शहरं
Join us  
Trending Stories
1
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
2
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
3
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
4
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
5
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
6
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
7
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
8
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
9
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
10
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
11
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
12
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
13
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
14
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
15
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
16
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
17
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
18
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
19
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
20
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!

जनधन योजनेला तळागाळात पोहोचविणे आवश्यक

By admin | Updated: October 9, 2015 01:12 IST

प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे.

३० नोव्हेंबरपर्यंत मुदतवाढ : लाभ घेण्याचे नाना पटोले यांचे आवाहनभंडारा : प्रधानमंत्री जनधन योजनेमध्ये जिल्हयात आतापर्यंत ३ लाख ९५,८१७ बँक खाते उघडण्यात आले आहे. या योजनेला ३१ मार्चपर्यंत असलेली मुदत आता ३० नोव्हेंबर पर्यंत वाढविण्यात आली आहे. हे खाते झिरो बॅलन्सवर उघडण्यात येत असले तरी या खात्यातून खातेदाराला ५ हजार रुपयापर्यंत रक्कम काढता येते. या योजनेतील खातेधारकांला २ लाख रुपयापर्यंतचे विमा सुरक्षा उपलब्ध होते. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांनी या योजनेचा लाभ घेवून बँकेत खाते उघडावे, असे आवाहन खा. नाना पटोले यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. यावेळी आमदार अ‍ॅड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी धीरज कुमार, नियोजन अधिकारी एम.एम. सोनकुसरे, जिल्हा अग्रणी बँकेचे अधिकारी संजय पाठक उपस्थित होते. जनधन योजनेतील खातेधारकाने ६ महिनेपर्यंत जर बँक व्यवहार केले नाही, तर ते खाते बंद होते. त्यामुळे खातेधारकांनी या खात्यामार्फत सतत बँक व्यवहार करणे आवश्यक आहे. तसेच ५ हजार रुपयापर्यंत कधीही बँक खात्यातून रक्कम काढता येते. मात्र काढलेली रक्कम पुन्हा बँक खात्यात जमा करणे आवश्यक असल्याची माहिती खादार नाना पटोले यांनी दिली. असंघटीत क्षेत्रातील लोकांना स्वयंरोजगार करण्यासाठी आणि अस्तित्वातील रोजगार वाढविण्यासाठी कर्ज मिळणे सोयीस्कर व्हावे म्हणून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेअंतर्गत सहज कर्ज उपलब्ध करुन देण्याची व्यवस्था केली आहे. योजनेमध्ये ५० हजार ते ५ लाख रुपयापर्यंत तर तरुण योजनेत ५० हजार ते १० लाख रुपयापर्यंतचे कर्ज उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. यासाठी १० टक्के व्याज दर आकारण्यात येतो, असेही नाना पटोले म्हणाले. मुद्रा योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्हयात १५६२ लोकांना कर्ज उपलब्ध करुन दिले असून ४ कोटी ९८ लाख १२ हजार रुपयांचे कर्ज वितरीत केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी जमानतदाराची आवश्यकता नाही. मात्र, पूर्वी एखाद्या बँकेचे कर्ज थकीत असणाऱ्या व्यक्तीस या योजनेचा लाभ मिळणार नाही. कर्ज परत करण्याची मुदत ५ वर्ष आहे. प्रधानमंत्री विमा योजने अंतर्गत ( १२ रुपये ) जिल्हयात आतापर्यंत १ लाख ६ हजार ७९ लोकांनी विमा काढला असून प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा (३३० रुपये) योजनेचा लाभ आतापर्यंत १ लाख १० हजार ६५० लोकांनी घेतला आहे. त्याचबरोबर अटल पेंशन योजनेमध्ये ७१६ लाभधारक आहेत.या सर्व योजनांच्या संदर्भात काही व्यक्ती व संस्थांकडून जनतेची दिशाभूल करणारे पत्रक वाटले जात आहेत. मात्र, जनतेने या सर्व योजनेचा लाभ घेण्यासाठी कोणत्याही फसव्या जाहिरातींना बळी न पडता नागरिकांनी थेट बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन खासदार नाना पटोले यांनी केले. (जिल्हा प्रतिनिधी)