शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी जागावाटपाचा तिढा कायम; मनसे नेते म्हणाले, “मातोश्रीवर जाऊन चर्चा केली, पण...”
2
थाटामाटात अर्ज, पण दुसऱ्याच दिवशी माघार; कृष्णराज महाडिक यांची निवडणूक न लढवण्याची घोषणा
3
एकीकडे शिंदेसेनेशी चर्चेची अंतिम फेरी अन् दुसरीकडे भाजपाची ‘नमो भारत, नमो ठाणे’ बॅनरबाजी
4
अफगाणिस्तानात भूकेने हाहाकार; अर्धी जनता अन्नाविना, मदतीचा ओघही आटला! नेमकं काय झालं?
5
बांग्लादेशातील हिंसेची आग लंडनपर्यंत..; खालिस्तान समर्थक भारतीयांच्या आंदोलनात घुसले, तणावाचे वातावरण
6
Aaditya Thackeray : "भाजपराज म्हणजे जंगलराज, झाडं तोडणारे रावण; तपोवनाचा मुद्दा मनपा निवडणुकीत तापवा"
7
ठाकरे बंधूंकडून मुंबईत शरद पवारांना १५ जागांचा प्रस्ताव? अपेक्षित प्रतिसाद नसल्याने कोंडी!
8
बांगलादेशात आता हिंदूंचा नवा आवाज! नवी पार्टी रिंगणात; ९१ जागांवर लढणार निवडणूक
9
सोलापूर हादरलं! इच्छुक तृतीयपंथी उमेदवाराची निर्घृण हत्या; ४० तोळे सोनं घेऊन तिघे फरार
10
Video - श्रीमंतीचा माज, खिडकीला लटकून स्टंटबाजी...; तरुणांची हुल्लडबाजी, लोकांच्या जीवाशी खेळ
11
प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीच्या सूनेला खंडणीच्या आरोपाखाली अटक, पोलिसांनी रंगेहाथ पकडलं
12
नेत्यांच्या पायाशी बसणारा मुख्यमंत्री, पंतप्रधान बनला; काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांच्या पोस्टने खळबळ
13
इतिहास विसरू नका... तुमचा जन्म आमच्यामुळे
14
Dipu Chandra Das : "ते राक्षस बनले..."; बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येचं प्रत्यक्षदर्शीने सांगितलं खळबळजनक 'सत्य'
15
मनसेला मुंबईत मोठा धक्का! प्रभारी, पदाधिकारी, शाखाध्यक्षांचा जय महाराष्ट्र; शिंदेसेनेत सामील
16
इस्त्रायलचा एक निर्णय आणि जगाचे दोन भाग! सोमालीलँडवरून आंतरराष्ट्रीय राजकारणात मोठी उलथापालथ
17
नांदेडमधील चौघांच्या मृत्यूचे गूढ उकलले; आई-वडिलांना संपवून मुलांची आत्महत्या 
18
बाजार सुस्त, पण SIP मस्त! दरमहा १०,००० रुपयांच्या एसआयपीने व्हाल कोट्यधीश; वाचा सोपं गणित
19
दोन पत्नींच्या कचाट्यात सापडला बेरोजगार पती! स्वतःच्याच मृत्यूचा रचला बनाव; १९ दिवसांनी दिल्लीत जे घडलं...
20
सत्तार म्हणाले, दानवेंनी आज पहिल्यांदा चांगले काम केले; दानवे म्हणाले, सत्तारांनी चांगले काम केल्याचे आठवत नाही!
Daily Top 2Weekly Top 5

स्वामीनाथन आयोगासाठी जनमंचचा मोर्चा

By admin | Updated: October 31, 2015 01:32 IST

शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. २००६ मध्ये आयोगाने अंतिम अहवाल दिल्यानंतरही नऊ वर्षांपासून केंद्र सरकारने तो दडपून ठेवला.

अहवाल दडपल्याचा आरोप : प्रधानमंत्र्यांना पाठविले निवेदन भंडारा : शेतकऱ्यांच्या हितासाठी स्वामीनाथन आयोगाची स्थापना करण्यात आली होती. २००६ मध्ये आयोगाने अंतिम अहवाल दिल्यानंतरही नऊ वर्षांपासून केंद्र सरकारने तो दडपून ठेवला. स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्या, या मागणीसाठी जनमंचने जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून प्रधानमंत्र्यांना निवेदन पाठविले. कृषी प्रधान देशात शेतकऱ्यांची आर्थिक पिळवणूक होत आहे. त्यांची आर्थिक स्थिती सुधारावी, यासाठी शेतकऱ्यांच्या हिताचा निर्णय घेता यावा यासाठी केंद्र सरकारने २००४ मध्ये स्वामीनाथन आयोगाची स्थापना केली. आयोगाने त्यांचा अंतिम अहवाल ४ आॅक्टोबर २००६ ला केंद्र सरकारला सादर केला. मात्र, नऊ वर्षांचा कार्यकाळ लोटूनही सरकारने आयोगाचा अहवाल दडवून ठेवला. असे असताना सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सातवा वेतन आयोग लागू करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत.सरकारी कर्मचाऱ्यांना सातवा वेतन आयोग लागू करण्यापूर्वी देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या शेतकऱ्यांसाठी स्वामीनाथन आयोग लागू करावा, अशी मागणी या मोर्चाकऱ्यांनी जिल्हाधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शिष्टमंडळाचे नेतृत्त्व दामोदर तिवाडे, डॉ. नितीन तुरस्कर यांनी केले. यावेळी जिल्हा परिषद सदस्य प्यारेलाल वाघमारे, जयदेव पडोळे, रामदास शहारे, आत्माराम महाराज, दिपक कुंभलकर, निलेश गाढवे, संजय एकापुरे, प्रभू बांडेबूचे, सुखदेव चामट, रावली भुरे, आदित्य मोटघरे आदी उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)