR साठी आयकर विभाग मेसेज पाठवतं, वार्षिक उत्पन्न ३ लाख रुपये असणाऱ्यांनी फाइल करावी का?
7
मोठी बातमी! मनोज जरांगे यांच्या मुंबईतील आंदोलनात सहभागी तरुणाचा मृत्यू
8
क्वाड शिखर परिषदेसाठी डोनाल्ड ट्रम्प भारतात येणार? समोर आली मोठी माहिती...
9
मनोज जरांगेंची भाषा मुजोरपणाची, गुणरत्न सदावर्तेंचा हल्लाबोल; पवार-ठाकरेंवरही संतापले
10
सप्टेंबरची सुरुवात गौरी पूजनाने; भद्रा राजयोगात ९ राशींना बंपर लॉटरी, सुख, संपत्ती, सुबत्तेचा काळ
11
७ वर्षांनी पंतप्रधान मोदी चीनला पोहचले, रेड कार्पेटवर भव्य स्वागत; पुतिन-जिनपिंग यांना भेटणार
12
KCL 2025 मध्ये सलमानची हवा! १२ चेंडूत ११ उत्तुंग षटकारांसह २६ चेंडूत कुटल्या ८६ धावा (VIDEO)
13
अमित शाहांच्या विमानात तांत्रिक बिघाड; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मदतीला सरसावले
14
इंडोनेशियात आमदारांच्या पगारावरून गोंधळ, जमावाने विधानसभा जाळली; तिघांचा मृत्यू
15
सपा-काँग्रेसनं रचला संभलची डेमोग्राफी बदलण्याचा कट, हिंदूंना ठरवून लक्ष्य केलं गेलं! मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा मोठा दावा
16
'बिहारसाठी मीच योग्य', तेजस्वी यादवांनी राहुल गांधींसमोर मुख्यमंत्रिपदावर ठोकला दावा
17
विरार इमारत दुर्घटना प्रकरण; विकासक, जागामालकांसह ५ जणांना अटक
18
'भारतामुळे पाकिस्तानात पूर', डोनाल्ड ट्रम्प असे बोललेच नाही, व्हायरल व्हिडीओचं सत्य काय?
19
Nagpur Crime: एंजेलसारखीच मोनिकाची झाली होती हत्या; नागपुरात ११ मार्च २०११ रोजी काय घडलं होतं?
20
सरकारसोबतची पहिली बैठक अयशस्वी; तुम्ही आमच्या जीवाशी खेळताय, मनोज जरांगे पाटील संतापले

हरवलेल्या ‘जय’ चा जयचंद आला

By admin | Updated: March 1, 2017 00:30 IST

उमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला.

वन्यप्रेमींमध्ये आनंद : ‘जय’च्या बेपत्ता होण्याचे दु:ख कायमविशाल रणदिवे अड्याळउमरेड-कऱ्हांडला अभयारण्यातील जय नामक वाघ वर्षभरापूर्वी अचानकरित्या बेपत्ता झाला. त्या वाघाचा मृत्यू झाल्याचे खासदार नाना पटोले यांनी सांगितल्यानंतर वनविभाग खडबडून जागा झाला होता. अड्याळजवळील पुरकाबोडी जंगलात ‘जय’सारखा दिसणारा वाघ दिसल्याचे बोलले गेले होते. त्यानंतर प्र्राणीमित्र व वनविभागाच्या चमुने जंगल पिंजून काढले. ठिकठिकाणी कॅमेरे लावले. पंरतु ‘जय’ कुठेही आढळून आला नाही.त्यानंतर वनविभागाची महिनाभर शोधमोहीम सुरू राहिली. कुणालाही कोणताही वाघ दिसला तर तो ‘जय’ असावा. असे सांगत ‘जय’चा शोध व्हायचा. परंतु ना ‘जय’ दिसला ना त्याच्या पाऊलखुणा! जय जिवंत आहे की मृत पावला की त्याची शिकार झाली याबाबत आजही गूढ कायम आहे. आता ‘जय’सारखाच हुबेहुब दिसणारा त्याचा अपत्य ‘जयचंद’ हा वाघ पर्यटकांना भुरळ घालत आहे. त्याचा अधिवास पवनी वनक्षेत्रात अधिक असल्यामुळे पवनी गेटकडे पर्यटक तथा वन्यप्रेमीची गर्दी होऊ लागली आहे. काही वर्षापुर्वी उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात स्थलांतरीत झालेल्या ‘जय’ हा वाघ अल्पावधीत पर्यटकांच्या आकर्षणाचे केंद्र ठरला होता. आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘जय’ची ओळख ‘सेलीब्रेटी’सारखी झाल्यामुळे त्याला पाहण्यासाठी दूरवरून पर्यटक येत होते.सर्वांनाच वेड लावणारा प्राणीमित्रांना आकर्षित करणारा, रूबाबदार शरीरयष्टीचा, उंचपुरा दिसणारा ‘जय’ नामक वाघ १६ एप्रिल २०१६ पासून अचानक बेपत्ता झाला आहे. त्याची शोधमोहीम अजुनही सुरुच असल्याचे वनविभाग सांगत असला तरी तो अद्याप कुणालाही दिसला नाही. ‘जय’ नामक वाघाचा जन्म साकोली तालुक्यातील नागझिरा अभयारण्यात झाला होता. ‘जय’चा भाऊ ‘विरू’ हा पेंच प्रकल्पात स्थलांतरीत झाला आहे. मध्यंतरी ‘जय’ तेलंगना राज्यातील कागजनगर, आदिलाबाद जंगलात गेल्याची चर्चा होती.आता जय व चांदी (टी २) या वाघाचा अपत्य असलेल्या ‘जयंचद’ हा वाघ ‘जय’ची जागा घेण्यासाठी सज्ज झाला आहे. मागील सहा महिन्यापासुन पवनी गेट परिसरात तो दृष्टीस पडत आहे. उमरेड वनक्षेत्रातून तो जुलै २०१६ मध्ये पवनी वनक्षेत्रात दाखल झाला. अडीच वर्षे वयाचा असलेला ‘जयचंद’ हा ‘जय’पेक्षाही रूबाबदार होईल, असे वन्यजीव अभ्यासकांचे मत आहे. २६ जानेवारी रोजी पवनी वनक्षेत्रात ‘जयचंद’ सह तीन वाघांनी पर्यटकांना दर्शन दिले होते. ‘जयचंद’च्या दर्शनामुळे प्राणीमित्रांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव पाहायला मिळत आहे.जयचंद नामक वाघ काही दिवसापूर्वी भुयार वनक्षेत्रात आढळून आला. हा वाघ ‘जय’सारखा म्हणण्यापेक्षा त्यापेक्षा धिप्पाड होऊ शकतो. जयचंदमुळे पर्यटकांची संख्या वाढल्यामुळे महसुलामध्ये वाढ होऊ शकते.- डी. एन. बारई, वनपरिक्षेत्राधिकारी अड्याळ.